Author: editor desk

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. येथील कार्यरत महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या डॉक्टरने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिकांपासून वैद्यकीय संघटनांपर्यंत सर्व स्तरांवर या घटनेबाबत दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉ.मुंडे या पोलिस आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या कालावधीत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे परंतू कोरोनानंतर फटाक्यांचे कमी झालेले प्रमाण या वर्षी पुन्हा वाढले आहे. दिल्ली सारख्या राजधानीत तर हवा इतकी अशुद्ध झाली आहे की तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याची नौबत आली आहे.तर अशात कठोर कायदे असलेल्या सिंगापूरात फटाके फोडल्याच्या आरोपाखाली एका भारतीयाला अटक झाली आहे. भारतीय लोक ज्या देशात जातात तेथे आपल्या प्रथा परंपरा चालू ठेवण्याचा प्रयत्न करात. परंतू अशा प्रथापरंपरा पाळताना तेथील स्थानिक कायदे काय आहेत याची जाणीव असायला हवी. कारण सिंगापूरात दिवाळीचा जोश साजरा करताना आतिषबाजी केल्या आरोपावरुन बुधवारी ३९ वर्षीय भारतीय मूळ असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यासह अनेक ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात घडत असताना परिवारातील पती-पत्नीमध्ये देखील हमरीतुमरी होवून मोठ्या वादात रुपांतर होत असते आता पतीची दिवाळीच्या दिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. कालच दिवाळीचा शेवटचा दिवस होता, तरी त्यांच्यात आधी संध्याकाळी आणि मग रात्री पुन्हा वाद झाला. आणि त्याच वादानंतर रागाच्या भरात पत्नीने तिचीच ओढणाी वापरत पतीचा गळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे ह्त्या केल्याचा अत्यंत संतापजनक आणि तितकाच क्रूर गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नकुल भोईर असे मृत इसमाचे नाव…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष ठेवण्याच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या निर्देशानुसार रेकॉर्डवरील आरोपींवर नजर ठेवण्याचे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिस कर्मचारी विजय नेरकर आणि जावेद शहा हे रात्रीच्या गस्तीदरम्यान असताना त्यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी कुणाल नितीन ठाकूर (वय 19, रा. कस्तुरी नगर, भुसावळ) हा रेगोली हॉटेलजवळील त्रीमूर्ती प्रोव्हिजन समोर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठा अपघात झाला. हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या अपघातात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला असून मदतीचे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबादहून बंगळूरकडे ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या सुमारास मोटारसायकलची धडक बसताच बसला आग लागली आणि काही क्षणांतच या आगीने संपूर्ण वाहनाला विळखा घातला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, आग लागल्यानंतर बसचा दरवाजा…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२४ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, ऑफिसमध्ये फोन कमी वापरा आणि तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, अन्यथा संकटात सापडाल. आर्थिक बाबींमध्ये लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा. आई-वडीलांच्या आशीर्वादाने जुनी , अडकलेली कामं पूर्ण होतील. वृषभ राशी व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील, सौहार्दपूर्ण संबंध टिकतील. तुम्हाला एखादे रहस्य कळू शकेल. जीवन बदलेल. मिथुन राशी तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. तुमच्या व्यवसायात एखाद्याकडून फायदा होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे उत्साहही वाढेल. कर्क राशी तुम्हाला ऑफिसमध्ये काही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या असून, महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एमएमआर (मुंबई महानगर क्षेत्र) मध्ये काही ठिकाणी महायुती एकत्र निवडणूक लढवणार, तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले की, “मी 2029 पर्यंत कुठेही जाणार नाही,” ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आज बहिण भावाच्या अतूट नात्याचा महत्वाचा दिवस म्हणजेच भाऊबीज सण आहे. या सणानिमित्त बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला अनेक अर्थांनी महत्व आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून बहिण भावाचा सण म्हणजचे भाऊबीज साजरी केली जात आहे. ठाकरे कुटुंबातही भाऊबीज निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे या उद्धव ठाकरे ठाकरेंना औक्षण करणार आहेत. या सगळ्या ठाकरे कुटुंबाच्या एकत्रीकरणाच्या घडामोडीत उद्धव ठाकरेंनी उबाठाच्या रणरागिनी मुलूख मैदानी तोफ सुषमा अंधारे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत स्वतः अंधारे यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली, तर नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेल्या 3 हजार कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ‘नांगर’ टाकण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अधिकारीच सरकारपेक्षा मोठे झाले आहेत. जे काम करत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच काय तर, विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणूक काळात त्यांना ज्या मतदारसंघात लाभ झाला तेथील मतदारयाद्यांतील घोळ पुराव्यांसह जनतेसमोर आणू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “निवडणुका आताच घेतल्या तर पराजयाला सामोरे जावे लागेल अशी शंका विरोधकांना वाटत आहे. त्यांना निवडणुका अडचणीच्या वाटत आहेत. त्यामुळे सहा महिने निवडणुका पुढे गेल्या तर बरे होईल, असे त्यांचे मत आहे. म्हणून मतदार याद्यांचे कारण पुढे केले जात आहे. मतदार याद्यांत सुधारणा व्हावी ही माझीही…

Read More