जळगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैद्राराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत. ही बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून, यंदाही त्याच परंपरेत प्रयोग पार पडतील. बलून हायड्रोजन वायूने भरलेली असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि काही तासांच्या प्रयोगानंतर रंगीत पॅराशूटच्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये नियोजन विभाग, गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविका विभाग, महसूल विभाग आणि विधि न्याय विभागांतर्गत हे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, धुळे आणि वाशिम या जिल्ह्यांना होणार आहे. नियोजन विभाग : विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्याला धरून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला हजारो शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला असून, या आंदोलनासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतकरी बांधव नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुसरीकडे बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, आज सकाळी साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही. यापूर्वीही सरकारने बैठका घेतल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा इशारा बच्चू…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत ते बरळत असून इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर आहेत, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. बावनकुळे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देशभर फिरून संघटन उभे करतात. राजकारणाला गती देतात. इतकेच नाहीतर 370 कलम रद्द करून इतिहास रचतात. पण उद्धव ठाकरे घरात बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर टीका करतात. या अजगराने स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं,वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. 25 वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील चोरट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांची घरेसुद्धा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्यात ही चोरी घडली आहे. एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील बंगला बंद होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे खडसे यांचे कर्मचारी बंगल्यावर आले असता त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहिले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, आतील सर्व सामान अस्ताव्यस्त…
चोपडा : प्रतिनिधी शहरा बाहेरील शिरपूर बायपासजवळील रणगाडा चौकात मध्यरात्री सुमारे २:३० वाजेच्या सुमारास रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीपसिंग हरिसिंग पवार (३६, नांदेड), विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२५, नांदेड), अमनदीपसिंग अवतारसिंग राठोड (२५, नांदेड), सद्दाम हुसेन मोहम्मद अमीन (३३, नांदेड), अक्षय रवींद्र महाले (३०, भावसार गल्ली, चोपडा) आणि जयेश राजेंद्र महाजन (३०, भाट गल्ली, चोपडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या ठिकाणी चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाल्यावर त्यांनी तत्काळ पोलिस पथक पाठवून चौकशी केली. चौकशीदरम्यान, सात गुन्हेगारांना…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेच्या वतीने २०२५-२०२६ या वर्षासाठी १४ वाळू घाटांच्या वापर, उत्खननासाठी ई-निविदा आणि ई लिलाव प्रक्रियेची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे. सोमवारी सकाळी १०:०० वाजता ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून, १० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. प्रक्रियेनुसार ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर ११ नोव्हेंबर रोजी तांत्रिक निविदा आणि १२ नोव्हेंबर रोजी आर्थिक निविदा उघडण्यात येणार आहे. अंतिम ई-लिलाव प्रक्रिया १३ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी घोषित केला जाणार आहे. निविदांची नोंदणी- १० नोव्हेंबर निविदांची छाननी- ११ नोव्हेंबर निविदा उघडणार- १२ नोव्हेंबर…
जळगाव : प्रतिनिधी घरातील सदस्य जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेले असताना खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (२६ ऑक्टोबर) धानवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील धानवड येथील भिकन शंकर पाटील (६२) हे २३ ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासह जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या स्लायडिंग खिडकीचे लॉक तोडून आत प्रवेश केला. शोकेसच्या लॉकरमधून रोख ४० हजार रुपयांसह २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा…
आजचे राशिभविष्य दि. २८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आणि धाडसाचा आहे. आज तुमच्यात वेगळाच उत्साह असेल. ज्यामुळे कामामध्ये गती येईल. कामानिमित्त लांबचे प्रवास संभवतात. हे प्रवास फलदायी ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक घटना घेऊन येणारा आहे. वाहने आणि द्रुतगती प्रवासाची विशेष आवड राहील. वृषभ राशी वृषभ राशीसाठी आज अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला लगेच मिळेलच असे नाही, त्यामुळे धीर धरा आणि आपले काम सातत्याने सुरू ठेवा. मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींना आज जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे…
पाळधी : प्रतिनिधी मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे जीपीएस ग्रुप मित्र परिवाराचं एक अनोखं कार्य. जीपीएस मित्र गृपचे सक्रिय सदस्य स्व. अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या जीपीएस गृपने एक आगळंवेगळं आणि समाजाभिमुख पाऊल उचलत पाळधी गावातील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पशा आजाराने अनिल महाजन यांचं निधन झालं होतं. त्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आणि त्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी निवडणुकीचं संपूर्ण प्रचारकार्य…

