मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देशासह राज्यातील काही विरोधकांनी मतचोरीचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी आज (मंगळवार) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीवेळी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध गंभीर त्रुटींवर आवाज उठवला. यावेळी राज ठाकरे यांनी विशेषतः मतदार याद्यांमधील ‘घोळ’ आणि ‘मतदार नोंदणी’ थांबवल्याच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना-उबाठा), मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उबाठा) नेते अनिल देसाई, अनिल परब आणि…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सर्वोच्च न्यायालयाने लष्कराविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या सुनावणीवरील स्थगिती २० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. हा खटला २०२२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेशी संबंधित आहे. ज्यामध्ये राहुल गांधींवर लष्कराविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणातील सुनावणी लखनौ न्यायालयात सुरू होती, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. आता ती २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने, “याचिकाकर्त्याच्या वकिलांनी उत्तर शपथपत्र दाखल करण्यासाठी स्थगिती देण्याची विनंती करणारे पत्र सादर केले आहे, त्यामुळे हे प्रकरण २० नोव्हेंबर २०२५ साठी सूचीबद्ध आहे. ४ ऑगस्ट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मनसेचे माजी नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तीन वेळा पुढे ढकलला गेलेला हा पक्षप्रवेश आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. कोकणात भाजपची पकड मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून खेडेकरांचा हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. मनसेतील राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे खेडेकर यांची अलीकडेच भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. यामुळे मनसेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर खेडेकरांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला, पण तो रखडत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. “भाजप खेडेकरांना झुलवत आहे का?” असा प्रश्न उपस्थित झाला…
मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार असताना सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले असून, जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 85 हजार रुपयांवर गेला आहे. सोन्याचा दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख 28 हजार रुपये झाला आहे. चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसांमध्ये 25 हजार रुपयांची मोठी दरवाढ झालेली दिसते. देशपातळीवर एमसीएक्स या वायदेबाजारातही 9 ऑक्टोबरला चांदीचा प्रतिकिलो दर 1 लाख 58 हजार रुपये होता. त्यात सोमवारी (13 ऑक्टोबर) 1 लाख 71 हजार 85 रुपयांपर्यंत वाढ झाली. सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत कमी पुरवठा यामुळे प्रामुख्याने चांदी भाव खाऊ लागली आहे. इलेक्ट्रिक वाहन, सौरऊर्जा, सेमीकंडक्टरसाठी चांदीची…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतात पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील अंतुर्ली येथील संजय आसाराम पाटील व त्यांच्या पत्नी वंदना संजय पाटील हे खापरखेडा ते अंतुर्ली रस्त्याने शेतात जात होत्या. या वेळी भरत निंबा पाटील (रा. अंतुर्ली) यांची समोरून येणारी दुचाकी (एमएच – ५४, ए- ०१८८) भरधाव वेगाने वंदना पाटील यांना धडकली. या दुर्दैवी अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी भरत पाटील याच्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी दिवाळीसाठी पैसे आणि वस्तू द्या असे म्हणत घरात जबरदस्तीने शिरलेल्या वॉचमनने आरोही इंद्रकुमार ललवाणी (३८, रा. बालाजी हाईटस्, मोहाडी रोड) या महिलेवर चाकूने वार केले. हल्ला करणारा गोकूळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) हा पूर्वी या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करीत होता. ही घटना सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) घडली. यावेळी मोठी गर्दी होऊन नागरिकांनी हल्ला करणाऱ्याची धुलाईदेखील केली. संशयित गोकूळ राठोड हा १३ ऑक्टोबर रोजी इमारतीमध्ये आला व आरोही ललवाणी यांच्या घरी जाऊन पिण्यासाठी त्याने पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर त्याने महिलेकडे दिवाळीसाठी पैसे व वस्तू द्या, अशी मागणी केली. त्यावेळी तो घरात शिरला. त्याला बाहेर काढत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे २३०० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी उमेश पाटील व शिपाई रामेश्वर चव्हाण असे दोन कर्मचारी कर्तव्यावर आहेत . वसंतवाडी प्लाट भाग वार्ड १मध्ये मोरोती मंदीरासमोरील चौकात बऱ्याच दिवसांपासून गावात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन वरील वाल लिक होते त्यामुळे पाण्याची नासाडी होऊन पुढे कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता या विषयी त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांना लिकेज संदर्भात माहिती दिली याची दखल घेत सरपंच विनोद पाटील यांनी ग्रामसेवक बबन वाघ यांना सदर लिकेज वाल बदलून नवीन वाल बसविण्याची सुचना केली.ग्रामसेवक यांनी त्यासाठी लागणारे साहित्य पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांला घेऊन दिल्यानंतर साधारण दिड…
आजचे राशिभविष्य दि.१४ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीवाल्यांनी आज जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्याचा विचार करा, किंवा जर तुम्ही अविवाहित असाल तर काही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा विचार करा, कारण आज सामाजिक कार्यक्रम खूप मजेदार असणार आहेत. चिंता सोडा, थोडा वेळ मजेच घालवा, रिलॅक्स वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक रोमांचक आणि सकारात्मक अनुभव घेऊन येईल, जो तुमच्या सामाजिक जीवनाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. वृषभ राशी तुमच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मकतेने भरलेले असेल आणि याचा तुमच्या नातेसंबंधांवरही परिणाम होईल. इतरांना प्रेरणा देण्याची तुमची क्षमता आज तुमचे नाते आणखी गोड करेल. तुम्ही नेहमीच ज्या मुख्य नात्यांवर अवलंबून राहिला आहात ते मजबूत करण्याची…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना थेट सल्लाच दिला आहे. युतीचा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा नक्कीच विचार करावा, असे उदय सामंत म्हणालेत. ‘काँग्रेस’ला सोबत घेण्याची इच्छा राज ठाकरे यांची इच्छा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे असल्याची राज यांची भूमिका असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका 26 वर्षीय अभियंत्र्याने 9 ऑक्टोबर रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात झालेल्या लैंगिक शोषणामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी कर्नाटक सरकारकडे एका पत्राद्वारे संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वरील शब्दांत ही मागणी धुडकावून लावली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही, अशा शब्दांत…

