धरणगाव : विजय पाटील नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व पक्ष, उमेदवार आणि मतदार विकासाभिमुख नेतृत्व निवडण्यासाठी सज्ज झाले आहेत. शहराच्या सर्व ११ प्रभागांमध्ये तयारीचा जोर असून, तरुण मतदारांचा सहभाग या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा कल या वेळी स्थिर, पारदर्शक आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांकडे आहे. नागरिकांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि नव्या गुंतवणुकीसाठीचे प्रयत्न या मुद्यांवर चर्चा रंगत आहे. तरुण मतदार सोशल मीडियाद्वारे प्रचारात सक्रीय दिसत असून, “या वेळी पक्ष नव्हे, तर काम करणाऱ्यांना संधी” असे मत व्यक्त…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा वैद्यकीय आघाडीची नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने, तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे. प्रदेश महामंत्री मा. श्री. विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री मा. श्री. रवीजी अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेशदादा चव्हाण व अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. या कार्यकारिणीला जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील सत्यनारायण चौक येथे मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका युवकावर चाकूने प्राणघातक वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून धरणगाव पोलिसात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सत्यनारायण चौक येथील रहिवासी भूषण सुरेश भागवत (वय ३४) हे रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या इको गाडी जवळ उभे असताना साई अतुल कासार, तुषार ऊर्फ मुन्ना परेश नेरपगार आणि क्रिश महेश राठोड हे तिघे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले. यापूर्वी पेट्रोल चोरीच्या वादातून झालेल्या रागातून साई कासार याने भूषण भागवत यांच्या कानाखाली चापट मारून खिश्यातील चाकू काढून त्यांच्या खांद्याजवळ व कपाळावर वार केले.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर लावण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर भारतीय सेनेच्या वतीने “उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” असा थेट धमकीवजा इशारा या बॅनरमधून देण्यात आला आहे. या बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी घोषणा केली. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. येत्या 2 डिसेंबरला यासाठी…
जळगाव : प्रतिनिधी ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील डॉ. विकास सोमेश्वर पवार यांना तब्बल २७लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. पवार यांनी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथे ‘कृष्णा डेंटल क्लिनिक’ चालवणारे डॉ. विकास पवार (वय ४८, रा. मुंदडा नगर-२, अमळनेर) हे फेसबुकवर नियमित सक्रिय होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना अंकिता देसाई नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. या महिलेने डॉ. पवारांना ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस नावाची एक…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातील अवैध दारुच्या अड्ड्यावर गोळीबार केल्यानंतर संशयित हल्लेखोर हे पसार झाले होते. हल्लेखोर संशयित हे दुचाकीवरुन नांदूरा येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मागावर असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३५), मोनाली राहुल बऱ्हाटे (वय ३०, दोघ रा. रामेश्वर कॉलनी) नांदूर गावाजवळून त्यांच्या मुसक्या आवळल्या. सविस्तर वृत्त असे कि, उत्तरप्रदेशातील रहिवासी असलेले फिरोज शेख, राजन शेख व इतर गावातील काही मजूर हे एमआयडीसीतील जी १४ सेक्टरमधील विजेते कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीपासून काही अंतरावर राहुल बऱ्हाटे याची पानपटरी असून तो तेथे अवैधरित्या दारु विक्री करीत होता. रविवारी…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील खेडी कढोली गावात मंगळवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील जखमी सोनू सुभाष बडगुजर याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, शस्त्रक्रियेद्वारे छातीत अडकलेली गोळी काढण्यात आली आहे. तर या प्रकरणी जितू ईश्वर कोळी (वय २२) याच्याविरुद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या टपऱ्यांच्या मागे काही युवक हुल्लडबाजी करीत होते. त्याच वेळी जितूकडून अचानक गोळी सुटली आणि थेट सोनूच्या छातीत जाऊन लागली होती.गावातील मराठी शाळा परिसर हा सध्या रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. गोळीबारानंतर दोन दिवसांपासून मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन गावात…
आजचे राशिभविष्य दि.५ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्ही धीर ठेवा आणि संयमाने वागाल तर कठीण समस्यांवरही सहज उपाय सापडतील. कौटुंबिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. दिवस धावपळीचा जाईल. वृषभ राशी तुम्हाला घर आणि ऑफिसच्या जगातून बाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. जुन्या मौल्यवान वस्तूंसाठी सौदेबाजी केल्याने तुम्हाला फायदा होईल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. मिथुन राशी तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आज, तुमचे काम अत्यंत काळजीपूर्वक करा आणि इतरांची मदत घ्या. तुम्ही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. अनावश्यक वादात अडकणे टाळा. कर्क राशी आज नोकरी बदलण्याचा विचार करू शकता, परंतु पुढे जाण्यापूर्वी तुम्ही…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत शंकर पाटील, विकास सोसायटी चेअरमन व सर्व संचालकांसह धनराज हरी पाटील, वैभव अरुण पाटील, आबा अंकुश पाटील, सुजन प्रल्हाद पाटील, राहुल गुलाब पाटील, दिपक खुशाल पाटील, किशोर पाटील, भगवान हरी पाटील, विरभान दौलत पाटील, पोपट केशव पाटील, जगदीश श्रीराम जगताप यांचा प्रवेश करण्यात आला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक निवडणुकीची आज अखेर प्रतिक्षा संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार…

