Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेवरून मोठा वाद सुरू असून, सिनेसृष्टीतील अनेक कलाकार याविषयी मत मांडताना दिसत आहेत. या वादावरून बॅालीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने भाष्य केले आहे. मुंबईत केडी: द डेव्हिल या दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेलर लॅान्स सोहळ्यात तिने यावर आपले मत मांडले आहे. माध्यमांसोबत बोलताना एका पत्रकाराने तिला महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादावर प्रश्न विचारला होता. मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि मला मराठी येते, असे उत्तर शिल्पाने दिले. तिने दिलेल्या या उत्तरामुळे सगळेजण तिच्याकडे पाहतच राहिले. तसेच सिनेमाला कोणतीही भाषा नसते, सिनेमा हीच भाषा असे सांगायला देखील शिल्पा विसरली नाही. आम्ही आज केडीबद्दल बोलायला आलो…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृह जळगाव येथे गेल्या काही महिन्यापासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत येत असून आता पुन्हा एकदा एका मतीमंद मुलीला सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वसतिगृहातील दुसऱ्या एका मुलीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाली आहे. यावर आता चौकशी समिती नेमली गेली असून या घटनेची सखोल माहिती घेण्याचे काम सुरु आहे. सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृह येथे दि.४ जुलै 2025 रोजी सकाळी 7 ते 8 वाजे दरम्यान एका ३२ वर्षीय मतीमंद मुलीला याच वसतिगृहातील एक ते दोन मुलींनी मारहाण केल्याची घटना घडली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जुगार मोठ्या प्रमाणात सुरु असतांना आता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या लेखी आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने ‘हॉटेल रॉयल पॅलेस’ येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १९ लाख ९७ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि १३ मोबाईल हँडसेटसह ८ जुगारींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुरूवारी १० जुलै रोजी मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी भाषा बोलावीच लागेल. महाराष्ट्र मध्ये राहून मराठी भाषेचा अपमान कोणी केला तर सहन केले जाणार नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा एल्गार पुन्हा एकदा केला होता. त्यासाठी त्यांनी 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका व्यासपीठावर येत सभा देखील घेतली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. यासंदर्भात प्रहार पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथे सातबारा कोरा यात्रेला भेट दिली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांची…

Read More

भडगाव : प्रतिनिधी शहरातील यशवंत नगर भागातील २१ वर्षीय अजय गुलाब पवार हा तरुण शेतात कामाला जात असताना समोरून येणाऱ्या कारने ओव्हरटेक करत असताना या दुचाकी स्वरास उडवले. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ रोजी सायंकाळी पाचोरा रस्त्यावरील भडगाव येथील आरटीओ कार्यालयाजवळ घडली. याबाबत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत राजेंद्र रामचंद्र मोरे (भडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अजय पवार हा दुचाकीने जात असताना कारने त्याला धडक दिली. बराच वेळ तो कारखाली पडून होता. त्याच्या तोंड व नाकावर गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर राजेंद्र मोरे व विनोद पांडुरंग मोरे, किशोर भरत मालचे, दादू झुंबर कांबळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी केटरिंगच्या कामाच्या अवघ्या १३०० रुपयांच्या वादातून केसी पार्कजवळ बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रवीण ऊर्फ सोनू देवरे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रवीण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मावशीलाही मारहाण करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, रेखा जगदीश खत्री (वय ४८, रा. जोशी वाडा, मेहरूण) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा संजय खत्री हा केटर्सचा व्यवसाय करतो, त्याच्याकडे यश सपकाळे हा कामाला होता. यश सपकाळे याचे १३०० रुपये संजयकडे घेणे बाकी होते. यावरून बुधवारी दुपारी व रात्री वाद झाला. यातून संजयला मारहाण केली. मध्यस्थी करणारा त्याचा आत्येभाऊ प्रवीण ऊर्फ सोनू…

Read More

फैजपूरः प्रतिनिधी आमोदा-बामणोद दरम्यान रविवारी रात्री दोन दुचाकींचा अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या जलील खालील तडवी (२४, रा तडती वाडा, फैजपूर) याचा गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, आमोदा मोर नदीपात्रात रविवारी पहाटे लक्झरी बस कोसळली होती. त्यातही एक महिला ठार झाली व त्याच दिवशी रात्री आमोदा गावाजवळील हॉटेल मानसीजवळ दोन दुचाकींची धडक झाली होती. त्यात जलील हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ९:३० वाजता हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. प्रमोद श्रीराम बाविस्कर (५०, रा. चंदू अण्णा नगर, जळगाव) असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, प्रमोद बाविस्कर गुरुवारी रात्री ९:३० वाजता आपले हॉटेल रायबा हे बंद करून जळगावला जाण्यासाठी कारमध्ये बसले. त्याच वेळी दोन जण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी हॉटेल सुरू करून दारू देण्याची मागणी केली. बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले.  यावर संतापलेल्या हल्लेखोरांनी थेट प्रमोद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गुरुवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणासह दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा नदीत तर दुसऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पहूर (ता. जामनेर) आणि वरणगाव (ता. भुसावळ) येथे या घटना घडल्या. ऋषीकेश समाधान किरडकर (१९, रा. पहूर) व बासीत खान रशीद खान (३८, रा. धानोरा, ता. चोपडा, ह.मु. ईमलीवाडा, वरणगाव) अशी या मृतांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, ऋषीकेश याचा शेतातील विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मृतदेह दोन तासानंतर बाहेर काढण्यात आला. ऋषीकेश हा एकुलता होता. पोलिस भरतीची तयारी करीत होता. पोलिस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. तो आजोळी राहत…

Read More

मेष राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे व्यवसायात नवी ऊर्जा येईल. यामुळे कमाई वाढण्याची शक्यता आहे. दिवसाची महत्त्वाची कामं सकाळीच पूर्ण करा. मुलांकडून काही चिंता वाढवणारी बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे त्रस्त व्हाल. शत्रूंपासून सावध राहा. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या स्वभावात शांतता आणि संयम ठेवा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. राजकारणात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमची कोणतीही सरकारी कामं अडकली असल्यास ती पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात नवीन करार झाल्यामुळे तुमचा मान वाढेल. काही अप्रिय लोकांशी भेट झाल्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. मुलांबद्दलची कोणतीही चिंता आज…

Read More