Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी नात्याला काळिमा फासणारी घटना जळगाव शहरातील एका परिसरातून समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत वाईट नजर ठेवून असलेल्या दीराने वहिनीवर अत्याचार केला. ही बाब विवाहितेने सासूसह पतीला सांगितली असता, त्यांनी ही बाब कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. त्यानंतर देखील दि. १० रोजी संशयिताने वहिनीला जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केल्याची ही संतापजनक घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती, दीरासह सासूविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांच्या पतीला दारुचे व्यसन असल्याने ते कामधंदा करीत नाही. विवाहितेचा दीर हा गेल्या दोन वर्षांपासून…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पश्चिम बंगालमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दोघे अजूनही फरार आहेत. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली. पीडिता तिच्या मित्रासोबत जेवण्यासाठी बाहेर गेली असताना तिच्यावर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. कोलकातापासून १७० किमी अंतरावर असलेल्या दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासमोर ही घटना घडली. ओडिशातील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असलेली पीडिता सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत जेवायला बाहेर गेली होती. कॅम्पसच्या गेटवर…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथील रामपेठेतील रहिवासी तथा नगर परिषदेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सुनील भिका भुसांडे (वय ४५) यांचे बुलडाणा येथे एका दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण वरणगावात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुनील भुसांडे हे काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे जात असताना रस्त्यात अपघात झाला होता. या अपघातात सुनील भुसांडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर गत ४ दिवसपासून बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १० ऑक्टोबरलला मृत्यूशी झुंज देतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मयत सुनील भुसांडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली असा परिवार आहे. सुनील भुसांडे हे नगर…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी येथील भाजपच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे धमकी देत चक्क ३० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने वैशाली सूर्यवंशी यांना कुटनितीने तुम्हाला जिंकुन देतो, असे सांगितले होते. मात्र, वैशाली सूर्यवंशी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, सप्टेंबर २०२५मध्ये पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाइलवरुन वैशाली सूर्यवंशी यांना फोन करुन धमकावण्याची…

Read More

आजचे राशिभविष्य दि. १२ ऑक्टोबर २०२५ मेष राशी वाटेत आलेले अनावश्यक अडथळे आपोआपच संपतील. आज तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला अचानक एखाद्या धार्मिक कार्यात योगदान देण्याची संधी मिळेल. वृषभ राशी आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्ही एखाद्या परदेशी कंपनीसोबत भागीदारी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांसोबत काही सामाजिक कार्यातही मदत कराल. मिथुन राशी आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्या सर्जनशीलतेचा वापर केल्याने लक्षणीय फायदे होतील. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, अनुभवी लोकांचा सल्ला…

Read More

धुळे : वृत्तसंस्था देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आला. राज्यातील नऊ जिल्ह्यांची या योजनेसाठी निवड झाली असून ऑनलाइन पद्धतीने दोंडाईचा येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात कृषी विभागातील अधिकारी शेतकरी यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. दोंडाईचा येथील कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती होती. त्यांनी या योजनेचा उद्देश उपस्थितांसमोर स्पष्ट केला. प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभ नवी दिल्ली येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका मुख्यालय, ग्रामपंचायत,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, जे लोक छळकपट करतात त्यांना रोखलं पाहिजे. तसेच युती होऊ नये असे त्यांना वाटत असेल तर त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे विधान शिवसेनेचे नेते सामाज कल्याण विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले असून महायुतीमध्ये अंतर्गत धूसफूस असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आत्तापासूनच इच्छुकांचे संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याचा हाहाकार माजला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण कर्जमाफी आणि ओला दुष्काळ याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यावरून आता राजकारण आणखी तीव्र होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित हंबरडा मोर्चातून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेत जोरदार प्रहार केला. पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना महायुतीची सत्ता आल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली नाही. परंतु राज्याच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा अधून मधून होतच असते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होत होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत नाराज नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली. परंतु, नुकतेच सुधीर मुनगंटीवार यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रेमुळे मुनगंटीवार यांना मोठी संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू…

Read More

वडीगोद्री : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरु असून नागपूर येथे ओबीसी मोर्चा काढण्यात आला होता. जो नेता छगन भुजबळ यांच्या आहारी जातो तो संपतो, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील ओबीसी मोर्चानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यावर गुरुवारी (दि.९) केली. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसणार नाहीत. छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वडेट्टीवारसुद्धा गुंतले आहेत. चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्षनेता होता, चांगले काम करत होता, परंतु आता काँग्रेसचा सुपडासाफ करायला निघाला आहे. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठा समाजाला ४८ टक्के…

Read More