मुंबई : वृत्तसंस्था पिंजरा’ या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. 1972 साली प्रदर्शित झालेला व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते. एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेम कथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकेची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या. आजही ‘पिंजरा’ आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी देखील रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी गद्दार, नमकहराम व हरामखोरांना उत्तर देत नाही, अशा कडवट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले आहे. मी गद्दार व नमकहारांना उत्तर देत नाही. मला ते देण्याची गरज वाटत नाही. ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर (ई-केवायसी) सत्यापन अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. परंतु अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेतील महिलांना दिलासा दिला आहे. त्यांनी ईकेवायसीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. आदिती तटकरे काय म्हणाल्या? मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप व ठाकरेंच्या नेत्यांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतान आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप हा काही पक्ष नाही ती देश लुटणारी टोळी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार कंजूस आहेत. त्यांनी पूरग्रस्त शेतकर्यांना मदत जाहीर करणे अपेक्षित होते;पण त्यांनी शेतकरी प्रश्नावर कानात बोळा घातला आहे. गौतम अदानी यांना मुंबई विकत आहेत, ते कमिशन वरील मुख्यमंत्री आहेत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले, मृत्युपत्र कोणी केले व सही कोणाची घेतली याबाबत माहिती…
धरणगाव : प्रतिनिधी नवरात्रीनंतर देवी विसर्जनासाठी गेलेल्या एक तरुण देवी विसर्जन करताना पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे. शर्थीचे प्रयत्न करुनही तो अद्याप सापडलेला नाही. मूळ टहाकळी येथील रहिवासी व सध्या जळगाव येथील गुजराल पेट्रोल पंपाच्या मागे राहणारा हिमेश संतोष पाटील (वय १९) हा तरुण आपल्या तीन ते चार मित्रांसोबत घर बसवलेल्या दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोकणी शिवारातील रेल्वे पुलाजवळील गिरणा नदी पात्रात गेला होता. तेथे सर्व तरुण गेल्यानंतर देवीची पूजा करून ते मूर्ती विसर्जनाला गेले. याचवेळी अचानक आलेल्या प्रवाहात हिमेश पाटील हा तरुण वाहून गेला. या वेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, त्यावेळी तेथे कुणीही…
जळगाव : प्रतिनिधी विजयादशमीनिमित्त संध्याकाळी आई बाहेर गेलेली असताना बेरोजगारीला कंटाळून सुरेंद्र रामसिंग चौधरी (३३, रा. राधाकृष्णनगर) या तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) राधाकृष्णनगरात घडली. उपचार सुरू असताना रात्री ११ वाजता तरुणाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार, सुरेंद्र चौधरी हा आईसोबत राधाकृष्ण नगरात राहत होता. नोकरी, काम नसल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होता. गुरुवारी संध्याकाळी घरी एकटा असताने त्याने स्वतःला पेटवून घेतले. पेटत्या अवस्थेत ते आरडाओरड करत घराबाहेर रस्त्यावर पळत सुटला. काही तरुणांनी आग विझवून त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील हिवरखेडे बुद्रूक येथील प्रदीप कडू चांदणे (३२) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन केले. यानंतर तीन संशयितांविरुध्द जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप याची पत्नी मंगला प्रदीप चांदणे (२५, रा. हिवरखेडे बुद्रुक) हिच्या तक्रारीवरुन संशयित विनोद हरचंद महे, संतोष सोमा जोहरे व गणेश सुरेश काळे (सर्व रा. हिवरखेडे बुद्रुक) यांच्याविरुध्द जामनेर पोलिसात बीएनएस कलम १०३ (१), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मंगला हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील काही जणांनी प्रदीप याला गुरुवारी रात्री घरून नेले. रात्री १२ वाजता संशयित घरी…
आजचे राशिभविष्य दि. ४ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या कोणत्याही समस्या आज सोडवल्या जातील आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुम्हाला एका ऐतिहासिक परंपरेशी जोडण्याची एक उत्तम संधी मिळेल, जी तुम्हाला खूप काही शिकवेल. वृषभ राशी आज तुम्ही एका नवीन योजनेवर काम सुरू कराल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात अधिक फायदे मिळतील. आज तुमच्या गरजा पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. तुम्ही वेळेपूर्वी काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. या राशीखाली जन्मलेल्या लेखकांच्या कथा खूप लोकप्रिय असतील आणि त्यांच्या कथा दूरवर पसरतील. मिथुन राशी आज, तुम्ही नवीन वाहन खरेदी…
जळगाव : प्रतिनिधी ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या अधिसूचनेद्वारे,जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती पद अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या प्रवर्गासाठी सोडत पद्धतीने आरक्षित केली जाणार असून, यासाठीची सोडत सभा दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सर्व संबधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकानव्ये करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनाही या सभेस उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. असेही प्रशासनाने कळविले आहे
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाने बेरोजगाराच्या विवंचनेतून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याचा धक्कादायक घटना गुरूवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. रात्री ११ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेंद्र रामसिंग चौधरी वय ३३ रा. राधाकृष्ण नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील राधाकृष्ण नगरात सुरेंद्र चौधरी हा त्याच्या आईसोबत वास्तव्याला होता. सुरेंद्र हा सध्या बेरोजगार होता, याच हाताला काम नसल्याने तो काही दिवसांपासून विवंचनेत होता. गुरूवारी २ ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने सायंकाळी ६ वाजता त्याची आई जवळच्या दुर्गोत्सवानिमित्त…

