जालना : वृत्तसंस्था शहरातील सीटीएमके गुजराती विद्यालयातील एका 13 वर्षीय विद्यार्थिनी शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पण विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेची गोष्ट ठरत आहे. सविस्तर वृत्त असे कि, जालन्याच्या सीटीएमके गुजराती विद्यालयातील एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारत मृत्युला कवटाळले आहे. आरोही दीपक बिर्लान असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता आठवीत शिकत होती. आज सकाळी शाळेची प्रार्थना झाली. त्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात जात होते. आरोही देखील आपल्या वर्गात गेली होती. त्यानंतर तिने अचानक उडी मारली. हा प्रकार घडला तेव्हा सर्व शिक्षक प्रार्थनेसाठी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणारा तणाव हुतात्मा स्मारकावरील कार्यक्रमात स्पष्टपणे झळकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या काही अंतरावर उभे असतानाही नेहमी दिसणारी सहजता, संवाद आणि परस्परांतील जोड काही काळातच लोप पावल्याचे पाहायला मिळाले. दोघांची तणावपूर्ण देहबोली महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत देणारी ठरली. भाजपच्या प्रदेश नेतृत्वातील बदलांच्या चर्चेमुळे आणि शिंदे–रवींद्र चव्हाण यांच्यातील मतभेदाने महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेतील घडामोडींवरून चव्हाण यांच्याकडे बोट दाखवले जात असताना, एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजीचा सविस्तर पाढा मांडल्याचे समजते. मात्र शाह यांनी परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले, पण ठोस…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग ६ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम हडपण्यासाठी एका ५८ वर्षीय महिलेने नावाचे साम्य साधून बनावट कागदपत्र सादर करत शासनाची १६ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित पुष्पा देवराम जावळे (वय ५८, रा. अंबिका सोसायटी धुळे) महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गट नं. २२०६ मध्ये मूळ मालक पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. भुसावळ) यांच्या मालकीच्या ४८८ चौ.मी. जमिनीचे २०११ आणि २०१३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन झाले होते. या…
धरणगाव : प्रतिनिधी एरंडोल मॉर्निंग वॉक करणाऱ्या धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी रघुनाथ महाजन (४२, मूळ पारोळा, ह. मु. एरंडोल) यांना वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग हॉलसमोर गुरुवारी सकाळी घडली. क्रमांक ६वर येथील बैठक हॉलसमोर गुरुवारी सकाळी घडली. शिवाजी महाजन हे धरणगाव तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. ते एरंडोलहून धरणगावला ये-जा करायचे. ते त्यांच्या मित्रांसोबत दररोज सकाळी पायी फिरायला जात असत नेहमीप्रमाणे ते एरंडोल-पारोळा महामार्गावर फिरायला गेले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (एचआर३८/एडी४१३६) जागीच कोसळले. चालक डंपर त्यांना धडक दिल्याने ते सोडून पळून गेला.
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथील दीपनगर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लांडवंजारी (वय ५७, रा. नेहरुनगर, जळगाव) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराचे मोठे विद्युत बिल दुरुस्त करून वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी लांडवंजारी यांनी ही लाच मागितली होती. अभियंता लांडवंजारी यांच्या अखत्यारीत तक्रारदाराचे वीज बिल दुरुस्त करण्याचे काम होते. त्यांनी २ लाख ५९४ रुपये देयके दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या ५ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बुधवारी (१९ नोव्हेंबर) एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर, आज गुरुवारी (२० नोव्हेंबर) एसीबीने दीपनगर येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा…
आजचे राशिभविष्य दि.२१ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, यामुळे तुमचे काम सोपे होईल. तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून काही सल्ला मिळेल. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटून आनंदी व्हाल. वृषभ राशी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार कराल. आज तुमची आवड आध्यात्मिक ज्ञानात असेल. व्यवसाय आणि कुटुंबात संतुलन राखले जाईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेल्या कामाचा होईल श्रीगणेशा, मागचे शुक्लकाष्ठ संपेल , कामात यशही मिळेल. मिथुन राशी आज, इतरांमध्ये हस्तक्षेप केल्याने बदनामी होऊ शकते. तुमचे मैत्रीपूर्ण वर्तन तुम्हाला लोकांना आवडेल. तुमचे विरोधक तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात, सतर्क रहा. कर्क राशी आज ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला अचानक प्रवास करावा…
हिवाळ्यात शेंगदाणे हा सर्वांचा आवडता नाश्ता असतो. अनेक वर्षांपासून आजी-आजोबा थंडीत शेंगदाणे खाण्याचा सल्ला देत आले आहेत. योग्य प्रमाणात शेंगदाणेचे सेवन शरीरासाठी अत्यंत हितकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्यात प्रोटीन, चांगले फॅट, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर आणि व्हिटॅमिन ई असे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे शेंगदाणे पौष्टिकतेचा उत्तम स्रोत मानले जाते. सर्दीत शेंगदाणे खाण्याचे प्रमुख फायदे 1. हाडे मजबूत होतात हेल्थ एक्स्पर्ट्स सांगतात की शेंगदाण्याचे नियमित सेवन हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. हिवाळ्यात हाडांच्या तक्रारी वाढू नयेत, यासाठी रोज एक मूठ शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते. 2. सर्दी-खोकल्यापासून दिलासा मिळतो शेंगदाणे शरीराला उष्णता देते. त्यामुळे सर्दी, खोकलापासून आराम…
जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी दावा केला आहे की त्यांच्या घातपाताच्या कटामागे धनंजय मुंडेच मुख्य सूत्रधार आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी स्वतःला देण्यात आलेले पोलिस संरक्षण नाकारण्याचा निर्णय घेत, ते तातडीने काढून घेण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यांच्या वतीने सहकारी किशोर मरकड यांनी आज जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे अधिकृत अर्ज सादर केला. अर्जात जरांगे यांनी नमूद केले आहे की त्यांच्या जीवावर झालेल्या कटाचे सूत्रधार…
संकटमोचकांचा करिश्मा : जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन जामनेर : प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी भाजपकडून नगराध्यक्ष बिनविरोध होत असल्याच्या चर्चेला आता जळगाव जिल्ह्यातही अधिक बळ मिळाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जामनेर नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर साधनाताई गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून, भाजपसाठी ही मोठी प्रतिष्ठेची कामगिरी मानली जात आहे. जामनेरमध्ये महाजन यांच्या प्रभावी राजकीय संघटनशक्तीची पुन्हा एकदा झलक दिसली. नगराध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने उमेदवारी दाखल न केल्याने साधनाताई महाजन यांची निवड घोषीत करण्यात आली. यानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. यासोबतच संपूर्ण नगरपालिका बिनविरोध होण्याचीही चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात महायुतीत नाराजीची राज्यभर जोरदार चर्चा सुरु असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीला भेट देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा संदर्भ स्पष्ट होत नसतानाच विरोधकांनी या दौऱ्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीवर टिप्पणी करत उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याचे खरे कारण वेगळे असल्याचा आरोप केला. शिंदेंच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेत त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत, तर प्रत्यक्ष निर्णय दिल्लीतील नेतृत्वाकडून घेतले जातात. अमित…

