चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील धानोरा येथे होमगार्डच्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एएचटीयू या विशेष शाखेच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून पीडित महिलेची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास झाली. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील धानोरा येथे राहणाऱ्या चंद्रकांत सुपडू सोनवणे यांच्या घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती एएचटीयू विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून या कुंटणखान्यावर कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले होते. पथकाने डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यासाठी पाठविले. त्या ग्राहकाने इशारा देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने कुंटणखाना सुरु असलेल्या घरावर छापा टाकला. या कारवाईमध्ये पीडित महिलेची सुटका करण्यात आली. ज्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सावत्र वडिलांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तराखंड आणि जळगावातील पोलिस वसाहतीमध्ये घडला. पीडिता पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेची मुलगी आहे. याप्रकरणी सोमवारी (१७ नोव्हेंबर) मध्यरात्री गोधरा हरिपूर, जि. नैनीताल, उत्तराखंड येथील रहिवासी सावत्र वडिलांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दलात कार्यरत महिला कर्मचारी मुलीसह पोलिस वसाहतीमध्ये राहते. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर विवाह जुळविणाऱ्या वेबासाइटवरून परिचय झाल्याने तीन वर्षांपूर्वी उत्तराखंड येथील इसमासोबत पुनर्विवाह झाला. सन २०२४मध्ये दिवाळीची सुटी घालविण्यासाठी सदर महिला पोलिस व तिची १५ वर्षीय मुलगी उत्तराखंड येथे…
धरणगाव : प्रतिनिधी शहरात दुचाकीला अडकवलेली १ लाख रुपये असलेली बॅग लंपास झाल्याची घटना उड्डाणपुलाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील भैय्यासाहेब नीळकंठ पाटील हे पेन्शनर आहेत. ते त्यांच्या पेन्शनची रक्कम काढण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बँकेतून १ लाख रुपये रोख काढले. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे भाऊ रवींद्र निळकंठ भदाणे आणि स्वतः भैय्यासाहेब हे दोघेजण हेडगेवार नगरमध्ये जाण्यासाठी निघाले असता उड्डाणपूल जवळील पान सेंटरवर थांबले. त्याचवेळी एक अनोळखी जवळ येऊन त्याने तुमच्या दुचाकीच्या सीटवर काहीतरी पडल्याचे सांगितले. त्याचवेळेस त्यांनी त्यांच्या हातातील पैशांची पिशवी दुचाकीच्या स्टॅन्डला अडकवली व थोड्याच वेळात ती बॅग त्यात असलेले १ लाख रुपये रोख पैसे,…
जळगाव : प्रतिनिधी गेट टुगेदर’ कार्यक्रमाहून घराजवळ पोहोचल्यानंतर तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अनिता अरुण ढाके (४८, रा. अयोध्यानगर) यांच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनपोत व १० ग्रॅमची सोन्याची चेन ओढून नेली. ही घटना रविवारी (दि. १६) अयोध्या नगरातील संजीवनी अपार्टमेंटजवळ घडली. एमआडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या नगरातील अनिता ढाके या काशीबाई कोल्हे शाळेत येथे ‘गेट टुगेदर’च्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून त्या मैत्रिणींकडे व त्यानंतर घरी पोहोचल्या. संजीवनी अपार्टमेंटजवळ पोहोचल्यानंतर दुचाकीवरून उतरत असताना दुचाकीवरून दोनजण आले. त्यातील एकाने महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची आठ ग्रॅमची सोनपोत आणि ५० हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची चेन ओढून चोरटा दुचाकीवरून पसार झाला.…
आजचे राशिभविष्य दि.१९ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, ऑफिसमध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून थोडं सावध राहण्याची गरज आहे. ते तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणत्याही कामाच्या आधी तुमच्या वडिलांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केलेत तर जे फायदेशीर ठरतील. वृषभ राशी तुम्ही इतरांकडून काहीतरी नवीन शिकाल. तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण होतील. तुम्हाला आनंद होईल. तुम्ही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे टाळावे. तुमच्या योजनांबाबत गुप्तता राखा, नाहीतर विरोधक फायदा घेतील. मिथुन राशी तुमच्या कारकिर्दीत परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडे सावध राहण्याची गरज आहे. फास्ट फूड खाणे टाळावे, नाहीतर पोटदुखी सतावेल. कर्क राशी आजपर्यंत तुम्ही…
