जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील बांधकाम व्यावसायिक हाजी मुन्ना तेली यांच्या अकाउंटंटकडून तब्बल २५ लाख ४२ हजारांची सिनेस्टाईल लूट झाल्याचा थरार २८ ऑक्टोबरला रात्री १०.२० वाजता सत्यसाई नगर परिसरात घडला होता. या प्रकरणातील तपासात पोलिसांनी अवघ्या २ दिवसांतच लुटीचा गुन्हा उघडकीस आणून ६ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २३ लाख ४२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील हाजी मुन्ना तेली यांच्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून काम करणारे मोहम्मद यासीन इस्माईल शेख हे दररोज दिवसभरातील रोकड बँकेत जमा करण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा २५…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आगामी मनपा निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवली जाणार असून, भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मनपा निवडणुकीत महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शुक्रवारी उद्धव सेनेतील माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून उद्धव सेनेतील माजी नगरसेवकांचा बहुचर्चित असलेला भाजप प्रवेश पार पडला. उद्धव सेनेतील माजी नगरसेवकांसह इतर पक्षातून आलेल्या एकूण…
मेष राशी आज तुम्ही तुमचा बहुतेक वेळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात व्यस्त असाल. तुम्ही जितके जास्त परिश्रम आणि परिश्रमपूर्वक काम कराल तितके जास्त परिणाम तुम्हाला मिळतील. वृषभ राशी बँकेत काम करणारे आज त्यांचे काम लवकर पूर्ण करतील. प्रेमीयुगुल एकत्र वेळ घालवतील. सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमची ओळख वाढेल.लोकांशी संपर्क वाढेल. मिथुन राशी सध्या सुरू असलेल्या समस्या सुटतील यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाऊ शकते. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न कराल. आहारकडे आणि तब्येतीकडे लक्ष द्या. कर्क राशी तुम्हाला नवीन व्यवसाय कराराची ऑफर मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरातील कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरजवळील सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंच पुतळ्याच्या ठिकाणी मोदी पोहोचले आणि लोहपुरुषाला आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये सलामी घेतली. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व तुकड्यांचे नेतृत्व महिला अधिकारी करतात. बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा दलासह सोळा तुकड्या परेडमध्ये सहभागी होत आहेत. या परेडमध्ये ऑपरेशन सिंदूरमधील १६ बीएसएफ पदक विजेते आणि सीआरपीएफचे पाच शौर्य चक्र विजेते देखील सहभागी होतील. परेडचे नेतृत्व १०० सदस्यांच्या पथकाद्वारे केले, तर नऊ बँड पथके आणि चार…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील वडगाव रस्त्यावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर कलिंगड भरलेल्या ट्रकने मोटरसायकलीस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकली वरील २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी अडावद येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अडावद येथील पोलीस स्टेशन समोरील वडगाव रस्त्यावर आज दि. ३० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चंदसनी, कमळगाव, वडगाव येथील शेतातून टरबूज भरून अडावद कडे येत असलेल्या मालट्रक क्रमांक आर. जे.४० जी. ऐ.४१९६ या वरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याची परिस्थिती न पाहता चालविल्याने समोरून येणाऱ्या बजाज कंपनीच्या मोटारसायकल क्रमांक एम. एच. १९ एन. ५९७९ हिस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकली वरील तरुण आकाश ज्ञानेश्वर पाटील रा. इंदिरानगर…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ रस्त्याने पायी जात असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे रामदेववाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुकेश हा आई-वडिलांसोबत रामदेववाडीत राहत होता. बांधकाम बिगारी म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास मुकेश हा गावाजवळील चायनीज दुकानावरून नाश्ता करून आपल्या घराकडे पायी परतत होता. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात आणि…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा कारागृहामध्ये बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दोन बंदी गटांमध्ये जुन्या वैमनस्यातून मारहाण झाली. मारहाणीत तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) हा बंदी जखमी झाला आहे. बॅरेक क्रमांक दोनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तेजस बॅरेक २ मध्ये झोपलेला असताना, याच कारागृहातील चार बंदींनी त्याला घेरले. आरोपींमध्ये पराग रवींद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण यांचा समावेश होता. या चौघांनी तेजसला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेजसने कारण विचारले असता, आरोपींनी त्याला,…
आजचे राशिभविष्य दि. ३१ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज कोणत्याही काम पूर्ण करण्याची घाई करू नका, नाहीतर ते अपूर्ण राहील. विद्यार्थी अभ्यासावर कमी लक्ष केंद्रित करतील आणि मोबाईल फोनवर जास्त लक्ष केंद्रित करतील. आज तुमचे अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवा. वृषभ राशी आजचा दिवस नवीन भेटवस्तू घेऊन येईल. तुम्ही आधीच केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही एका खास मित्राला मदत कराल. तुमच्या व्यवसायात आज महत्त्वाचे बदल होतील. मिथुन राशी आज जवळच्या नातेवाईकांमुळे तुमचा आनंद द्विगुणीत होईल. तुम्हाला तुमच्या वडिलांचा पाठिंबा मिळेल. कामात प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायची वेळ मिळेल. कर्क राशी तुम्हाला तुमच्या बचतीतून काही…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून देशासह राज्यात मतचोरीच्या आरोपावरुन खळबळ उडाली आहे. यावरून सातत्याने विरोधकांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केले आहेत. यातच आता मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नियोजन कसे असणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे. “निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा 1 नोव्हेंबर शनिवारी निघणार आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी राज्याची उपराजधानी नागपुरात माजी आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेले आंदोलन आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ तथा आंदोलकांशी बुधवारी रात्री दीड तास चर्चा झाली. पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीची तारीख ठरली नाही, तर 31 ऑक्टोबर रोजी रेल्वे करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची आंदोलनास्थळी जाऊन भेट घेतली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलही आज बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत.…

