विजय पाटील : प्रतिनिधी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे आज, मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुपारी ही दुःखद घटना समोर येताच संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार राजीव देशमुख यांची आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने चाळीसगाव सर्वात आधी डॉ.मंगेश वाडेकर यांच्या शैलजा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेले तिथून त्यांना धुळे येथे रेफर करण्यात आले. यावेळी चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या सोबत असल्याचे कळते. प्रकृतीची अधिक गंभीरता लक्षात घेऊन, व तिथूनच चाळीसगाव येथून आ. मंगेश चव्हाण डॉ. नरेंद्र राजपूत, डॉ,सुनील…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत रात्री लागलेल्या भीषण आगीत आई-मुलगी जिवंत होरपळून मरण पावल्या. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सोसायटीच्या रूम क्रमांक 301 मध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. सुरुवातीला काही वेळातच ही आग संपूर्ण घरात पसरली. स्थानिकांनी धूर आणि ज्वाळा पाहताच तात्काळ बाहेर धाव घेतली आणि अग्निशमन दलाला फोन केला. तोपर्यंत सोसायटीतील इतर नागरिकांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाई चा दि. १८/१०/२०२५ चा शासन निर्णय मध्ये समावेश नसल्याचे जाहीर होताच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांना पाळधी येथे जाऊन मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भेट घेवून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी बाधितांना मदत मिळणे बाबत. निवेदन दिले. निवेदनात अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे. वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ३२५३५९ शेतकऱ्यांना २४७२६२.०१ हेक्टर क्षेत्राकरिता रु.२९९९४.४७ लाख इतकी मदत घोषित झाली असून याबाबत सविस्तर माहिती घेतली असता यामध्ये अमळनेर तालुक्याचा कुठेही समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे अमळनेर…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाने मदतीची रक्कम वर्ग होण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात मदतीची आकडेवारी पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानीपोटी सरासरी साडेसात हजार रुपये मदत मिळणार आहे. या तुटपुंज्या मदतीत नेमके काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या मदतीवर आता शेतकरी संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. सप्टेंबरमध्ये परतीच्या तीन दिवसाच्या मुसळधार पावसात शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली. सोंगणीला आलेली पिके मातीत गाडली, तर नुकताच लागवड झालेला कांदाही वाफ्यातच सडून कोमेजला. मका पाण्यात तरंगून खराब झाली. अतिवृष्टीने डोळ्यादेखत शेतातील काढणीला आलेली पिके सडली, काही वाहून गेली. विभागाने शासनाकडे जिल्ह्यातील ४ लाख ९ हजार…
आजचे राशिभविष्य दि.२१ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. जर तुम्ही कला क्षेत्रात असाल तर तुम्हाला प्रगतीचे अनेक नवीन मार्ग दिसतील. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस अनुकूल असेल. नवीन अभ्यासक्रमात सामील होण्यासाठी हा एक शुभ दिवस आहे. वृषभ राशी तुमचे नियोजित काम आज पूर्ण होईल. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हंगामी फळांचा समावेश कराल. कुटुंबातील सदस्य परस्पर समन्वयाने कोणत्याही घरगुती समस्या सोडवू शकतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मिथुन राशी आज तुम्हाला नफ्याच्या काही नवीन संधी मिळतील. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याने आनंद मिळेल. संयमाने निर्णय…
मुंबई : वृत्तसंस्था देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असून राजकीय क्षेत्रात देखील भाषणबाजी सुरु आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत. नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार राजकीय धक्के बसत आहेत. ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. या आऊटगोईंगच्या…
देशभरात पाच दिवसांच्या दिवाळीच्या उत्साहात लक्ष्मी पूजन या सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू पंचांगानुसार, हा सण आश्विन महिन्याच्या अमावास्येच्या रात्री साजरा केला जातो. या दिवशी स्थिर धन-संपत्तीची देवी माता लक्ष्मी, बुद्धी आणि शुभ-लाभाचे देव श्री गणेश आणि धनाचे रक्षण करणारे देव कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जे भक्त आपले घर स्वच्छ ठेवून आणि दिव्यांची रोषणाई करून तिचे स्वागत करतात, त्यांच्या घरी ती स्थिर स्वरूपात दीर्घकाळ वास करते आणि घरात धन, समृद्धी आणि ऐश्वर्य कायम राहते. 1. लक्ष्मी पूजनाचे महत्त्व लक्ष्मी पूजनाचा मुख्य उद्देश केवळ पैसा मिळवणे नसून,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज, दिवाळीच्या दिवशी, श्री क्षेत्र देहू येथे लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. सकाळी 9 वाजता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत, मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ते उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून आज दिवाळीच्या दिवशी थोड्याच वेळाच ९ वाजता श्री क्षेत्र देहूमध्ये जगद्गुरु संत श्री तुकोबारायांच्या समाधीवर नतमस्तक होऊन मंदिरापुढे लाक्षणिक उपोषणाला बसतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. रोहित पवार यांनी रविवारी या उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट…
अमळनेर : प्रतिनिधी तुम्हाला शनी आहे असे सांगून हातचलाखी करून तीन मदारींनी वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची अंगठी चोरून नेल्याची घटना दि १८ रोजी साडे अकरा वाजता अमळनेर बसस्थानकावर घडली. अवघ्या काही तासात पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तीघांना अटक करण्यात आली असुन खाकी दाखवताच त्यांनी अंगठी काढून दिली आहे. दरम्यान यातील एक संशयीत फरार झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील बळवंतराव जयवंतराव वाघ (वय ८६) हे आपल्या जावयाकडे गांधली ता अमळनेर येथे सुभाष रामराव देशमुख यांच्याकडे येण्यासाठी बसस्थानकावर आले. जावयाने बाजार करून येतो तोपर्यंत वृद्धाला बसस्थानकावर थांबायला सांगितले. काही वेळात एक इसम आला आणि त्याने वृद्धाला शेगाव जाणारी बस…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील कृष्णानगर परिसरात किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करून चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रेखा धनराज बोरोले (वय ३३, व्यवसाय – गृहिणी, रा. कृष्णानगर, भिरूड हॉस्पिटलजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रेखा बोरोले या पती धनराज बोरोले, दोन मुले व सासूसह राहतात. १८ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा तुषार हा गल्लीमध्ये फटाके फोडण्यासाठी गेला होता. सुभाष सोनवणे यांचे फटाक्यांचे दुकान असून तेथे भांडण सुरू होते. भांडणाचा आवाज ऐकून रेखा बोरोले बाहेर आल्या. तेवढ्यात आजादसिंग श्रावणसिंग भाटिया याने रेखा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘तुझ्या नवऱ्याने…

