मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवर बेधडक विधाने करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रूपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकरणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्ते पदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृ्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या 17 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. त्यात रूपाली पाटील व अमोल मिटकरी या 2 नेत्यांची नावे नाहीत. या यादीद्वारे राष्ट्रवादीने…
Author: editor desk
राज्यात खळबळ : राज्याचे संकटमोचक मोठ्या संकटात ! ….सविस्तर वृत्त लवकर : पाहत राहा live महाराष्ट्र …
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात महायुतीत फुट पडत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आता जशास तसे उत्तर देत थेट आव्हान दिले आहे. मंत्री उदय सामंत यांनी ‘कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल, तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला उदय सामंत यांचे नाव न घेता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल,…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिलखेडे येथील रहिवासी शुभम प्रभुदास भालेराव (वय २४) याचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना, रविवार, ९ रोजी घडली. शुभम आपल्या कुटुंबातील तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे, पण ज्या घरात एका महिन्यानंतर दुसऱ्या बहिणीचे लग्न होणार होते, त्या घरात आता भयाण शांतता आणि दुःख दाटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी आहेत. शनिवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शुभम आपल्या मित्रांसोबत गावातील गिरणा नदीत गेला होता. पोहत असताना, तो मुख्य धारेत अडकून नदीत बुडाला. शुभम वाहून गेल्याचे समजताच गावातील आणि परिसरातील नागरिकांनी पिलखेडेपासून ते रामेश्वरपर्यंत…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील मलकापूर रस्त्यावरील टेनिस कोर्टमध्ये रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील काही मुले टेनिस खेळत असताना अल्पवयीन काही बालकांनी एका बालकावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले खेळत असताना त्या ठिकाणी काही सात ते आठ अल्पवयीन मुले आले व त्यांनी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन ते तीन बालकाच्या हातात धारदार चाकू होता. चाकू पाहून काही विद्यार्थी तेथून पळून गेले, तर पाचवीत शिकणारा ११ वर्षीय स्वरूप यशपाल बडगुजर याच्यावर इतर अल्पवयीन बालकांनी काहीही विचार न करता चाकूने वार केला. त्यात तो रक्तबंबाळ झाला. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. स्वरूपच्या सोबत असलेल्या काही बालकांनी…
जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून संध्याकाळपासून सुरू असलेली धुसफूस वाढत जाऊन रविवारी रात्री १०.३० वाजता थेट गोळीबार करण्यात आल्याची घटना कांचन नगरात घडली. यामध्ये आकाश युवराज बाविस्कर उर्फ टपऱ्या याचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. गोळीबार करणारा आकाश सपकाळे हा पसार झालेला आहे. हद्दपार आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर सपकाळे यांच्यामध्ये जुना वाद आहे. आकाश रविवारी आला असता परिसरात संध्याकाळपासून धुसफूस सुरू होती. रात्री हा वाद वाढत जाऊन आकाश याने सागरच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. यात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला व आकाश बाविस्कर यांच्या छातीत गोळी लागली.…
आजचे राशिभविष्य दि.१० नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक वाद दूर होतील. तुमच्या नातेसंबंधात गोडवा येईल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. मुले आनंदी राहतील. जुन्या मित्राची भेट फायदेशीर ठरु शकते. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सकारात्मक विचार करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मिश्र स्वरुपातील परिणामांचा असणार आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतल्याने तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे…
अमरावती : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. “जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला मी एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देईन,” अशी धक्कादायक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात नेहमीच विविध विषयांमुळे खळबळ उडत असते. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बांद्रा येथील निवासस्थान ‘मातोश्री’ परिसरात 2 संशयित ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेमुळे मातोश्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, तसेच भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. नेमंक काय घडलं? मुंबईच्या बांद्रा मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या आसपास दोन संशयास्पद ड्रोन उडताना दिसले होते. यामुळे नागरिकांमध्ये घाबराट निर्माण झाली होती. हा परिसर अतिशय संवेदनशील असल्याने, ड्रोन नेमका कोणी उडवला? यामागे हेतू काय होता? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले होते. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असतानाच,…
फैजपूर : प्रतिनिधी फैजपूर शहरात आज दि.९ नोव्हेंबर रोजी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सामीलच्या समोर, सावदा रोडवर असलेल्या राज लॉजिंग आणि संसार फर्निचर मॉलला ही आग लागली असून, संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली असून, पोलिसांनी सुरक्षा व रहदारी नियंत्रणासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक…

