नवी दिल्ली: वृत्त संस्था भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानच्या अनेक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले आणि त्यांची अमेरिकेत बनवलेली एफ-१६ आणि चिनी जेएफ-१७ यासह ८-१० पाकिस्तानी लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली, असा खुलासा भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी आज (दि. ३) केला. हा संघर्ष वेग आणि अचूकतेने उद्दिष्टे साध्य करणारा, तसेच पाकिस्तानला ‘गुडघे टेकायला लावणारा’ म्हणून इतिहासात लक्षात राहील, असेही ते म्हणाले. ९३व्या हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर स्पष्ट आदेशासह सुरू झाले आणि भारताने आपले उद्दिष्ट साध्य केल्यामुळे ते त्वरीत थांबवण्यात आले. हवाई दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर जयदीप सिंह…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोजित केलेल्या एका मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका करण्यात आली. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील काही धक्कादायक वक्तव्य केली होती. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसा आणि मृत्यूच्या संवेदनशील मुद्द्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राजकीय वातावरण ढवळून काढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले, मृत्युपत्र कोणी केले व सही कोणाची घेतली याबाबत माहिती घ्यावी, अशी मागणी रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या मेळाव्यात केली. कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव किती दिवस…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कासमवाडी परिसरात दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (वय-२७) या तरुणावर जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला मुख्य आरोपी नामे योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दि. ०३/१०/२०२५ रोजी सीसीटीएनएस गु.र. नं. ७०६/२०२५, भारतीय नवसंहितेतील…
बीड : वृत्तसंस्था गेले २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असं विधान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात केलं. त्यांनी केलेल्या विधानानंतर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केला आहे. बीडच्या सावरगाव घाटावरील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या या विधानावर करुणा शर्मा-मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाऊ-बहिणीच्या संबंधांवर, साखर कारखान्यांवर आणि राजकारणातील गुंडगिरीच्या मुद्द्यांवरून टीका केली. या मेळाव्यात मुंडे बहिण…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील वाळूज भागातील लिंबेजळगाव येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी घर-जिवळ असलेल्या एका खड्ड्याजवळ गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२) भरदुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, इमरान इसाक शेख (वय २०), इम्मू इसाक पठाण (१०), जानू बाबू पठाण (१०) आणि गौरव दत्तू तारक (१०) अशी या मुलांची नावे आहेत. यातील तिघे मुले लिबेंजळगाव जि.प. प्रशालेत शिकत होती. गौरव हा एकुलता एक मुलगा होता. वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती संभाजीनगर-पुणे रोडवरील लिंबेजळगाव शिवारातील गट क्रंमाक १७६ मधील शेत वस्तीवर शेख कुटुंब वास्तव्यास आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे महामार्गावरील सावदा वळण रस्त्यावर ट्रालाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोनगाव येथील प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, येथील महामार्गावरील सावदा वळण रस्त्यावर सुरतहून कोलकाता येथे जाणारा ट्राला (एचआर- ५५, एएक्स ७७४६) ने जळगावहून पाळधीकडे येणाऱ्या दुचाकी (एमएच- १९, सीए – १९६२) ला दिलेल्या धडकेत दुचाकी चालक तथा दोनगाव येथील सुधाकर नथ्थू पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जळगावच्या जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर तेथील न्यूक्लीअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुधाकर पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर वाहनांची रांग…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका तरुण नोकरदाराला एका अज्ञाताने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून १ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना १ ऑक्टोबर, बुधवारी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीने आरोपीला कोणतीही माहिती दिली नसतानाही ही फसवणूक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी रोड, शिवधाम मंदिर परिसरात राहणारे प्रणेश प्रकाश ठाकुर (वय-३४) यांनी फिर्याद दिली आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३८ वाजता ही घटना घडली. फिर्यादी प्रणेश ठाकुर यांना ८७२००६७३०७ या मोबाईल क्रमांकावरून एका व्यक्तीचा कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगत फिर्यादीकडे त्यांच्या क्रेडिट कार्डासंबंधी काही माहिती…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील वय-२७ रा. कासमवाडी असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील याचा त्याच्या घरासमोर होणाऱ्या कामातील काही तरुणांसोबत जुना वाद होता. शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे उभा असताना यातील दोन जणांनी जुन्या वादातून त्याच्या पोटावर तसेच पायाच्या मांडीवर तलवार आणि कोयत्याने वार केले. यात ज्ञानेश्वर उर्फ नाना…
आजचे राशिभविष्य दि.३ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस उत्तम जाईल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. आज एखाद्या खास कारणासाठी प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते. जवळचे नातेवाईक भेट देतील आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना आदर आणि सन्मान द्या. वृषभ राशी सध्याच्या कामाच्या पद्धतीत कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल अधिक माहिती गोळा करणे महत्त्वाचे आहे. आज मालमत्तेच्या खटल्याबाबतीत काही सकारात्मक बदल होतील. मिथुन राशी आज, तुम्ही अचानक एखाद्या मित्राला भेटाल आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर फायदेशीर चर्चा कराल. मनाची शांती मिळविण्यासाठी तुम्ही धार्मिक…
नवी दिल्लील : वृत्तसंस्था आज विजयादशमीच्या निमित्ताने देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता आणि आपल्या सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. ” असे म्हटले. संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितले की, “जर पाकिस्तानने सर क्रीक परिसरात काहीही करण्याचे धाडस केले तर यापुढे त्याचा भूगोल बदलला जाईल” असे म्हणत थेट इशाराच दिला आहे. विजयादशमीच्या निमित्ताने, संरक्षण मंत्र्यांनी गुजरातमधील कच्छ याठिकाणी एका शस्त्र पूजन समारंभात भाग घेतला. त्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकांना संबोधित करताना, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकच्या या भागात भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा…

