ठाणे : वृत्तसंस्था शहरातील पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील मामुली वादाने दोन दिवसांतच मोठे रूप धारण करत शहरात तणावाची परिस्थिती निर्माण केली. गांधीनगर येथील अनिल वाईन्ससमोर रिक्षा लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादादरम्यान उत्तर प्रदेशातील रिक्षाचालक शैलेंद्र संतोष यादव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर येताच मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात तणाव वाढला. मनसेकडून पोलिसांकडे तातडीने तक्रार करण्यात आली. पोलिसांनीही तत्परता दाखवत शैलेंद्र यादवला ताब्यात घेतले. मात्र पोलिस ठाण्यातच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची माहिती पुढे आली. स्वतः अविनाश…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. केंद्र सरकारतर्फे हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारला अधिक माहिती गोळा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी नियोजित केली. या निर्णयामुळे आधीच लांबलेल्या आरक्षण प्रक्रियेत पुन्हा एकदा विलंब झाला असून, राज्यातील निवडणुकांवर अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान ठामपणे सांगितले की, अनेक नगरपरिषदांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे आणि निवडणूक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर वैदिक मंत्रांच्या गजरात आणि “जय श्री राम” च्या जयघोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधानांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ध्वजारोहण समारंभात उपस्थित होते. यावेळी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी, “आज संपूर्ण जग राममय झाले आहे.” असे म्हटले. ध्वजारोहणानंतर अयोध्येत पंतप्रधान यांनी, “शतकांच्या वेदना आज अखेर संपत आहेत, शतकानुशतके झालेल्या जखमा बऱ्या होत आहेत. शतकानुशतके केलेला संकल्प पूर्ण होत आहेत. आज एका अशा यज्ञाचा अंतिम अर्पण आहे ज्याची आग ५०० वर्षे जळत होती. एक असा यज्ञ जो कधीही श्रद्धेत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अगदी जवळ आल्या असून सर्वच पक्षांनी प्रचारयंत्रणेला वेग दिला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण ठळकपणे समोर येऊ लागले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना भाजपकडून दिलेला धक्का राजकीय चर्चेत भर टाकणारा ठरला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे गटातील मोठी घडामोड समोर आली आहे.ठाकरेसेनेच्या 16 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी थेट निवडणुकीतून माघार घेतली असून स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या उमेदवारांनी “पक्षाकडून सहकार्य मिळत नाही” असा आरोप करत निषेध म्हणून स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना तटस्थ राहणार असल्याचे जाहीर…
जळगाव : प्रतिनिधी पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता पंधरा हजारांची लाच स्विकारतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे आरखेक वासूदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन मोहीत नगर, जळगाव रोड भुसावळ) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास केली. या कारवाईमुळे खळबळ माजून गेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे याकरीता तक्रारदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अर्ज दाखल केला होता. नाहरकत लवकरात लवकर मिळावी या करीता तक्रारदार व त्यांच्या मित्राने कार्यालयात वारंवार फेऱ्या मारीत होते. यावेळी कार्यालयातील आरेखक वासूदेव धोंडू पाथरवट यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता…
जळगाव : प्रतिनिधी भाऊ कामावर व आई बाहेर गेलेली असताना पल्लवी सुभाष सपकाळे (वय ३२, रा. खोटेनगर) या उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी सपकाळे ही तरुणी आई व भावासह खोटेनगर परिसरात राहत होती. तिचा भाऊ रेल्वेमध्ये नोकरीला असून, तो कामावर व आई बाहेर गेलेली असताना तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. आई घरी आली त्यावेळी तिला मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
चोपडा : प्रतिनिधी चोपडा ते शिरपूर जुन्या रस्त्यावर दुचाकी आणि बसच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ५:४५ वाजता घडली. यात, अन्य एक विद्यार्थी जखमी झाला आहे. जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. अकुलखेडा (ता. चोपडा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जय प्रदीप महाजन आणि त्याचा मित्र नील हर्षल पाटील हे चोपडा येथे शिकवणीसाठी येत असताना ही घटना घडली. जय आणि नील हे दुचाकीने (क्रमांक एमएच १९ बीएल ०६०७) चोपड्याकडे येत होते. त्याचवेळी चोपड्याकडून गणपरला जाणारी बस क्रमांक एमएच २० बीएल २०८३) आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातात जय…
आजचे राशिभविष्य दि.२५ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल, दिवस आनंदात जाईल. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळू शकेल. तुम्ही एखाद्या कौटुंबिक शुभ प्रसंगी पैसे खर्च कराल. जमिनीशी संबंधित प्रकल्प तुम्हाला नफा मिळवून देतील अशी शक्यता आहे. वृषभ राशी तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामानिमित्ताने संबंधित प्रवास करण्याची शक्यता आहे. या प्रवासातून चांगला नफा मिळेल. आज तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. मिथुन राशी व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही फक्त तुमच्या प्रियजनांचा आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्याल. आज कोणत्याही आर्थिक व्यवहारात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले असून चोरीस गेलेल्या सोन्याचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्या नगरतील एक महिला दुचाकीने घरी पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 849/2025 भा.दं.वि. 2023 चे कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने…
जळगाव : लाइव महाराष्ट्र न्यूज पारोळा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात करण बाळासाहेब पवार यांनी केलेली कामे आजही जनतेच्या मनात घर करून राहिलेले आहे. मात्र प्रशासकाच्या काळात पारोळा शहराची पूर्णपणे वाट लागली व शिवसेना शिंदेने जे आहे ते सुद्धा सांभाळले नाही म्हणून निष्क्रिय ठरताना दिसत आहे करण पवार यांची लोकप्रियता वाढल्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली करण पवार यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. पदानी कितीही मोठा झाला माणूस पण शेवटी निष्क्रिय जर राहिला तर तो यशस्वी होऊ शकत नाही याची प्रचिती पारोळेकरांना सध्या होताना दिसत आहे. पैशाने मोठा होता येते परंतु कामाची झलक ही रक्तात असावी लागते.…

