नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यांनी सरकारविरोधात उभारलेले ‘महाएल्गार आंदोलन’ अधिक तीव्र झाले आहे. कर्जमाफीचा शासन आदेश निघाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू ठेवले आहे. बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याही नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नागपूरच्या रस्त्यांवर उतरून भव्य मोर्चा काढला आहे. बच्चू कडू यांनी सरकारी आदेशाशिवाय हटणार…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक निवडणुकीची लगबग सुरु झाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या पक्ष बैठकीत पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तातडीने कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. उगाचच मुंबईत थांबू नका. मतदार संघात जाऊन काम करा अशी तंबीच अजित पवार यांनी आपल्या आमदारांना दिली आहे. याचबरोबर त्यांनी कोणाच्या भरवशावर राहू नका अशी सूचक सूचना देखील केली आहे. अजित पवारांनी पक्षाच्या सर्व आमदारांसोबतच्या बैठकीत, आमदारांनी विनाकारण मुंबईत न थांबता आपापल्या मतदारसंघांत जाऊन काम करावे. निवडणुकीच्या…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मंगरूळ येथील प्रफुल्ल प्रकाश भदाणे (वय ३५) या तरुणाचा मृतदेह संशयितरित्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आला असून या तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या तरुणाला तेथील स्थानिक काही जणांनी जबर मारहाण करुन त्याचा खून केल्याचा आरोप मयत तरुणाच्या भावाने केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील प्रफुल्ल प्रकाश भदाणे हा २२ रोजी एका वाहनावर चालक म्हणून गेला होता. दरम्यान, प्रफुल्ल भदाणे हा २४ रोजी चंद्रपूरच्या हद्दीत खंबाळा येथे जेवणासाठी थांबला होता. तेथूनच काही वेळाने प्रफुल्ल यांनी त्यांचे भाऊ प्रदीप प्रकाश भदाणे यांना फोन केला. या वेळी प्रफुल्ल याने काही लोक…
पारोळा : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विचखेडे ते कळजी दरम्यान पुढे चालत असलेल्या कंटेनरला बस चालकाने मागून धडक दिल्याने बसमधील ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मालेगाव-धुळे बायपासमार्गे जळगाव जाणारी एसटी बस (एचएच२०/२५७९) ही पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर विचखेडे ते कळजीदरम्यान जात असताना वळणाजवळ समोर असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने व पावसामुळे कंटेनरची गती लक्षात न आल्याने बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. जखमींना रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळावरून रुग्णांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. बस चालक विनोद विक्रम सैंदाणे (जळगाव), वाहक राहुल दिगंबर पाटील (जळगाव) हे…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५०० रुपयांनी घसरून एक लाख ४७ हजार रुपयांवर आली. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन त्यांनी नवनवीन उच्चांक गाठला. मात्र आता गेल्या आठवड्यापासून चांदीत मोठी घसरण होण्यासह सोन्याचेही भाव कमी-कमी होत आहे. त्यात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) तर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख…
मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश व गती मिळेल. प्रवासाचे योग फलदायी ठरतील. सरकारी कामांमध्ये यश आहे. आर्थिक बाजू मजबूत असल्या तरी खर्चही वाढतील. उधार-उसनवारी टाळा. जोडीदारासोबतचे संबंध जपून हाताळा. गैरसमज टाळा. उत्साह चांगला राहील. धाडस आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींचे परिश्रम आज फळाला येतील. प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामे यशस्वी होतील. आर्थिक स्थिरता येईल. बचतीवर लक्ष केंद्रित करा. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांततेसाठी तणाव दूर ठेवा. आराम आवश्यक करा. मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींना आज करिअर-व्यवसायाच्या संधींमध्ये वाढ होईल.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – भुसावळ महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बस नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असताना अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली. या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये बसलेली एक महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुर्दैवाने, ती महिला बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. साराबाई गणेश…
जळगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैद्राराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत. ही बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून, यंदाही त्याच परंपरेत प्रयोग पार पडतील. बलून हायड्रोजन वायूने भरलेली असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि काही तासांच्या प्रयोगानंतर रंगीत पॅराशूटच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये नियोजन विभाग, गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविका विभाग, महसूल विभाग आणि विधि न्याय विभागांतर्गत हे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, धुळे आणि वाशिम या जिल्ह्यांना होणार आहे. नियोजन विभाग : विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्याला धरून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला हजारो शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला असून, या आंदोलनासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतकरी बांधव नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुसरीकडे बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, आज सकाळी साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही. यापूर्वीही सरकारने बैठका घेतल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा इशारा बच्चू…

