Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः रवींद्र चव्हाण हे मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून भाजपकडे वळवत असल्याची तक्रार शिंदेंनी केली असल्याचे सांगितले जाते. या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे आश्वासन अमित शहांनी शिंदेंना दिले. शिंदे आणि अमित शहा यांच्यात सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीत उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दलही शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. “माझी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  शहरातील मानराज पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवत एका वृद्धाच्या बोटातील सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. काही वेळातच सत्य लक्षात आल्यानंतर वृद्धाने त्या दोघांचा शोध घेऊन अंगठी परत मिळवली. संतप्त नागरिकांनी या दोघांना चोप देत रामानंद नगर पोलिसांच्या हवाली केले. मिळालेल्या माहितीनुसार, मानराज पार्कजवळ राहणाऱ्या वृद्धाला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन जण साधूच्या वेशात भेटले. त्यांनी धर्म, दानधर्माच्या नावाखाली वृद्धाला बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखी करत बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. थो़ड्याच वेळात अंगठी गायब असल्याचा प्रकार वृद्धाच्या लक्षात आला आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेतला. दोघे साधू सापडताच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  फेसबुक पाहत असताना गुंतवणुकीची जाहिरात दिसली अन् तिला क्लिक करताच लिंक ओपन होऊन मोठ्या परताव्याचे अमिष दिसले. त्याला बळी पडून एका वकिलाची २१ लाख ५२ हजार ३६५ रुपयांमध्ये फसवणूक झाली. हा प्रकार १ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान घडला. भुसावळ येथील अॅड. विवेक पाटील (४९) हे १ ऑक्टोबरला फेसबुक पाहत असताना त्यांना गुंतवणुकीविषयी ही जाहिरात दिसली. सविस्तर वरुत असे की , कंपनीत जेवढी गोल्ड गुंतवणूक कराल त्याच्या दामदुप्पट फायदा होईल, असे अॅड. पाटील यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी त्यांचे नवीन टेलिग्राम खाते उघडले. त्यावर आलेल्या मेसेजनुसार पाटील हे माहिती देत गेले. हे सर्व झाल्यानंतर कंपनीचा सिनियर मॅनेजर…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सायगाव येथे उसाच्या जाळलेल्या पाचटची ठिणगी शेजारच्या शेतातील उसात पडली. त्यात लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना सायगाव (ता. चाळीसगाव) परिसरातील शेतात बुधवारी दुपारी १२:३० ते एक वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा दत्तात्रेय माळी (४२, रा. सायगाव, ता. चाळीसगाव) असे या मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी रेखा माळी मजुरीसाठी शेतात गेल्या होत्या. या परिसरातील एका शेतातील ऊस कारखान्याकडे पाठविण्यात आल्यानंतर शिल्लक पाचट जाळले जात होते. त्यातीलच एक ठिणगी शेजारच्या शेतातील उसात उडाली. वाऱ्यामुळे उसाने पेट घेतला. त्याच वेळी रेखा माळी या याच उसाच्या शेतात काम करीत होत्या. या ठिणगीने रौद्ररूप धारण…

Read More

आजचे राशिभविष्य दि.20 नोव्हेंबर 2025 मेष राशी आज, तुम्हाला तुमच्या कामासाठी एक नवीन कल्पना सुचू शकते आणि तुम्ही लवकरच ते काम सुरू करू शकता. तुम्हाला मालमत्तेसाठी चांगला सौदा मिळू शकतो. वृषभ राशी आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या प्रियकराशी तुमचे संबंध चांगले असतील. मिथुन राशी तुम्ही इतरांसोबत वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे. कोणीतरी तुमची अधिकृत माहिती लीक करू शकते. तुमच्या कामात काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क राशी तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्यासाठी अनेक गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. ते दिल्लीमध्ये भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. शिवसेना शिंदे गटाने मंगळवारी भाजपवर पक्षातील पदाधिकारी फोडण्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाचे मंत्री गैरहजर राहिले. बैठकीनंतर शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना फटकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या तणावानंतर बुधवारी शिंदेंनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागात दोन महिने बंद असलेल्या घरात घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लक्ष्मी नगर भागात राहणारे फिर्यादी राजेंद्र दुसाने घरातील एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी, तांबे-पितळी भांडी यासह इतर संसारोपयोगी वस्तू चोरीला गेल्याचे १२ नोव्हेंबर रोजी निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी अंमलदारांचे एक पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या नाराजीनाट्याचा आज पुन्हा एकदा पहावयास मिळाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार होते. पण शिंदेंनी ऐनवेळी या कार्यक्रमापासून अंतर राखले. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिंदे गटातील धुसफूस कमी होण्याऐवजी वाढल्याचे चित्र आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी साप्ताहिक बैठक झाली. पण शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भाजपवर फोडाफोडीचे आरोप करत या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे हजर होते. पण फडणवीसांनी शिंदेंपुढेच त्यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सलग दहा वर्ष प्रभावानंतर एरंडोल भडगाव विधानसभा मतदारसंघात 1995 ला पारोळ्याचे भाग्यविधाते कै. भास्करराव राजाराम पाटील यांना विधानसभा निवडणुकीत चष्मा ही निशाणी मिळाली होती त्या काळात भास्करराव आप्पा हे अपक्ष उमेदवार होते. सलग दहा वर्ष प्रभावानंतर जनतेमध्ये प्रचंड उत्साह होता आप्पा तुम्ही प्रचार करू नका आम्ही समोरच्यांची डिपॉझिट जप्त करतो अशी भाषा वापरली गेली. मतदार राजा ही शब्दाला जागले अखेर चार प्रमुख उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. आप्पा हे राज्यात पहिला क्रमांकाच्या मतांनी विजयी झाले . याच इतिहासाची पुनरावृत्ती पारोळा नगरपालिकेत होणार असून भास्करराव आप्पा यांच्या नातू सुन लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अंजली करण पाटील व माजी मंत्री डॉक्टर…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शहरात निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नगरपालिका सभागृहात आज अर्जाची छाननी करण्यात आली. यात नगराध्यक्ष पदासाठी दाखल २३ अर्जापैकी ११ अर्ज अवैध ठरलेत. तर १२ अर्ज वैध ठरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी वैध अर्जामध्ये जान्हवी नीलेश चौधरी, रेखा भागवत चौधरी, लीलाबाई सुरेश चौधरी, वैशाली विनय भावे, चंद्रकला वसंतराव भोलाणे, पुष्पा ज्ञानेश्वर महाजन, मोनिका महेंद्र महाजन, सुनीता दिलीप महाले, ज्योती विनोद माळी, उषा गुलाबराव वाघ, रिता प्रथमेश सूर्यवंशी यांचा समावेश आहेत. तर माघारी नंतरच हे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, नगरसेवक पदासाठी २८७ अर्ज दाखल झाले होते. त्यातील २९ अर्ज अवैध ठरलेत तर २५८ अर्ज वैध ठरले आहेत.

Read More