Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील विद्यानगरात दि. ७ जुलै रोजी दुपारी छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय हार्दिक प्रदीपकुमार अहिरे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अहिरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, विद्यानगरातील रहिवासी प्रदीपकुमार अहिरे हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. रावेर तालुक्यातील केऱ्हाडे येथील एका माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये प्रदीपकुमार आणि त्यांच्या पत्नीने पुणे येथील एका संस्थेतून हार्दिकला ९ महिन्याचा असतांना दत्तक घेतले होते. हार्दिक त्यांच्या जीवनातील आनंदाचा स्रोत बनला होता. सोमवारी दुपारी ३ वाजता हार्दिक शाळेतून घरी आला. चहा-बिस्किटे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मीरा भाईंदर येथे आज झालेल्या राड्यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनुसार सशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असे त्या मनसेच्या मराठी स्वाभिमान मोर्चात झालेल्या गोंधळावर भाष्य करताना म्हणाल्यात. सुप्रिया सुळे यांनी आज राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मीरा भाईंदरमध्ये उद्बवलेल्या परिस्थितीसाठी सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत. आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्रात आहेत. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरू आहे. अशावेळी राज्याचे गृहखाते काय करत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठी अस्मितेच्या मुद्यावरून मीरा-भाईंदरमध्ये आज मनसे आणि शिवसेनेकडून (ठाकरे गट) मोर्चाची हाक देण्यात आली होती. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये आज मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. तसेच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले होते. तरीही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम होते. यावेळी मनसैनिकांची पोलीसांकडूंन धरपकड सुरू करण्यात आली. परंतु, मराठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर पोलिसांनी बालाजी हॉटेल चौक ते मीरारोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली. त्यामुळे मीरा भाईंदरमधील हा मराठी मोर्चा काहीप्रमाणात यशस्वी ठरला आहे. यानंतर आता अविनाश जाधव यांच्यासह पदधिकाऱ्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदी – मराठी भाषेवरून राजकारण तापले असतांना मिरा भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानातील मालकाला मराठी बोलण्यावरून मनसैनिकांनी चोप दिला होता. यानंतर मराठी अमराठी वाद उफाळून आला. येथील व्यापाऱ्यांनी मनसैनिकांनी केलेल्या मारहाणाचा मोर्चा काढून निषेध नोंदिविला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी मोठी कारवाई करत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांना आज पहाटे त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र अविनाश जाधव आणि मनसैनिक मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी आज पहाटे अविनाश जाधव यांना तब्यात घेतले आहे. तसेच मनसेच्या…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेचा विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी अजयसिंग राजपत यांचे निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणी समता सैनिक दलातर्फे तालुका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ममराज राठोड यांना सोमवारी निवेदन देऊन करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, १५ जुलैपर्यंत कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत आरोग्यसेविकेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. जातीयवाद केल्याबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात १७ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. याअनुषंगाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबन करून शिस्तभंग कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु या घटनेस जवळपास एक महिना झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रामेश्वर कॉलनी येथे सोमवारी सकाळी ११:३० वाजता एक हृदयद्रावक घटना घडली. अकरावीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, १७ वर्षीय खुशी चैत्राम जाधव या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुशीचा भाऊ मयूर जाधव तिच्या अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात गेला होता. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. मयूर घरी परतल्यानंतर त्याला खुशी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हा धक्कादायक प्रकार पाहून त्याने हंबरडा फोडला. त्याच्या आवाजाने शेजारी धावून आले आणि त्यांनी तत्काळ खुशीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील समतानगर भागातील २० वर्षीय सागर अशोक नन्नवरे या तरुणाचा सोमवारी झोपेतच मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, सागर नन्नवरे हा पेंटिंगचे काम करत होता. रविवारी रात्री तो नेहमीप्रमाणे जेवण करून झोपला. सकाळी त्याची आई सुनीता नन्नवरे कामावर गेल्यानंतर सागर झोपेतून उठला. त्याने गल्लीत चक्कर मारली आणि काही मित्रांसोबत वेळ घालवला. त्यानंतर तो पुन्हा घरी येऊन झोपी गेला. सोमवारी सकाळी १० वाजता सुनीता नन्नवरे कामावरून घरी आल्या. मुलाला कामाला उशीर होत असल्याचे सांगत त्यांनी सागरला उठविले मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. सागरच्या मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून सागरला मृत घोषित…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील कुन्हा येथील एका सातवीच्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न घडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी दुसऱ्या शाळेच्या एका जिन्याखाली तोंड व पाय बांधून बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. हा प्रकार म्हणजे मुलीचे अपहरण करून तिचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाविरोधात कुऱ्हा पोलिस चौकीत आक्रोश केला. नातेवाइकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर वृत्त असे कि, सातवीत शिकणारी ही विद्यार्थिनी संध्याकाळी शाळा सुटल्यावर लघुशंकेसाठी गेली असता तिघा तरुणांनी तिच्या तोंडाला रुमाल लावल्याने ती बेशुद्ध झाली. त्यांनी तिच्या तोंडाला रुमाल बांधून फरफटत शाळेच्या मागे असलेल्या दुसऱ्या शाळेच्या जिन्याकडे नेले…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपिक यांना ३६ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, धनाजी नाना विद्यालयात कार्यरत शिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित खिरोद्यातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पीतांबर महाजन (५७, रा. चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आरोपी आशिष यशवंत पाटील (२७, रा. उदळी, ता. रावेर) यांना धुळे ‘एसीबी’ने अटक केली आहे. सोमवारी, ७ रोजी सायंकाळी झालेल्या या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोर हादरले आहे. धुळे ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक…

Read More

मेष राशी चिंताजनक बातम्यांनी आज होणार दिवसाची सुरूवात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वयाने काम करा. नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदार मिळतील. विरोधक तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतात. सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. वृषभ राशी आज जमीन, इमारत, वाहन संबंधित कामात कमी अडथळे येतील. तुम्ही तुमच्या शौर्याने काहीतरी नवीन कराल. पण सुरुवातीला जास्त संघर्ष करावा लागेल. हळूहळू परिस्थिती सुधारेल. मित्रांसोबत वेळ घालवून आनंद वाढेल. मिथुन राशी पैशांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. नोकरीत बढती मिळेल आणि आर्थिक लाभही मिळेल. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या खटल्याचा निर्णय…

Read More