धरणगाव : प्रतिनिधी संशयावरून पतीने पत्नीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिच्यावर भररस्त्यात चाकूने तब्बल १३ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी शहरातील बालकवी ठोंबरे स्मारकाजवळील नाल्यानजीक घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बुधा लोंढे (४०, रा. संजय नगर, धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची पत्नी सोनल लोंढे (३३) ही धुणीभांडी करते. कामे आटोपून ती बुधवारी दुपारी घराकडे परतत होती. बालकवी ठोंबरे स्मारकाजवळील नाल्याजवळ दीपक याने सोनल हिला गाठले. काही समजण्याच्या आत त्याने तिच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. अचानक झालेल्या या प्रकाराने ती गोंधळली. त्याच वेळी पतीने तिचे हात, पाय, पोट आणि…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.११ एप्रिल २०२६ मेष राशी आज, तुमच्या जुन्या कंपनीतील अनुभव कामाच्या ठिकाणी खूप फायदेशीर ठरेल. तुमचा अध्यात्माकडे असलेला कल वाढेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश होऊ शकतात. घरी पाहुणे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. आज स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्या; तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या करिअरमध्ये उत्तम परिणाम देईल. वृषभ राशी तुम्हाला एका खास व्यक्तीकडून एक भेटवस्तू मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. विद्यार्थ्यांना त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या परिसरातील काही लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. मिथुन राशी तुम्हाला…
जळगाव : प्रतिनिधी आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्ह्यासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याला मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा मंजूर झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली. त्यांनी जिल्ह्यातील खत पुरवठ्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती सादर केली. यावेळी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच खतांची अनावश्यक साठवणूक न करण्याचे आवाहन केले. जमिनीची आरोग्यपत्रिका आणि पिकांच्या गरजेनुसारच खत खरेदी…
अकोला : वृत्तसंस्था जिल्ह्यातील यावलखेड येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र हरपले आहे. यावलखेड येथील गजानन नगर परिसरात राहणाऱ्या वृषाली अनिल निंबोकार (वय 32) यांचा पती अनिल निंबोकार (वय 42) याने चाकूने सपासप वार करत खून केला. वृषाली या गायत्री ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स कंपनीत काम करत होत्या. मागील दोन वर्षांपासून त्या कुटुंबासह येथे वास्तव्यास होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत. गुरुवारी सकाळी सुमारे 9.15 ते 9.30 च्या दरम्यान अनिल निंबोकार मोठ्या मुलाला…
जळगाव : प्रतिनिधी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल झाली आहे. सदर रेकद्वारे जिल्ह्यासाठी एकूण २६५० मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले असून हा पुरवठा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) कंपनीमार्फत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक व वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व विक्रेत्यांनी खतांची विक्री रिअल-टाईम सेल प्रणालीद्वारे तसेच आधार संलग्न e-POS…
बारामती : वृत्तसंस्था बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, करुणा मुंडे शर्मा यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्यात आले, तर महायुतीची सत्ता कोसळेल आणि तो पक्ष पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या की, वंजारी समाजाने धनंजय मुंडेंना नाकारले असून, त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील. “हा एका स्त्रीचा शब्द आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी तीव्र भूमिका मांडली. तसेच, “धनंजय मुंडेंनी स्वतःच्या पत्नीला तुरुंगात टाकले आणि अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले. अशा हजारो लोकांची यादी माझ्याकडे आहे,”…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे अभियान संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजता करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली. पदभार स्वीकारताच…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, या योजनेवर मुंबई उच्च न्यायालय यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर न्यायालयाने सरकारच्या आर्थिक प्राधान्यक्रमांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ही सुनावणी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर झाली. संबंधित महिलेला सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ मिळत नसल्याने तिने न्यायालयाची दार ठोठावली होती. सुनावणीदरम्यान पालिकेच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले की, या लाभांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, कारण राज्य सरकारकडून…
जळगाव : प्रतिनिधी प्रेमसंबंध असलेली महिला बोलत नसल्याच्या राग आल्याने संशयित गणेश छगन डोळे (रा. तानाजी मालुसरे नगर) याने महिलेवर लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद बायपास रोडवर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात ३९ वर्षीय महिला राहत असून तिचे गणेश डोळे याच्यासोबत प्रेमसंबंध आहे. ती महिला गणेश डोळे सोबत बोलत नसल्याचा त्याला राग आला. त्यामळे डोळे याने नशिराबाद बायपासवरील रस्त्यावर महिलेसोबत वाद घालीत तीलामारहाण केली. मारहाणीनंतर त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी धारदार पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमी महिलेने रुग्णालयात…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात बालविवाहाची घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर, वर्षभर चाललेल्या शोषणातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने जिल्हा शासकीय रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात गेल्यावर्षी एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. लग्न झाले तेव्हा आणि त्यानंतरही पीडितेचे वय कायद्याने लग्नासाठी पात्र नव्हते. विवाहानंतर वर्षभराच्या काळात पीडितेच्या संमतीशिवाय तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यात आले, ज्यातून ती गर्भवती राहिली. पीडितेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल…

