जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पळसोद येथील सुनिल भगवान सोनवणे (वय २८) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील पळसोद येथे सुनिल सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. गुरुवार दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास सुनिल याने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच सुनिल सोनवणे याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. सुनिल याने नेमक्या कोणत्या…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील बहादरपूर येथे ४ रोजी साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवादरम्यान पारोळ्यातील भटू पाटील यांची दुचाकी चोरीस गेली होती. त्यांनी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी पारोळा पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, बहादरपुर येथे ४ रोजी श्री बद्रीनाथ महाराजांचा यात्रोत्सव साजरा केला. या यात्रेत पारोळ्यातील ओम नगरमधील भटू विष्णू पाटील (वय ४९) हे दुचाकीने कुटुंबासह गेले होते. तेथून भटू पाटील यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच- १९, बीएफ- ६६७५) चोरट्याने चोरुन नेली होती. या बाबत भटू पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृताचे नाव प्रकाश राजकमल कांबळे (वय ४८, रा. रामेश्वर कॉलनी) असून ते मजुरीचे काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रकाश कांबळे यांचा मृतदेह मेहरुण तलावात तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने कसोशीने प्रयत्न करत मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शासकीय प्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रकाश कांबळे यांना मयत घोषित केले. प्रकाश कांबळे यांच्या अकाली…
आजचे राशिभविष्य दि.८ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. वृषभ राशी कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळा, कारण यामुळे तुमचे काम लांबेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कोणत्याही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी, मित्रांसोबत वेळ घालवा आणि भविष्याबद्दल विचार करा. मिथुन राशी दैनंदिन कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो. व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी वडिलांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वडिलांच्या पायांना स्पर्श केल्याने संपत्ती वाढेल. तुमचे वडील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु जरांगे पाटील यांनी मुंडेंवर घातपाताचे आणि अन्य गंभीर आरोप केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ते आरोप खंडित केले आणि स्वतःची बाजू मांडली. मुंडे म्हणाले की, त्यांचा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करावी आणि तरीही सत्य बाहेर येत नसेल तर तपास सीबीआयकडे द्यावा. या वक्तव्यांनंतर जरांगे पाटीलही थेट माध्यमांसमोर येऊन पलटवार केला; त्यांनी धनंजय मुंडे यांना धन्या, म्हणून संबोधत ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यातले पुरावे दाखवले. जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्या आणि मुंडेंमध्ये वैयक्तिक वैर नाही,…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा २०१९ ते लोकसभा २०२४ निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ १ हजार ९५२ इतकी होती. मात्र, लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत ८ हजार ४०० मते वाढली. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मतदान केले होते, त्यांची व कुटुंबीयांची नावे विधानसभा २०२४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारयादीमध्ये नव्हती. मुलाचे आणि वडिलांचे नाव वेगवेगळे असणे, घर क्रमांक शून्य असणे, एकाच व्यक्तीचे नाव शहरातसुद्धा आणि ग्रामीण भागातसुद्धा असल्याचे आढळले. असे दुबार मतदार हे प्रामुख्याने भाजपचेच कार्यकर्ते आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत असताना आता मुक्ताईनगर जवळील बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव मंदिराजवळील वळणावर लक्झरी बस आणि बल्करची धडक झाली. त्यात बल्कर चालक जागीच ठार झाला, तर बसचालक गंभीर जखमी झाला. ५ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता हा अपघात झाला. या दुर्घटनेत २८ प्रवासी बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी लक्झरी बस (क्र.एमपी.०९-एफए ९७१०) अकोटवरून इंदूरकडे जात होती. यावेळी सिमेंटचे बल्कर (क्र.एमएच.४६-सीयू.८१ ५४) हे खामखेडा जवळ बी.एन. अग्रवाल यांच्या रस्त्याच्या कामावरून सिमेंट खाली करून धुळ्याकडे जात होते. मुक्ताईनगर जवळील महादेव मंदिरासमोरील वळणावर लक्झरी व बल्करची समोरासमोर धडक झाली. त्यात बल्कर चालक प्रमोद जग्गेभान पटेल (वय २३, रा. पुनिया खुर्द,…
बीड : वृत्तसंस्था मराठा समाजायचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मंत्री आ. मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादात आज माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि मनोज जरांगे व माझी नार्को-टेस्ट करण्याची मागणी केली. मुंडे म्हणाले की, “मनोज जरांगे मला टार्गेट करत आहेत कारण मी त्यांना दोन प्रश्न विचारले — त्यामुळे ते मला टार्गेट करत आहेत. त्यांनी जे आरोप केले आहेत त्यावर सीबीआय चौकशी व्हावी. माझ्यासह जरांगे यांची नार्को-टेस्ट व्हावी; त्यासाठी मी कोर्टाकडून परवानगी घेतो.”…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा देणारे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी दावा केला आहे की, त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी रचला असून, त्यासाठी अडीच कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ऑफर देण्यात आली होती. जालना पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, या कटामागे एका बड्या नेत्याचा पीए आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “बीडच्या मोठ्या नेत्याच्या पीए कांचन या व्यक्तीने आरोपींकडे संपर्क साधला. त्यांनी मला अपघातासारखे दाखवून ठार…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांचे पुत्र मोठ्या चर्चेत आले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील जमीन व्यवहारात ६ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, पण यामध्ये पार्थ पवार यांचे आणि त्यांच्या कंपनीचे नाव वगळण्यात आले आहे, असा आरोप विरोधी नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. कोरेगाव पार्क या हायप्रोफाईल आयटी पार्क परिसरात घनदाट वनउद्यान असलेली सुमारे १,८०० कोटी रुपये बाजारमूल्याची ४० एकर शासकीय जमीन सरकारी यंत्रणांना हाताशी धरून पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ ३०० कोटींना विकण्यात आल्याचा व त्याद्वारे…

