पुणे : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या ‘कृषी समृद्धी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, योजनेअंतर्गत राज्यातील 2,778 शेतकरी सुविधा केंद्रे गाव पातळीवर स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे. या संदर्भात जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करून त्यांच्या बैठका तातडीने आयोजित करण्याच्या सूचना कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक सुनील बोरकर यांनी दिल्या आहेत. बोरकर यांनी स्पष्ट केले की, निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) यांना कामासाठी पूर्वसंमती देण्यात यावी. योजनेचा उद्देश शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटांच्या सहभागातून शेतीसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत महत्त्वपूर्ण विधान केले. अंबाजोगाई येथील सभेत जीभ घसरून वापरलेल्या ‘भिकारपणा’ या शब्दामुळे निर्माण झालेल्या वादावर त्यांनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सभेत बोलताना पवार म्हणाले, “एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने भावना दुखावल्या असतील तर माफी मागणे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी स्पष्ट केले की अंबाजोगाईतील अस्वच्छतेवर टीका करताना चुकीचा शब्द वापरला गेला. “तो शब्द माझ्याकडून निघायला नको होता. ती माझी चूक होती,” असे म्हणत त्यांनी जाहीर माफी मागितली. त्यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या अलीकडील वक्तव्यावर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. जितेंद्र सिंग यांनी मुंबईतील आयआयटी कार्यक्रमात “IIT Bombay चं नाव बदलून IIT Mumbai न केल्यानं चांगलं झालं” असं विधान केलं होतं. या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी फेसबुकवरून थेट प्रहार केला. राज ठाकरे म्हणतात, “हे विधान एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे.” त्यांच्या मते, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न दशकांपूर्वीही झाला होता;…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक भाविक चारधाम यात्रा करत असतात, आता उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षाची चारधाम यात्राही पूर्ण झाली आहे. या वर्षी 50 लाखांहून अधिक भाविक चारधाम यात्रेला आले. ही यात्रा अक्षय तृतीयेच्या दिवशी, म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडल्याने सुरू झाली होती. संपूर्ण 6 महिने उत्तराखंडच्या दऱ्या ‘जय बद्री-विशाल’ आणि ‘हर-हर महादेव’ च्या गजराने भरलेल्या होत्या. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. जिथे 2024 मध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये दर्शन घेणाऱ्यांनी विक्रम केले होते, तिथे 2025 ने हा विक्रमही मोडला. राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राच्या माहितीनुसार,…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात वाहन चालक किरण भास्कर नांदरे (४३, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ एमएच १९ सीएक्स ६६३४ क्रमांकाचे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ कालसिंग बारेला, प्रवीण जगदाळे व विनोद सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला…
जळगाव : प्रतिनिधी पती कामावर तर पत्नी मंदिरात गेलेली असताना अवघ्या अर्धा तास बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी ६७ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी तिवारी नगरमध्ये घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, खासगी नोकरीला असलेले विलास दत्तात्रय सैतवाल (५६, रा. तिवारी नगर) हे २४ रोजी सकाळी कामावर निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी नीलिमा या सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून मंदिरात गेल्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ६० हजार रुपये किमतीची सोनपोत, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, दोन हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर–जामनेर मार्गावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मंगळवारी रात्री सुमारे दहा ते साडेदहाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी व अवजड वाहनातील धडकेत जामनेरातील तीन आणि पहूरमधील एक तरुण जागीच ठार झाले. तर अवजड वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय, तिघे रा. जामनेर आणि रवींद्र सुनील लोंढे (रा. पहूर) यांचा समावेश आहे. सर्व मृतांचे वय २२ ते २४ दरम्यान आहे. अपघातग्रस्त वाहनात जनावरांची हाडे आढळून आली असून ही हाडे कोठून कोठे नेली जात होती, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती. तसेच जखमी चालकाचे नावही समजू…
आजचे राशिभविष्य दि. २६ नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आई घरात गोड पदार्थ बनवू शकते. घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी आज नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसाय वाढवण्यासाठी आखलेल्या योजनांचा फायदा होईल. मित्रांशी बोलण्यात तुमचा चांगला वेळ जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये साथ देतील. बँक कर्मचारी त्यांचे काम लवकर पूर्ण करतील. प्रेम संबंधांमध्ये असलेले लोक एकत्र चांगला वेळ घालवतील. कर्क राशी कर्क राशीच्या…
मुंबई : वृत्तसंस्था परळीतील प्रचारसभेत केलेल्या एका विधानामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे हे नव्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सभेत आठवण काढल्याचे त्यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. “आज एक व्यक्ती सोबत नाही, याची जाणीव होते,” असे त्यांनी म्हटल्याने त्यांच्या बोलण्याचा संदर्भ आणि उद्देश यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. प्रकरणातील आरोपीचा सार्वजनिक सभेत उल्लेख योग्य होता का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला असून या वक्तव्याने प्रचारसभेपेक्षा वादाला अधिक उधाण आले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर अत्यंत कठोर टीका केली. “असा माणूस जर कुणाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मोठे विधान केले आहे. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, आज झालेल्या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा…

