आजचे राशिभविष्य दि.९ एप्रिल २०२६ मेष राशी आज, एका जवळच्या मित्राच्या मदतीने, बेकरी व्यवसायातील लोकांचा नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला जीवनात आनंद घेण्यासाठी काही अद्भुत संधी मिळू शकतात. तुमच्या परिसरातील काही लोक तुमच्यासाठी खास ठरू शकतात आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पाठिंबाही मिळेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आणि तुम्हाला स्वतःला भाग्यवान वाटेल. मेष राशी आज, एका जवळच्या मित्राच्या मदतीने, बेकरी व्यवसायातील लोकांचा नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला जीवनात आनंद घेण्यासाठी काही अद्भुत संधी मिळू शकतात. तुमच्या परिसरातील काही लोक तुमच्यासाठी खास ठरू शकतात आणि…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रमुख महिला नेत्री आणि मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांची आज सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तातडीने त्यांना मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. यामुळे उद्या गुरुवारी होणार्या विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीत त्या गैरहजर राहणार आहेत. रुग्णालय प्रशासनाने ही माहिती थेट विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे पाठविली जाणार आहे. सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या धारदार वक्तृत्वाची आणि विरोधकांवर थेट हल्ला करण्याच्या शैलीसाठी ओळखल्या जातात. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता…
मुंबई : वृत्तसंस्था नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली…
बारामती : वृत्तसंस्था अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात होती. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीची लाट मिळेल आणि निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला असून तब्बल ५५ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने ही लढत आता अत्यंत चुरशीची आणि रंजक बनली आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देत धनगर समाजाचे प्रतिनिधित्व पुढे केल्याने निवडणुकीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. या जातीय समीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यासमोरचे आव्हान वाढले असून, ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक कठीण बनत चालली आहे. दरम्यान, बदलत्या राजकीय…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील धूळपिंप्री येथे ५३ वर्षीय शेतकरी शेतात पाणी भरण्यास गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीजवळ पाय घसरून ते विहिरीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील धूळपिंप्री येथील तथा माजी सरपंच शेतकरी सतीश आत्माराम पाटील (वय ५३) हे नेहमीप्रमाणे ५ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. ते सकाळपर्यंत घरी परत आलेच नाहीत. त्यामुळे शेतात जावून नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. तर शेतातील विहिरीत मृत अवस्थेत ते आढळून आलेत. दरम्यान, पाय घसरुन ते विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अप्पर आयुक्त करिष्मा नायर या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. मिनल करणवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून काम करताना विविध विकासकामांना गती दिली होती. मार्च २०२५ मध्ये त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेतून बदली होऊन जळगाव येथे पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि शिक्षण क्षेत्रात काही…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद येथील रहमतपुरा भागातील साजिद खान सुलतान खान पठाण (वय २४) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना ७ एप्रिलला पहाटे घडली. या हल्ल्यात साजिद खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साजिद खान हा पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळगावहून नशिराबादकडे येत असताना हॉटेल सावन समोर अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित राम संतोष मोरे (वय २४, रा. सत्यम पार्क, जळगाव) तसेच एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेला पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. ६…
जळगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मा. संचालक, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील ग्रामीण व शहरी भागासाठी १२० तसेच जळगाव शहरासाठी १७ अशा एकूण १३७ फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी पुणे येथील “यशदा” कार्यशाळेतून येथे प्रशिक्षण घेऊन आलेले अधिकारी…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसबाबत ‘डाऊनफॉल’ सुरू असल्याचे विधान करणाऱ्या पार्थ पवार यांना सौम्य शब्दांत सुनावले आहे. “कोणताही राजकीय पक्ष असा संपत नसतो. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने काम करत असतो,” असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका करत राज्यात त्यांच्या अधोगतीला सुरुवात झाल्याचे म्हटले होते. या विधानावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवारांना संयमाचा सल्ला दिला होता. आता रोहित पवारांनीही हे विधान घाईगडबडीत झाल्याचे सांगत त्यावर नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की,…
जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या विनंतीनुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार संपूर्ण जळगाव जिल्हयातील सर्व किरकोळ मदयविक्री अनुज्ञप्त्या (सीएल-३ (देशी किरकोळ विक्री) अनुज्ञप्ती, एफएल-२/ सीएल/एफएल/टिओडी-३ (विदेशी व देशी किरकोळ विक्री), एफएल-३ (परमिटरुम), एफएल/बिआर-२ (बियरशॉपी) तसेच टि.डी. १ (ताडी दुकाने) या सर्व अनुज्ञप्तीधारकांनी १४ एप्रिल २०२४…

