Author: editor desk

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पार्थ पवार यांच्या मालकीच्या Amadea Holdings LLP या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात अंदाजे १,८०४ कोटींच्या बाजारभावाची ४० एकर जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या व्यवहारावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दमानिया यांनी एका ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांना प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या Amadea Holdings LLP ने महार वतनाची जमीन विकत घेतली आणि दोन दिवसांतच स्टँप ड्यूटी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात तब्बल ८ वर्षांनंतर २ डिसेंबरला २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. त्यानंतर २४ तासांतच महायुती, मविआमधील मित्रपक्षांनी मैत्रीला सुरुंग लावला. अनेक ठिकाणी त्यांनी मित्रांविरुद्धच लढण्याचे संकेत दिले. अर्थात, ही लढाई केवळ मतदानापुरती असेल. निकाल लागल्यानंतर पुन्हा एकत्रीकरण होईल. या व्यूहरचनेची सुरुवात करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्यतो आम्ही महायुती म्हणूनच लढू, पण मतदानापूर्वी युती झाली नाही तरी निकालानंतर नक्कीच एकत्र येऊ. बारामतीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे अजित पवारांचे पुत्र जय पवार उमेदवार असतील. त्यांच्याविरुद्ध भाजपही मैदानात उतरेल, अशी चर्चा आहे. कर्जतमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मद्याच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या तरूणाला समजविण्यास गेलेल्या एकावर चॉपरने हल्ला केला. ही घटना दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता शिरसोली प्र.बो. येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे मंगश भगवान नाईक (वय २९) हा वास्तव्यास आहे. दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री गोकूळ अशोक चौधरी हा मद्याच्या नशेत शिवीगाळ करत होता, तेव्हा मंगेश हा त्याला समजविण्यासाठी गेला असता, त्या गोकूळ आणि यश चौधरी यांना राग आला. गोकूळ याने मोगरीने तर यशने मंगेशवर चॉपरने हल्ला केला, यात ते गंभीर जखमी झाले असून मंगळवारी त्यांनी फिर्याद दिली त्यानुसार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एका महिलेने हातचलाखीने तब्बल ४ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासात हीच महिला तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर. सी. बाफना ज्वेलर्स (सुभाष चौक) येथील व्यवस्थापक गणेश राजाराम काळे (रा. अयोध्या नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी अंगठ्यांच्या ट्रेमध्ये २२ कॅरेट सोन्याच्या अंगठीच्या जागी नकली अंगठी आढळली. सीसीटीव्ही तपासात २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली महिला दुकानात आल्याचे दिसून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक गर्दीची ठिकाणे असोत वा उपनगरांमधील रस्ते, सर्वत्र सोनपोत लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य केले जात आहे आणि दुचाकीवर येऊन अशा चोऱ्या केल्या जात असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशीच एक घटना शहरातील शिवशक्ती नगर परिसरात सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

यावल : प्रतिनिधी महामार्गावर फॉरेस्ट नाक्याजवळ एका चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासारखेडा येथील रहिवासी रसूल रहिमान तडवी, आलिशान रहिमान तडवी व सलीमा रहीम तडवी हे तिघे दुचाकी (क्र. एम.एच. १९ डी.वाय. ९०४७) वरून यावलहून चोपड्याकडे जात होते. दरम्यान, फॉरेस्ट नाक्याजवळ चारचाकी कार (एम.पी. ०९ डब्ल्यूएल. ३९१५) वरील अज्ञात चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. तिन्ही जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अलीशान रहिमान तडवी या महिलेला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.६ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुमची अडकलेली बहुतांश काम पूर्ण होऊ शकतात. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता. आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या. वृषभ राशी आज तुमची प्रलंबित कामे सहजपणे पूर्ण होतील. राजकारणात सहभागी असलेल्या या राशीच्या लोकांना एखाद्या प्रमुख पक्षात इच्छित पद मिळू शकते. आज तुम्ही मित्रांसोबत सहलीला देखील जाऊ शकता. मिथुन राशी आज, तुमचा कल धार्मिक कार्यांकडे जास्त असेल. तुम्ही नवीन योजना बनवू शकता. कोणतेही रखडलेले काम पुन्हा सुरू करू शकता. घराबाहेर पडण्यापूर्वी सर्व गोष्टी नीट तपासून घ्या. कर्क राशी आजचा दिवस तुमच्या कुटुंबात नवीन…

Read More

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील फलटण येथील मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ.संपदा मुंडे काम करत होत्या, परंतु वरिष्ठांच्या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. शनिवारी मनोज जरांगे हे स्वतः मुंडे कुटुंबीयांच्या भेटीला वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे गेले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की संपदाताईला न्याय मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. मुंडे कुटुंबीयांनी चार मागण्या केल्या, त्यातील एक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. यानंतर आता भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष आपापल्या परीने ज्या त्या स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील, असे फडणविसांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यामांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “निवडणुकांची घोषणा झाली असून आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. आमचे तिन्ही पक्ष आपापल्या परीने…

Read More

धरणगाव : विजय पाटील नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व पक्ष, उमेदवार आणि मतदार विकासाभिमुख नेतृत्व निवडण्यासाठी सज्ज झाले आहेत. शहराच्या सर्व ११ प्रभागांमध्ये तयारीचा जोर असून, तरुण मतदारांचा सहभाग या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा कल या वेळी स्थिर, पारदर्शक आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांकडे आहे. नागरिकांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि नव्या गुंतवणुकीसाठीचे प्रयत्न या मुद्यांवर चर्चा रंगत आहे. तरुण मतदार सोशल मीडियाद्वारे प्रचारात सक्रीय दिसत असून, “या वेळी पक्ष नव्हे, तर काम करणाऱ्यांना संधी” असे मत व्यक्त…

Read More