Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी स्थानिक निवडणुकीसाठी सर्वांनी आपआपल्या पद्धतीने तयारी सुरु केली असताना आता कालच मनसेच्या वतीने आयोजित दीपोउत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्धघाटन उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांंनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही, पण ठाकरे फॅमिली पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी दिपावळीच्या शुभेच्छा दिल्या. आज माध्यमांशी संवाद साधताना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहेत, अशी मोठी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दोन ठाकरे…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार पक्षाचे मंत्री छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो, मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर, मग मंत्रिमंडळात का रहावे, असा प्रश्न उपस्थित करत राजीनामा देण्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सूचवले आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा आहे, तर त्यांनी मंत्रिमंडळात गेल नाही पाहिजे, तिकडे ढुंकूनही नाही पाहिले पाहिजे. यामागे राज्य सरकार तर खेळ करत नाही का?, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील नेतृत्व करणाऱ्या लोकांचा उद्देश दिसतो. कारण, सदन घोटाळ्याचे मोठे मोठे भाषण हे देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यांना जेलमध्ये भाजपने टाकले. याच भाजपच्या कृपेने…

Read More

दौंड : वृत्तसंस्था दौंड शहर हे मिनी भारत आहे. येथे सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहर दोन भागांमध्ये विभागले असले, तरी इथली एकजूट मोठी आहे. सत्तेचा अहंकार न ठेवता लोकांची कामे प्रामाणिकपणे करावी, ‌’चार दिवस सासूचे असतात, तर चार दिवस सुनेचे‌’, त्यामुळे राजकारणात कोणीही माज करू नये, अशा शब्दांत सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला. दौंड येथे शुक्रवारी (दि. 17) दौंड शहर भाजपचे माजी अध्यक्ष स्वप्निल शहा यांच्यासह नंदूभाऊ पवार आणि मनोज फडतरे तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आपल्या कामात सदैव तत्पर राहुन सर्वसामान्यांची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद आहेत. अशा शब्दात पालकमंत्री पाटील यांनी मावळचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा गौरव केला. तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निरोप समारंभ व नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा स्वागत समारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार, सुरेश(राजू मामा )भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, श्रीमती इंद्रायणी मिश्रा, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा हुडको परिसरात १५ ऑक्टोबर रोजी गाणे लावण्यावरून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन एकमेकांना लाठ्याकाठ्या, सळईने मारहाण करण्यात आली. तसेच घरात घुसून साहित्याची नासधूस केली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यासंदर्भात अनिता किरण ढिवरे (३०, रा. पिंप्राळा हुडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गाणे लावण्यावरून विचारणा करीत सहा जणांनी अनिता ढिवरे यांच्यासह त्यांचे दीर जितू ढिवरे यांना लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच घरात घुसून साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद किरण सपकाळे यांनी दिली असून, त्यात म्हटले आहे की, त्यांना उद्देशून आम्ही कोणतेही गाणे…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी तुमच्या आईची बिघडलेली तब्येत सुधारेल, ते पाहून तुमचं टेन्शन कमी होईल. आर्थिक बाबींबाबत तुमचा दिवस चांगला राहील. तुमची ओळखीची व्यक्ती तुम्हाला भेटू शकेल , ज्यामुळे आनंद होईल. वृषभ राशी आज काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. योग्य व्यवस्था करूनही, काही चिंता कायम राहतील, म्हणून तुमचे मनोबल मजबूत ठेवा. उत्पन्नासोबतच खर्चही आज वाढेल. एखाद्यावर विश्वास ठेवून निर्णय घेताना 10 वेळा विचार करा. मिथुन राशी आज, मोठ्या माणसांच्या सहवासात वेळ घालवाल. सुखसोयींशी संबंधित वस्तू देखील खरेदी कराल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटल्याने मौल्यवान माहिती मिळेल. जर तुमचं एखादं प्रलंबित सरकारी प्रकरण असेल, तर निर्णय तुमच्या बाजूने…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव-सोनवद रोड परिसरातील रहिवासी आणि गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आकर्षक बातमी आहे. मौजे धरणगाव शिवारात गट नं. २७८ येथे ‘जगदंबा डेव्हलपर्स अॅण्ड प्रमोटर्स’तर्फे ‘जगदंबा नगर’ या नावाने संपूर्ण सुविधांनी सुसज्ज सरकारमान्यताप्राप्त (N.A.T.P.) लेआऊटचे धन्वंतरी त्रयोदशीच्या (धनोत्रयोदशी) शुभमुहूर्तावर प्लॉट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. ‘श्री स्वामी समर्थ’ यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या प्रकल्पाकडे भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. ‘जगदंबा नगर’मध्ये आधुनिक आणि सुरक्षित जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लेआऊटच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण लेआऊटला एकच मुख्य प्रवेशद्वार असून, सुरक्षिततेसाठी पूर्ण वेळ सेक्युरिटी सुविधा पुरवण्यात आली आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी प्रशस्त…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण हे शासनाचे प्राधान्य असून, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या बचतगटांच्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन जीएस ग्राउंड, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. महायुती सरकारवर विरोधकात आरोप प्रत्यारोप करीत असताना आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असे सांगत 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज (दि.१७) दिवाळीला सुरुवात झाली. तरी प्रत्यक्षात मात्र 1800 कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. राज्य सरकारने केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली. ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी ठरणार आहे; अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. सरकारने दिवाळीपूर्वी मदत करू…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील ओबीसी मोर्चावर तीव्र टीका केली आहे. हा मोर्चा ओबीसी समाजाचा नसून एका विशिष्ट जातीचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा ‘मोठा गेम’ असू शकतो, अशी शंकाही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. अंतरवाली सराटी येथे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “आजचा (बीडमधील) मोर्चा ओबीसीचा नसून तो एका विशिष्ट जातीचा मोर्चा आहे. त्यात तुम्हाला विशिष्ट जातीचेच लोक दिसतील. त्यामुळे हा ओबीसींचा मोर्चा नाही आणि ओबीसींच्या हिताचं यांना काही देणं-घेणं नाही.” जरांगे पाटील यांनी या आंदोलनामागे राजकारण असल्याचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री…

Read More