मुंबई : वृत्तसंस्था घाटकोपर परिसरातील एका शाळेत सोमवारी सकाळी घडलेल्या प्रकाराने पालकांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. शाळेच्या कॅन्टीनमध्ये दिलेल्या समोशामुळे तब्बल 15 ते 16 विद्यार्थ्यांची अचानक तब्येत बिघडली. सकाळच्या सुट्टीत अनेक विद्यार्थ्यांनी समोसे खाल्ल्यानंतर काही मिनिटांतच त्यांना मळमळ, चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. परिस्थिती गंभीर होताच शिक्षक आणि शाळा प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथक बोलावले. काही विद्यार्थ्यांना पालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आले, तर काही पालकांनी स्वतःच्या वाहनातून मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही गंभीर धोका नाही. घटनेनंतर पालकांनी शाळेच्या कॅन्टीन व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, शाळेच्या प्राचार्यांनीही समोसा चाखताना त्याला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकरांवरील म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाचे धोरण निश्चित केले. या निर्णयामुळे मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे निर्माण होण्याचा मार्ग खुला झाला आहे. तसेच आयकॉनिक शहर विकासासाठी स्वतंत्र धोरणालाही मंजुरी देण्यात आली. मात्र या बैठकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने मंत्रिमंडळाने जनतेवर थेट परिणाम करणारे कोणतेही मोठे निर्णय न घेता, केवळ सहा निवडक विषयांवर निर्णय घेतला. त्यात म्हाडाच्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकास धोरणाचा समावेश होता. सरकारच्या मते, या निर्णयामुळे मोठ्या जागांवरील जुन्या इमारती वसाहती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या वादामुळे निवडणुकीचे भवितव्य अनिश्चिततेत अडकले आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू केल्यानंतर अनेक शहरांमध्ये एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे गेल्याच्या तक्रारीवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिल्यास आम्ही निवडणूक प्रक्रियाच थांबवू,” असा ठणकावता इशारा न्यायालयाने दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, पूर्वीच्या आदेशानुसार बांठिया आयोगाचा अहवाल लागू करण्यापूर्वीची स्थिती कायम ठेवूनच निवडणुका घ्याव्यात, म्हणजेच ओबीसी आरक्षण नसलेल्या आराखड्याने निवडणूक प्रक्रिया…
धुळे : प्रतिनिधी पिंपळनेर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री २.५५ वाजेच्या -सुमारास उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निशा राया वाळवी (वय १८, रा. अस्तंबा, जि. नंदुरबार) या विद्यार्थिनीने १७ नोव्हेंबर रोजी रात्री २.५५ वाजता वस्तीगृहाच्या दुसऱ्या इमारतीतील शौचालयाच्या खिडकीत ओढणी बांधून आत्महत्या केली. वॉचमन सुनीता पावरा यांनी तातडीने गृहपाल विमल जाधव यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत विद्यार्थ्यांनीस पहाटे ४ वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांनी विद्यार्थिनीस तपासून मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीकडे कुठल्याही…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील दिनकर नगरातील रहिवासी हर्षल प्रदीप भावसार (वय ३१) या तरुणाचा मृतदेह रविवारी मध्यरात्री दीड वाजता जळगाव ते भादली रेल्वे रुळावर आढळून आला. तर तरुणाची दुचाकी का.ऊ. कोल्हे शाळेजवळ मिळून आली. तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणासोबत घातपात झाल्याचा आरोप केला. तरुणाला मारुन त्याचा मृतदेह रुळावर टाकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दीनकर नगरात हर्षल भावसार हा तरुण वास्तव्यास होता. एमआयडीसीतील एका कंपनीत काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्याने घरी आईला भाजी आणून दिली व स्वयंपाक करून ठेव असे सांगून…

