मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने आयकरची नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉटेल, प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाही अशीच एक नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग असेल इतर विभाग असतील हे त्यांचे काम करत आहे. त्यांचे काम करत आहे, त्यात काही गैर नाही. 2019 आणि 2024 मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ यावर स्पष्टीकरण मागितले आहे, ते त्यांचे काम…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा आज (दि. १०) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारयांनी विधान परिषदेत केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गणेशोत्सवाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका यांनी स्पष्ट केले. भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी रासने यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राज्यात सर्वप्रथम १८९३मध्ये लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरु केला. त्यापूर्वी महाराष्ट्रातील घरोघरी हा उत्सव सुरु होता. काही लोकांनी वेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा आणली; पण…
नागपूर: वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु असून नागपूरसह संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पूरस्थिती आणि पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरांचे नुकसान झाले असून, रस्ते, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. हवामान खात्याने नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. पावसाने उसंत घेतली असली तरी, पुराचे पाणी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी विदर्भातील जनजीवन वेठीस धरले आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी, परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी काही काळ लागणार असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने लष्कराला पाचारण केले असून, संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आहे. अतिवृष्टीमुळे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी ९.०४ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले.सुरुवातीच्या माहितीनुसार,4.4 तीव्रतेचा भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील रोहतक येथे होता. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये हा तिसरा भूकंप धक्का आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारी आणि १९ एप्रिल रोजीही भूकंपाचे धक्के बसले होते. दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) परिसराला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. याचे हादरे उत्तर भारतातील अनेक भागांतही जाणवले.या भूकंपामुळे इमारती हादरल्याने, घाबरलेले रहिवासी घराबाहेर मोकळ्या जागेकडे धावले. तथापि, या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या झज्जर येथे सकाळी…
जळगाव : प्रतिनिधी अचानक घरामध्ये घुसून उद्देश मंगेश पाटील (२५, रा. हरिविठ्ठलनगर) व त्यांचा शालक राकेश रामदास सूर्यवंशी यांना दोन जणांनी मारहाण केली, तसेच पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना ८ जुलै रोजी, हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करणारे उद्देश पाटील हे हरिविठ्ठल नगरात परिवारासह राहतात. ८ जुलै रोजी घरामध्ये शालकासह गप्पा करीत असताना अचानक तेथे दोन जण आले व त्यांनी दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने पाटील यांच्या कानावर व पोटावर वार केले. यात त्यांना जबर दुखापत झाली.…
जळगाव : प्रतिनिधी वर्गामध्ये मुले भांडण करीत असल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने चापटांनी मारहाण करीत पोटाला चिमटा घेतल्याप्रकरणी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ जुलै रोजी अभिनव शाळेत घडला. सविस्तर वृत्त असे कि, शाहू नगरातील रहिवासी शरिफा सत्तार भिस्ती या महिलेचा मुलगा मोहम्मद अजहर शेख इकबाल हा अभिनव शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ८ जुलै रोजी दुपारी वर्गातील मुलांचे भांडण झाले. यावरून शिक्षिका नीता शैलेश पाटील (४४) यांनी अजहरला चापटांनी मारहाण करीत पोटाला चिमटा घेतला. हा प्रकार त्या मुलाने आईला सांगितल्यानंतर त्याच्या आई शरिफा सत्तार भिस्ती यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिक्षका…
जळगाव : प्रतिनिधी शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींच्या छेडखानीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी शहरातील विविध शाळा, महाविद्यालय परिसरात कारवाई केली. शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांकडून विद्यार्थिनीची छेड काढली जात असल्याच्या तक्रारी येत आहे. या प्रकाराची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेत शाळा, महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईच्या सूचना पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना दिल्या. पोलिस दलाच्यावतीने प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असून यासाठी अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली. पाच टवाळखोरांना पथकाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेले. याठिकाणी त्यांच्या पालकांनादेखील बोलविण्यात आले. त्या टवाळखोरांसह त्यांच्या पालकांना समज देऊन सोडून देण्यात आले. तसेच कारवाईची ही…
जळगाव : प्रतिनिधी पैसे व दागिने घेऊन जळगावच्या मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणात मीना प्रकाश बोरसे हिला बुधवारी (९ जुलै) बऱ्हाणपूर येथून अटक करण्यात आली. तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या मुलीचे परस्पर कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यासह लग्नासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तसेच कोल्हापूर येथील आशिष गंगाधरे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याने मुलीनेही दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार, पोस्को व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या शिवाय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील प्रकरणातही गुन्हा दाखल आहे.
पारोळा : प्रतिनिधी बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत, दोन चोरट्यांनी एका इसमाच्या खिशातून ५० हजार रुपयांची चोरी करून पसार होत असताना, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले, तर एक फरार झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण मानसिंग पवार (जुनोने, ता. रावेर) हे पारोळा येथील त्यांचे चुलत सासरे धनराज चव्हाण यांच्याकडून ऊसतोडचे पैसे घेऊन बस स्थानकावर आले असता, तरुणाने त्यांना धक्का दिला. बसमध्ये चढल्यानंतर त्यांना त्यांच्या खिशातील पैसे गायब असल्याचे दिसून आले. त्याच वेळी इसमाचाही मोबाइल चोरीस गेला. या चोरीतले दोन चोरटे चोरी करून पळत असताना पोलिस आशिष पुरुषोत्तम गायकवाड आणि दीपक हिलाल पाटील यांनी कन्हय्या रमेश चव्हाण (काळेनगर,…
मेष: मालमत्तेवरून वाद होऊ शकतो. कुटुंबात तुम्ही काहीही ऐकणार नाही. जर तुम्ही तुमच्या प्रियकर आणि जीवनसाथीशी हट्टीपणे वाद घातला नाही तर दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. वृषभ: तुम्हाला मित्रांकडून मदत मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद येईल. घरात तुमच्या मोठ्या भावाशी समन्वय ठेवा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. मिथुन: व्यवसाय करणाऱ्यांनी संयम आणि संयमाने काम करावे. सामाजिक पातळीवर तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्ही तुमच्या प्रियकर आणि जीवनसाथीसोबत जुन्या आठवणी ताज्या कराल. कर्क: कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही पगारवाढीबद्दल न बोलणे ही तुमची कमजोरी आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यात गोडवा…

