मुंबई : वृत्तसंस्था “आमदार संजय गायकवाड आता शिवसैनिक नाहीत. ते आता एसंशी पक्षाचे आहेत. ते म्हणत असतील तर त्यांना मार्शल आर्ट येत असेल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणते आर्ट येते?, असा टोला लगावत आम्ही नाही करू शकलो असे म्हणतात तर तुम्ही करा. प्रत्येक वेळेला आम्ही का जबाबदार धरता? आज सरकारमध्ये जे बसले आहेत गेली अडीच वर्षांपूर्वीही होते. मात्र त्यांची हास्यजत्रा सुरु आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आझाद मैदान येथे सुरु असलेल्या गिरणी कामगारांच्या आंदोलनास भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मला मार्शल आर्ट येते, असे संजय गायकवाड म्हणतात, असे यावेळी उद्धव…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या कृतीवर विधानपरिषदेत विरोधकांनी आक्षेप घेतला. विधानपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार निवासात काही घाण असेल किंवा चुकीच्या काही गोष्टी असतील तर स्वतंत्रपणे त्यावर कारवाई करावी. पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे चुकीचे आहे. त्यांनी जे केले ते चुकीचेच आहे. यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते. निश्चितपणे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर आता सर्वच विरोधकांनी ठाकरे बंधूना लक्ष केले आहे. त्यात उद्धव ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे आता भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण यांनी ट्विट करत म्हटले की, उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यांना हिंदूत्व, मराठी माणूस, कोकणची जनता व गिरणी कामगार यांचे प्रश्न दिसू लागले. सत्ता असताना कुठेही कोकणाला न्याय नाही, गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत. मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहिले नाही. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा, असा आरोप राणे यांनी केला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. आमदार निवास मधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितले की, रात्री दहा वाजता माझी जेवणाची वेळ असते. त्यामुळे काल रात्री मी नऊ-साडेनऊ वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती. त्यात भातासोबत वरण मिक्स करुन मी पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटले…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील विशाल परशूराम पाटील (वय ३७) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात विशाल पाटील हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. सोमवारी दि. ७जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या के ली. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचे नातेवाईक राहूल पाटील यांच्यासह शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार पवन उर्फ बदया दिलीप बावीस्कर (वय २५) याला सोमवारी दुपारी तुकारामवाडी परिसरात सूरा घेवून दहशत माजवितांना जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध कुठलीही परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून तो वावरत असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तुकाराम वाडी परिसरातील पवन उर्फ बदया दिलीप बावीस्कर याला दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार असतांना पवन बावीस्कर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून तुकारामवाडी परिसरात सुरा घेवून दहशत माजवित असल्याची एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलीसांच्या पथकाने तुकारामवाडी…
जळगाव : प्रतिनिधी शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना धरणगाव येथे घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई रघूनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ) या महिलेवर पुणे येथे उपचार सुरु असतांना त्यांचा दि. ८ रोजी दुपारी मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली. सविस्तर वृत्त असे कि, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या मुलीकडे गेलेल्या लीलाबाई प्रमाणावर कर्ज केल्यामुळे विसपुते यांनी नातवाला रागविले होते. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याच्या घटना घडल्या होत्या. दि. २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तेजस…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे मंगळवारी सकाळी पंढरपूरहून घरी परतलेल्या आईला आपल्या मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून मोठा धक्का बसल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. रामेश्वर लक्ष्मण भोई ऊर्फ सचिन (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरची आई मंगलाबाई या काही दिवसांपासून पंढरपूरला गेल्या होत्या. सचिन घरात एकटाच राहत होता. मंगळवारी सकाळी ९ वाजता मंगलाबाई पंढरपूरहून आपल्या घरी परतल्या. घरी येताच समोर मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. रामेश्वर आणि त्यांची आई मंगलाबाई हे दोघेच घरात राहत होते. काही वर्षांपूर्वी रामेश्वरच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे रामेश्वरच आईचा एकमेव आधार…
मेष राशी या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज तुम्हाला पैशाचा लाभ मिळेल. आज जर तुमचे मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण असेल तर ते सोडवले जाऊ शकते. आज तुम्हाला कुठूनतरी अचानक फायदा होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात बराच काळ तणाव चालू असेल तर तो संपुष्टात येऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडूनही लाभ मिळू शकतो. सामाजिक संपर्कातूनही तुम्हाला फायदा होईल. वृषभ राशी आज तुमचा खर्च वाढेल. वैवाहिक जीवनात बऱ्याच काळापासून असलेला तणाव आज दूर होईल. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. प्रेम जीवनात तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत सहलीचे नियोजन करू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळतील. उद्योगातील लोकांना भरभराटीचा दिवस आहे. मात्र, तब्येतीची…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची केंद्रिय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली. कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकाटे आणि रावल यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. या बैठकीमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचा दर 40-45 रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क…

