कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असतानाच, या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश मुरगूड पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाद्वारे केला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून, मुरगूड पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. आज राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी बसले आहेत आणि अनेक केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही समावेश आहे. या सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथून ताब्यात…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी शहरातील धरणगाव रस्त्यावर २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे की , येथील मोरफळ गल्लीत राहणार चेतन सुरेश भावसार (वय ३०) हा तरुण २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकी एमएच – १९, डीएफ-५०३०) ने येत असताना पारोळा शहराजवळील धरणगाव रस्त्यालगत अज्ञात वाहनाने धडक त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुर्दैवाने चेतन भावसार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भावेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या…
जळगाव : प्रतिनिधी जळगावातील अटक बोगस कॉल सेंटर हाताळणारे आदील सैयद निशार अहमद सैयद (३२, रा. ओशिवरा, मुंबई) व अकबर खान रौनक अली खान (४०, रा. मालाड पूर्व मकराणी पाडा, मुंबई) या दोघांना मुंबई येथून करण्यात आली आहे. दोघांच्या अटकेमुळे फसवणुकीची रक्कम कोणाच्या खात्यावर आली यासह अनेक बाबींचा उलगडा होऊन आंतरराष्ट्रीय रॅकेटही उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता १० झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील एल. के. फार्म हाऊस येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल होऊन आठ जणांना अटक करण्यात आले होते. ते…
भुसावळ : प्रतिनिधी माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची दि. २९ मे २०२४ रोजी हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी गोलू ऊर्फ धरमसिंग रायसिंग पंडित (वय ३०) याला अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की , पंडित हा भुसावळात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळाली. त्यांनी वाल्मीक नगर परिसरात सापळा रचत आरोपी पंडित याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे घटनेच्या रात्री राखुंडे आणि बारसे यांना जळगावहून भुसावळकडे कारने येत असताना मरिमाता मंदिरासमोरील पुलाजवळ हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोघांचा जागीच…
जळगाव : प्रतिनिधी शेत जमीन विक्री असल्याचे सांगत जमीन मालक म्हणून दुसऱ्याच महिलेला उभी करून भगवान काशिनाथ सोनवणे (४२, रा. शिवाजीनगर) यांची सात लाख ७४ हजार ७८६ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. खरेदीवेळी हा प्रकार वेंडरच्या लक्षात आल्याने खरेदी-विक्रीचा व्यवहार फसला. हा प्रकार २० जानेवारी ते २८ एप्रिल यादरम्यान घडला. या प्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी शहर पोलिसात फसवणूक करणाऱ्या राजपूत नाव सांगणारी महिला, असलम खान अशरफ खान (रा. गेंदालाल मिल), हुसेन मर्चट (रा. नंदुरबार), प्रभाकर सुभाष देशमुख (रा. धुळे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील रहिवासी भगवान सोनवणे यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीतील असलम खान अशरफ…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील दोन भाऊ शिरसाळा येथे दर्शनासाठी जात असताना चुलत भाऊ दुचाकी अपघातात ठार झाले. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश समाधान माळी (१७) आणि शुभम भिका माळी (२१, दोघे रा. पाळधी ता. जामनेर) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघे चुलत भाऊ शनिवारी सकाळी चार वाजता शिरसाळा येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी पाळधी येथून निघाले. बोदवडकडे जात असताना मालदाभाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पडले. त्यांना गळा व डोक्याला जबर मार लागला. दोघेही गंभीर जखमी अवस्थेत…
आजचे राशिभविष्य दि.२३ नोव्हेंबर २०२५ मेष राशी तुम्ही तुमच्या करिअरसाठी नवीन योजना बनवाल. तुम्ही तुमच्या गुरूकडून करिअर सल्ला घेऊ शकता. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. विवाहीत जोडप्याल गुड न्यूज मिळेल. वृषभ राशी आज तुम्ही व्यवसायानिमित्त परदेशात प्रवास करू शकता. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळू शकते. जवळच्या नातेवाईकाच्या आगमनाने घरातील वातावरण उजळून जाईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. मिथुन राशी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. त्यांच्या मनात नवीन कल्पना येतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. तुमचा व्यवसाय दुप्पट वाढण्याची शक्यता आहे. कर्क राशी तुम्ही मित्रांसोबत पिकनिकला जाऊ शकता. आर्किटेक्ट म्हणून…
अंबरनाथ : वृत्तसंस्था शहरातील उड्डाणपुलावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना उड्डाणपुलाशेजारील इमारतीवर बसवलेल्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६:४२ च्या सुमारास कार चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नियंत्रण सुटलेली कार रस्त्यावरून भरधाव वेगाने पुढे धावत गेली आणि समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अचानक धडकेचा इतका जोर होता की कारने दोन दुचाकींना चिरडले, तर इतर तीन ते चार दुचाकींना धडक देत कार उलटली. सीसीटीव्ही दृश्यांमध्ये एक दुचाकीस्वार धक्क्याच्या जोराने हवेत दोन-तीन फूट उडून उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. युतीसाठी शिवसेना (उबाठा) शी चर्चा करण्याचा एकमताने घेण्यात निर्णय आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा मनसे सोबतदेखील युती करण्यास हरकत नसल्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली आहे. दरम्यान, महानगरपालिकेसाठी मनसेला सोबत घ्यायचे की नाही, याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद दिसत आहेत. शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडल्याचे काँग्रेस नेते…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातील घाटकोपर परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्रोळी पार्कसाईटमध्ये राहणारे आणि परिसरात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर यांना गुरुवारी सीजीएस कॉलनीत निर्घृणपणे ठार मारण्यात आले. केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून सुरुवात झालेल्या वादाचे रुपांतर काही क्षणांतच भांडणात झाले आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात संताप व हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, पाचाडकर हे नियमितपणे घाटकोपर स्टेशन परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असत आणि त्या वेळीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेत आरोपी अमन श्रीराम वर्मा (वय 19) याला घाटकोपर पोलिसांनी अवघ्या पाच…

