Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
    राजकारण

    राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

    editor deskBy editor deskJuly 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात पावसाचा पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नद्या-ओढे दुथडी भरून वाहत असून काही सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्ण ताकदीने सक्रीय झाल्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगडमध्ये आज संध्याकाळनंतर आणि रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या भागांत जोरदार पावसाने कहर केला असून, काही भागांत घरांत पाणी शिरले असून, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, एनडीआरएफचे पथक सज्ज करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आवश्यकतेनुसार तात्पुरत्या सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे दिले आहेत.

    हवामान खात्याने येत्या 48 ते 72 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा दिला असून, नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे धरण व्यवस्थापन आणि जलस्रोत विभाग यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाल्यांपासून दूर रहावे आणि अधिकृत इशारे आणि सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या या अचानक वाढलेल्या पावसामुळे पिकांचे, घरांचे आणि दळणवळणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.