Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हनीट्रॅपची जोरदार चर्चा सुरु असतांना आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. इतकेच नाही तर प्रफुल्ल लोढा प्रकरणावर त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळात या प्रकरणातील मोठा मासा बसलेला असल्याचा दावा त्यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांची केवळ आठच आमदार निवडून येण्याची क्षमता होती, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार…

Read More

सातारा : वृत्तसंस्था शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली. एक हात मुलीच्या गळ्यात होता, तर दुसर्‍या हाताने चाकू उगारत तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देत होता. तो कोणालाही पुढे येऊ देत नव्हता. मुलीच्या गळ्यावर चाकू लावल्यामुळे बघणारे काहीही करू शकत नव्हते. त्याचवेळी पाठीमागून एकाने झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर जमावाने त्या मुलाला बेदम चोप दिला. अधिक माहिती अशी, संशयित मुलगा गेल्या काही महिन्यांपूर्वी बसाप्पा पेठेत राहत होता. त्यावेळेपासून तो अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला समज दिली होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील आमदार निवासातील कँटीन चालकास मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेले, आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये वेटर आणि कुकला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता त्यांनी थेट माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना चॅलेंज दिले आहे. संजय गायकवाड यांनी जाहीरपणे म्हटले की, मुंबईतील आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही. हे चॅलेंज देत त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद न ठेवण्याचा निर्णय…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील रामकृष्ण नगरजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेस पोलीस असल्याची बतावणी करत तिघा अनोळखी व्यक्तींनी तब्बल १ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची धक्कादायक घटना २० जुलैला सकाळी घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जुने विमानतळ परिसरातील नवलेवाडी येथील शोभा सीताराम देवरे (वय ६५) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शोभा देवरे या सकाळी ६.१५ वाजता दररोजप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या. सुमारे ६.४५ वाजता मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरच्या पाटीजवळ दुचाकीवरुन दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून महिलेस तिसऱ्या व्यक्तीजवळ…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यात १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची घटना उघडकीस आली असून पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना तिची पारोळा बसस्थानकावर एका मुलासोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून शहरातील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी २०२५मध्ये घडला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या नराधमाने मुलीला दुसऱ्या एका हॉटेलवर नेत तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार केला. गेल्या काही दिवसांपासून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मेहरुण परिसरातील शुभांगी कुणाल नाईक या मृत्यूप्रकरणी विवाहितेच्या तिचा पती कुणाल रवींद्र नाईक (रा. मेहरुण) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील शुभांगी नाईक या विवाहितेने शनिवारी (१९ जुलै) दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला होता. या प्रकरणात विवाहितेचे वडील राजेंद्र भागवत वाघ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, शुभांगीचा पती कुणाल याने तिला वारंवार मारहाण करून व शिवीगाळ करून तिचे जगणे कठीण केले व…

Read More

मेष : दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. विरोधकही सहकार्य करतील. नवीन काम सुरू करू शकता, ज्याचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस सकारात्मक राहील. नफा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : कामाच्या ठिकाणी नफा मिळण्याची शक्यता आहे. जुने काम सोडून देऊ शकता. नवीन काम सुरू करणे शक्य आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबाच्या खरेदीवर खर्च होऊ शकतो. मिथुन : कामात अस्थिरता असेल. बाह्य प्रवास शक्य आहे, परंतु यशाची शंका आहे. केलेले काम बिघडू शकते, सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. खर्च वाढू शकतो, अनावश्यक खर्च टाळा. अभ्यासात रस कमी वाटेल. लक्ष विचलित होऊ शकते. कर्क : तुम्हाला खूप मेहनत करावी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लातूरमध्ये छावा संघटनेचे नेते विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने राज्यात खळबळ उडवली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला, असे मनोज जरांगे म्हणालेत. तसेच या प्रकरणी गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे रविवारी लातूर दौऱ्यावर आले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकत सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषि मंत्र्याचा राजीनामा…

Read More

दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला ‘देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याचा,’ दावा केला आहे. जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली असल्याचे सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुकही केले. पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण जगाने भारताच्या लष्करी सामर्थ्याचे, भारतीय सैन्याच्या ताकदीचे रूप पाहिले आहे. भारतीय सैन्याने ठरवलेले १०० टक्के लक्ष्य साध्य केले. शत्रूच्या घरात घुसून, दहशतवादी अड्डे २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले. संपूर्ण जगाने मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. जेव्हा जेव्हा मी परदेशातील सहकाऱ्यांना भेटतो तेव्हा त्याचे कौतुक…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था जिल्ह्यातील आडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने, ‘आई माझ्या शिक्षणाचा त्रास नको घेऊ’, अशी भानविक चिठ्ठी लिहित जीवन संपवले आहे. सदर मुलीचे आई पोलिस अंमलदार आहे. तिने गळफास घेण्यापूर्वी आईला चिठ्ठी लिहिली आहे. पूजा दीपक डांबरे (२०, रा. विहंग अपार्टमेंट, व्ही. डी. कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पूजा नुकतीच बारावी पास झाली. तिने प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षणही सुरु केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहात होती. ‘आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार…

Read More