मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आणि हिंदी सिनेमातील “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. वृत्तसंस्था IANS यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने १२ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरच्या घरी उपचार सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. पुढील महिन्यात, ८ डिसेंबरला, ते ९० वा वाढदिवस साजरा करणार होते. त्यांच्या वाढदिवसासाठी कुटुंबीयांनी विशेष तयारीदेखील केली होती. परंतु त्याआधीच त्यांचे निधन होणे ही मोठी धक्कादायक बाब आहे. या…
Author: editor desk
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात २८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) उघडकीस आली. साखरपुडा झालेल्या तरुणीशी मृत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दोन सख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव विशाल गणेशगीर गोसावी (वय २८, रा. जिजाऊनगर, मुक्ताईनगर) असे आहे. गेल्या दोन दिवसांपासून विशाल बेपत्ता होता. रविवारी सायंकाळी हॉटेल वृंदावनसमोरील प्लॉटिंग भागात स्थानिक नागरिकांना एका मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळला. देहावर चाकूने भोसकून केलेल्या हल्ल्याचे स्पष्ट चिन्हे दिसल्याने खुनाचा संशय बळावला.…
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांना पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री सुमारास वरळी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. आज त्यांना न्यायालयात उभे करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी वरळी येथील फ्लॅटमध्ये गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे–गर्जे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे आणि गौरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र या कालावधीत अनंत गर्जे यांचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती गौरी यांना मिळाल्याचे सांगितले जाते. या मानसिक त्रासातूनच गौरी यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. गौरीच्या…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे तसेच आसपासच्या शेतशिवारात सुरू असलेल्या रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकरी वर्गाचे हाल वाढले आहेत. दिवसा शेतीची कामे करून रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाण्याची वेळ आल्याने बळीराजा अक्षरशः हैराण झाला आहे. दिवसा चार दिवस वीजपुरवठा असला, तरी उर्वरित तीन दिवस रात्री वीज देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस रात्रपाळी करावी लागत आहे. सध्या कडाक्याच्या थंडीचा जोर असून अशा परिस्थितीत रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाणे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरत आहे. यंदा रब्बी हंगामात मका, गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पाटाचे आवर्तन अद्याप सुरू नसल्याने विहिरसिंचनावरच शेतकऱ्यांचा आधार आहे. मात्र कमी–जास्त दाबाच्या विजेमुळे…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरूड गावातील २४ वर्षीय तरुणाचा आंघोळ करताना अकस्मात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयूर नरेंद्र पाटील (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सकाळी अंदाजे १० वाजता आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता तो आतमधे कोसळलेल्या अवस्थेत आढळला. तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरूड ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र राजाराम पाटील यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अभ्यासू, नम्र व मनमिळाऊ स्वभावामुळे गावात त्याची चांगली ओळख होती. अवघ्या…
जळगाव : प्रतिनिधी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी पाचोराहून जळगावात आलेले शिक्षक संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) यांचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत संदीप पवार हे कार्यरत होते. दुचाकीने आल्यावर परीक्षेसाठी आत जाण्यापूर्वी ते महाविद्यालयासमोरील दुकानावर झेरॉक्स काढण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पवार यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. ते जुनी पेन्शन संघटनेचे विश्वस्त तसेच शिक्षक सेनेचे पाचोरा…
आजचे राशीभविष्य दि. २४ नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांकडून, विशेषत: मुलांकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडून, तुम्हाला एक चांगली आणि आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला आर्थिक व्यवहारांमध्ये बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण होण्याचे योग आहेत. तसेच, मुलांचे आरोग्य सुधारेल. सरकारी योजनांचा किंवा मदतीचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धार्मिक कार्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. तुमच्या चांगल्या कार्यामुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे समाजात…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत नदीपलीकडील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकासाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक निर्णायक असल्याचा संदेश भाजपने रविवारी आयोजित सभेत दिला. प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या आश्वासनांना प्रतिसाद देत ‘द बेस्ट चाळीसगाव’ या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला. अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत या भागातील समस्यांवर उपाय करण्याचे वचन आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी यावेळी दिले. आमदार चव्हाण म्हणाले की, “नदीपलीकडील भागाने वर्षानुवर्षे एका पक्षावर विश्वास ठेवून मत दिले, मात्र मूलभूत सुविधांसाठीही नागरिकांना सतत संघर्ष करावा…
चोपडा : प्रतिनिधी आगामी नगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) युतीतर्फे शहरात भव्य रॅली आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली. उत्साह, ऊर्जा आणि मोठ्या प्रमाणावरील जनसहभागामुळे ही सभा विशेष ठरली. युतीच्या नेत्यांच्या मते, मिळत असलेल्या लोकसमर्थनामुळे विजय निश्चित असल्याची भावना अधिक दृढ झाली आहे. रॅलीदरम्यान शहरातील विविध प्रभागांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण प्राणवान केले. नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत स्थानिक परिस्थिती, निवडणूक व्यवस्थापन, प्रचाराची आगामी रूपरेषा आणि संघटन बळकटीवर विस्तृत चर्चा झाली. या कार्यक्रमाला भाजप प्रवक्ते अॅड. अनिकेत निकम, जीवन चौधरी, भाजप जळगाव पूर्व सरचिटणीस राकेश पाटील, तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील,…
मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलात तर बारामती सारखा विकास तुमच्याकडे करील, असे विधान केले होते. या विधानाने विरोधकांनी सरकारवर थेट पक्ष निष्ठेच्या आधारे विकासाचे आश्वासन देत असल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत असतानाच, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वक्तव्यावर कडक शब्दांत टीका केली. नाना पटोले म्हणाले की, राज्याची तिजोरी एखाद्या व्यक्तीची संपत्ती नसून संपूर्ण जनतेचा निधी आहे. संविधानाने कोणत्याही मंत्र्याला तिजोरी लुटण्याचा किंवा…

