मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे बंधूनी एकत्र मेळावा घेतल्यावर सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरु केले असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, आम्ही (ठाकरे बंधू) एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग लागली आहे. ही आग सर्वांपुढे दाखवताही येत नाही आणि शमवताही येत नाही, मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, ते अत्यंत विकृत व हिणकस व्यक्तीची माणसे आहेत, असेही ते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले. उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्यावरून राज व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मराठी व हिंदी भाषेचा वाद सुरु असून या मराठीच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २० वर्षानंतर एकत्र आले. यातच आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एएनआय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना होत असलेल्या मारहाणीवर भाष्य केले. तसेच ठाकरे बंधुंना उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असे थेट आव्हान दिले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे. तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं. आपल्या घरात कोणीही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पिक विमा योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्यात येणार आहे. यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती. परंतु आता पिक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिले होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र सरकारने मध्यस्थ आणि सेवा प्रदान करणाऱ्या संस्थेसोबत शेतकऱ्यांनाही काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेचे लाभ घेण्यासाठी खोटी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून, काही ठिकाणी पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पुढील चार दिवसांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र दक्षिण गुजरात व मराठवाड्यासह विदर्भाचा बहुतांश भाग पावसाने व्यापणार आहे. किनारपट्टी प्रदेशात बहुतांश भागात अधून मधून वादळी वाऱ्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोर पकडला. अंधेरीमध्ये पावसामुळे सबवेमध्ये पाणी साचल्याने ती वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली. शहरात आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला…
जळगाव : प्रतिनिधी हतनूर येथील रहिवासी अमोल बाबुराव पाटील हे त्यांचे नातेवाईकांना भेटण्यासाठी पाळधी येथे आले असता ते त्यांना भेटून मुसळी येथे जात असताना त्यांना महामार्गावर कंटेनरने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या वेळी पळून जाणाऱ्या कंटेनरचा पाळधी पोलीसांनी पाठलाग करून त्याला ताब्यांत घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि.६ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील महामार्गावरून हतनूर येथील रहिवासी अमोल बाबुराव पाटील हे पाळधी येथील नातेवाईकांना भेटून मुसळी येथे आपल्या दुचाकी क्र. एम एच १९ ए आर ५८२४ ने जात असताना त्यांना कंटेनर क्र. एम पी ०९ जी एच ५००३ ने धडक दिली.…
एरंडोल : प्रतिनिधी पुरे भागातील जय हिंद चौक परिसरात उषाबाई भिका बडगुजर (५२) या महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून तीन तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी ३८ हजार रुपयाचे सोने-चांदीचे दागिने व १ हजार ५५० रुपये रोकड असा एकूण ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी भल्या पहाटे येथील जय हिंद चौक परिसरात घडली. याबाबत उषाबाई बडगुजर यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, उषाबाई भिका बडगुजर या एकट्याच राहतात. त्यांचे पती भिका बडगुजर हे रेल्वे खात्यात भुसावळ डिव्हिजनमध्ये केबिन मॅन या पदावरून निवृत्त झाले होते. मात्र त्यांचा २००३मध्ये मृत्यू झाला.…
अमळनेर : प्रतिनिधी दुचाकीवरून अवैध देशी, विदेशी कंपनीचा दारूसाठा घेऊन जाणाऱ्या तालुक्यातील जानवे येथील एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळील ४३ हजार २५५ रुपये किमतीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांना एका दुकानातून देशी, विदेशी कंपनीचा दारूसाठा एक जण दुचाकीने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पो. कॉ. हितेश प्रकाश बेहरे, पो. ना. प्रमोद बागड़े, पो.कॉ. शेखर सालुंखे, पो. कॉ. गणेश पाटील यांच्या पथकाने शहरातील धुळे रोडवर एच.पी. गॅस गोडावूनसमोर ही कारवाई केली. नीलेश अशोक पाटील (वय २५ रा.जानवे) हा मोटारसायकलवर कापडी झोल्यांमध्ये दारू घेऊन…
जळगाव : प्रतिनिधी मला न्यायालयाच्या तारखेवर हजर करा, असे म्हणत हर्षद रब्बी पटेल याने जिल्हा कारागृहात गोंधळ घालत व बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत अंबादास जुलाल देवरे या कर्मचाऱ्यास शनिवारी मारहाण केली. पटेल याच्यासह अन्य बंद्यांना बॅरेकच्या बाहेर काढलेले होते. बॅरेकमध्ये परत जाण्याची वेळ झाल्याने देवरे यांनी त्यास बॅरेकमध्ये जाण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार देत माझी न्यायालयाची तारीख आहे, मला तारखेवर पाठवा असे सांगितले. त्यावेळी सुभेदार सुभाष खांडरे यांनी पोलिस पथक उपलब्ध नसल्याने तारखेवर नेता येणार नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे तो देवरे यांच्या अंगावर धावून आला. मारहाणही केली. या प्रकरणी अंबादास देवरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल…
मेष: कौटुंबिक जीवनात, तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. बऱ्याच काळानंतर, तुम्हाला एक जुना मित्र भेटेल, ज्याच्याशी तुम्ही तुमचे मन मोकळे करू शकाल. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. वृषभ: नशिबाच्या पूर्ण पाठिंब्याने, तुमचे काम सहज पूर्ण होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळत राहील. आरोग्याच्या बाबतीत दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला काही हंगामी आजारांचाही त्रास होऊ शकतो. मिथुन: तुमची कमाई देखील वाढेल. तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये पूर्ण रस घ्याल, ज्यामुळे तुमचा आदरही वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने तुम्ही काही नवीन कामात हातभार लावाल. शेअर बाजारात किंवा सट्टेबाजीत पैसे गुंतवणाऱ्यांनाही आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कर्क: तुम्हाला एकामागून एक चांगल्या…
जळगाव, दि. ६ जुलै (जिमाका वृत्तसेवा): जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. गेली अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस स्टेशन आता सुमारे ४ कोटी रुपये खर्चून अवघ्या १५ महिन्यांत बांधलेल्या स्वतंत्र व ‘कॉर्पोरेट लूक’ असलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी भौतिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून…

