मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा देणारे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी दावा केला आहे की, त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी रचला असून, त्यासाठी अडीच कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ऑफर देण्यात आली होती. जालना पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, या कटामागे एका बड्या नेत्याचा पीए आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “बीडच्या मोठ्या नेत्याच्या पीए कांचन या व्यक्तीने आरोपींकडे संपर्क साधला. त्यांनी मला अपघातासारखे दाखवून ठार…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांचे पुत्र मोठ्या चर्चेत आले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील जमीन व्यवहारात ६ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, पण यामध्ये पार्थ पवार यांचे आणि त्यांच्या कंपनीचे नाव वगळण्यात आले आहे, असा आरोप विरोधी नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. कोरेगाव पार्क या हायप्रोफाईल आयटी पार्क परिसरात घनदाट वनउद्यान असलेली सुमारे १,८०० कोटी रुपये बाजारमूल्याची ४० एकर शासकीय जमीन सरकारी यंत्रणांना हाताशी धरून पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ ३०० कोटींना विकण्यात आल्याचा व त्याद्वारे…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय विवाहितेकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणावर चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विनोद बापू पाटील याने संबंधित विवाहितेकडे पाहून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सुरुवातीला विवाहितेने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु दोन दिवसानंतर त्याने तिला मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याचप्रकारे अश्लील हावभाव करून त्रास दिला. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयित विनोद बापू पाटील याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी कंटरेनरच्या धडकेत दोघ दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. त्यातील प्रकाश चव्हाण याचा हात कंटेनरच्या चाकाखाली दबून तो गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ४ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ममता बेकरीजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील रहिवासी सुनिल उदल राठोड (वय ३०) हे त्यांचा मित्र प्रताप राजाराम चव्हाण हे कुसुंबा येथून (एमएच १९, सीसी ४८०४) क्रमांकाच्या दुचाकीने ममता बेकरीजवळून जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (टीएन ८८, एल ७१११) क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघ दुचाकीस्वार हे रस्त्यावर कोसळले. यामधील प्रकाश चव्हाण याचा उजवा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मोहन नगरातील नूतन वर्षा कॉलनीत घरातील फ्रिजसह गॅस सिलींडरला आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोहन नगरातील नूतन वर्षा कॉलनीत रविंद्र सुखदेव सपकाळे हे वास्तव्यास आहे. गुरुवार दि. ६ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील फ्रिजला आग लागली. काही वेळाताच आगीने रौद्ररुप धारण करीत घरातील संपुर्ण साहित्य आगीच्या विळख्यात घेतले. या आगीने स्वयंपाक घरातील गॅस सिलींडरपर्यंत पोहचल्यानंतर आग आणखीच भडकली. आगीत घरातील संपुर्ण साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी, ५ नोव्हेंबर रात्री १०:३० वाजता धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून, हा व्यवसाय चालवणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी काही महिला व मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून अवैधरीत्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली होती. नशिराबाद पोलिसांनी तातडीने जळगाव ए.एच.टी.यू. (मानवी तस्करी विरोधी पथक) च्या मदतीने कारवाईची योजना आखली. छाप्याच्या वेळी घरात पाच तरुणी आणि दोन चालक उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली…
आजचे राशिभविष्य दि. ७ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाने, नात्यांमधील कोणतेही गैरसमज दूर होतील. ही वेळ तुमच्या वर्तनात सुधारणा करण्याची आणि भूतकाळातील चुका सुधारण्याची आहे. तुम्ही दमदार सुरुवात कराल आणि यश मिळवाल. आज तुम्ही काही कामासाठी नवीन योजना देखील विचारात घेऊ शकता. वृषभ राशी विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल निकाल मिळतील. शुभ कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. कुठेतरी अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळू शकतात. प्रेमातील जोडप्यांसाठी छान जाईल दिवस. मिथुन राशी आज व्यवसायातील बारकावे समजून घेणे महत्वाचे आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे उचित आहे. स्पर्धेचा तुमच्या कामावर नकारात्मक परिणाम होईल. घाबरून जाण्याऐवजी, धैर्याने काम करा आणि समस्या सोडवा.…
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल 40 एकर मोलाच्या जमिनीचा व्यवहार आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ या कंपनीने ही जमीन सुमारे 1,800 कोटी रुपयांच्या बाजारभावाऐवजी केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ कारवाई करत पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या कारवाईचे आदेश दिले असून, चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदान यावर थेट आणि प्ररखड मत व्यक्त करताना सत्याचा मोर्चात दिसले. मुंबईत आयोजित केलेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील महत्वाचे नेतेही सहभागी झाले होते. उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणांनी या प्रश्नावर बोट ठेवून राज्य निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले. या प्रश्नावर राज ठाकरे सातत्याने आपले मत मांडताना दिसत आहेत. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे संकेत दोघांनीही दिलेले आहेत. केवळ अधिकृत घोषणाच होणे बाकी आहे.…
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील १३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अखेर दीड वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झाला असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने अत्यंत किचकट आणि तांत्रिक प्रक्रियेवर मात करून हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रभावी समन्वयामुळे अनेक महिने प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागला आहे. संबंधित प्रस्तावांची तपासणी, पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून पात्र अधिकाऱ्यांना लाभ वितरीत करण्यात आला आहे. या कामी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजय चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी. आर. चौधरी तसेच ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचारी…

