जळगाव : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसरातील दोन कंपन्यांमधून चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडले व शटर उचकवून आत प्रवेश केला. पूनम पेंट कंपनीतून ३० हजार रुपये तर ई सेक्टरमधील छबी इलेक्ट्रीकल कंपनीमधून एक लाख ७० हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विजय गोविंद वाघुळदे (५४, रा. मुंदडा नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा गावात चंद्रशेखर पाटील यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार केल्याच्या गंभीर घटनेतील पाच संशयित आरोपींना अटक केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७वाजता ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना सुप्रीम कॉलनी परिसरातून फिरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात राहणारे चंद्रशेखर त्रंबक पाटील (वय-५५) यांच्या घरावर शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते ८ जणांनी हल्ला केला होता पाटील यांच्या मुलाच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुचाकीवरून आलेल्या या टोळक्याने प्रथम पाटील यांच्या घरावर दगडफेक केली आणि…
जळगाव : प्रतिनिधी धुळ्याकडे जाताना दुचाकीला अपघात झाल्याने संतोष चिंतामण चंदासरे (६०) हे जागीच ठार झाल्याची घटना मंगरूळ शिवारात सोमवारी (दि. ६) रात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावचे संतोष चंदासरे हे कामानिमित्त अमळनेर शहरात आले होते. ते आपल्या मोटारसायकलने (क्र. एमएच १९ बीएच ४२३०) परत जात असताना मंगरूळच्या वृंदावन हॉटेलच्या पुढे १०० मीटर अंतरावर मोटारसायकल पडून जबर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ते सुमारे अर्धा तास पडलेले होते. हॉटेलमालक किरण पाटील, चेतन पाटील, युवराज सोनवणे, गणू पाटील यांनी त्यांना उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे कळताच हेडकॉन्स्टेबल कैलास…
आजचे राशिभविष्य दि.८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, या राशीखाली जन्मलेल्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये एक नवीन बदल अनुभवायला मिळेल जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खूप छान वेळ घालवाल. कौटुंबिक सौहार्द राखण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. काही लोक तुमच्या व्यवसायात खूप उपयुक्त ठरतील. तुम्हाला दुसऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. वृषभ राशी आज दिनचर्या व्यवस्थित ठेवा, फ्रेश वाटेल. तुम्हाला निरोगी आणि उत्साही वाटेल. तुम्ही बहुतेक कामे स्वतःहून करू शकाल. व्यवसायातील अडचणी आणि आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्यांना खर्चात कपात करावी लागू शकते. मिथुन राशी आज, तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा…
जळगाव : प्रतिनिधी आज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पद्मालय महीला प्रभाग संघातील म्हसावद बोरणार प्रभागातील श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ वसंतवाडी यांच्या माध्यमातून चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप करण्यात आला होता त्या बचतगटाच्या महिलांनी वसंतवाडी व जळके बस स्थानक याठिकाणी शॉपिंगगाळे भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला आज जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात केली. यात आदर्श समुहातुन सौ.सोनाली नरेंद्र पाटील यांना चहा फरसाण उपहारगृहासाठी , शिवकृपा समुहातील सौ.सोनाली लक्ष्मण पाटील यांना पाणी पुरी स्टाॅलसाठी , आदर्श समुहातील सौ.अनिता धनराज पाटील साडी विक्री सेंटरसाठी, उडान…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई उच्च न्यायालयाने आज हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाला (जीआर) अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे .राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देण्याचा शासन निर्णय दिला होता. या शासन निर्णयाविरोधात विविध संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या आदेशाला आव्हान दिले होते. हा २ सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना सर्वच विरोधकांनी मोठी मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी नेहमीच आंदोलन सुरु होती. राज्य सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने अखेर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी, शेतकऱ्यांना देता येईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. राज्यातील…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे ज्या दुकानातून काम करीत होताच त्याच दुकानातून १४ लाखांचे १२४ ग्रॅम सोने चोरले. चोरी केल्यानंतर हैदराबादला पळून जाण्यापुर्वीच संशयित बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. पश्चिम बंगाल) या कारागिरला तांत्रिक विश्लेषणावरुन शनिपेठ पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून चोरलेले १२४ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बालाजी पेठेत निखिल कैलास गौड (वय ३०, रा. पश्चिम बंगाल) यांचे लक्ष्मीनारायण ज्वेलर्स नावाने सोन्याचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. त्या दुकानात बिस्वजीत सासमल हा पश्चिम बंगाल येथील कारागिर गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत…
जळगाव : प्रतिनिधी मुलाला एका गुन्ह्यात अटक झाल्याच्या दोन दिवसांनंतर वडील आत्माराम प्रल्हाद सपकाळे (४५, रा.भोकर, ता. जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भादली गावात झालेल्या एका घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, यात भोकर येथील हर्षल आत्माराम सपकाळे (१८) याचाही समावेश आहे. त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते. यानंतर, त्याचे वडील आत्माराम सपकाळे यांनी ५ ऑक्टोबर रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला. त्यांना जीएमसीत दाखल केले असता डॉक्टरांनी…
जळगाव : प्रतिनिधी विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते, त्या तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. हद्दीत बोगस कॉल सेंटर सुरू असण्यासह कारवाईनंतरही संशयितांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सविस्तर वृत्त असे कि, नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून विविध देशातील नागरिकांना आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुमराबाद रस्त्यावरील बोगस कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी कारवाई केली होती. हे कॉल सेंटर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते, तरीदेखील प्रभारींना याविषयी माहिती नव्हती. याशिवाय पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अटक केलेले माजी महापौर ललित कोल्हे…

