मुंबई : वृत्तसंस्था राज्यभर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची धामधूम वाढत असताना राजकीय पटलावर मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथील निवासस्थानी आज सकाळी सुमारे ११.३० वाजता अनपेक्षित भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे कोणतीही टीम किंवा पक्षातील प्रमुख नेते न घेता एकटेच पोहोचले. त्यामुळे या भेटीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. राजकीय वर्तुळात मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, राज्यातील बदलते राजकीय वातावरण आणि संभाव्य राजकीय युती यांना केंद्रस्थानी ठेवून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात पुन्हा नवे समीकरण…
Author: editor desk
बीड : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घटना घडत असताना आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिराच्या सुमारास मांदगावजवळ नगर-सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या मुखवटा बांधलेल्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून जोरदार हल्ला केला. दगडफेक, गाडीची तोडफोड आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत हल्लेखोरांनी राम खाडे यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यासोबत असलेले सहकारीही मारहाणीमुळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर या घटनेत राजकीय कटकारस्थान असल्याची शंका अधिक तीव्र…
नांदेड : प्रतिनिधी वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील सभेत भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत निशाणा साधला. चव्हाण यांच्या कुटुंबाकडे असलेल्या विविध एजन्सी आणि आर्थिक सामर्थ्याचा संदर्भ देत शिरसाट यांनी विचारले “अशोकराव भाकरी खातात का नोटा?” नांदेड जिल्ह्यातील १३ नगर परिषदांच्या निवडणुकीचे रणांगण तापले असून, भोकर आणि मुदखेड या दोन नगरपालिकांत खा. चव्हाण यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात खा. अशोक चव्हाण आणि खासदार चिखलीकर यांच्यातील वाकयुद्धाला आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या हल्ल्यांनी अधिक धार आली आहे. भोकर नगर परिषदेसाठी शिवसेनेने सुभाष…
एरंडोल : प्रतिनिधी आडगावकडून भरधाव येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत येथील कापसासह फळांचा व्यापार करणाऱ्या प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की , आडगाव येथील तरुण दुचाकी (एमएच- १५, केइ २९४९) ने भरधाव वेगाने आडगावकडून येत असताना त्याच्या दुचाकीने येथील अशोक भिका भोई (वय ५५) यांना जबर धडक दिली. एरंडोल ते कासोदा रस्त्यावर साई हॉस्पिटल समोर ही घटना घडली. या घटनेनंतर अशोक भोई यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथे दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. याबाबत उशिरापर्यंत कासोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. मयत अशोक भोई हे कापसासह फळांचा व्यापार करत होते. त्यांच्या पश्चात…
जळगाव : प्रतिनिधी एकाच रात्री सहा दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर तेथून सहा लाखांची रोकड चोरुन नेली होती. ही धाडसी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी वेशांतर केले आणि ते रिक्षाने बस स्थानकावर गेले. तेथून बसने शिरपूर पर्यंत आणि त्यानंतर खासगी वाहनाने ते मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावात गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यानुसार पोलिसांकडून या चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे. सविस्तर वृत्त असे की , शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजारा शेजारी असलेल्या मार्केटमधील सहा दुकानांमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास दुकानांचे शटर उचकवून चोरट्यांनी सहा लाख रुपयांची रोकड व चांदीचे शिक्के चोरून नेले होते. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या १५ ते २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शंकर राठीया मेहता (१७, रा. शिरवेल, अंबागाव, मध्यप्रदेश, ह.मु. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (२६ नोव्हेंबर) विटनेर शिवारातील जंगलात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिरवेल अंबागाव येथील शंकर मेहता हा आई, वडील व भावांसह वर्षभरापूर्वी मजुरीसाठी जळगावात आला होता. विटनेर शिवारातील एका शेतात ते शेतमजुरी करीत होते. शंकर अनेक वेळा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून जात होता. मात्र पाच-सहा दिवसानंतर तो पुन्हा घरी परतत होता. आता १५ ते…
आजचे राशिभविष्य दि.२७ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस काही नवी गोष्टशिकण्याचा असेल. तुम्ही जुन्या मित्राला मदत कराल. दैवी पाठिंब्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात भरभराट कराल. तुमच्या विरोधकांपासून खूप सावध रहा. तुमचा स्टील व्यवसाय यशस्वी होईल आणि जास्त नफा मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नवीन बदल आणेल. आज तणाव जास्त असेल. प्रलंबित काम पुन्हा सुरू होईल. तुमच्या मैत्रीपूर्ण स्वभावाचा फायदा तुमच्या सहकाऱ्यांना होईल. वाईट संगत टाळा, कारण आज नुकसान होऊ शकते. मिथुन राशी आज नव्या ठिकाणी जाता येईल, प्रवासाचा योग असेल. तुमचे तणाव कमी होतील. तुम्ही परिश्रमपूर्वक काम कराल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक संबंध अधिक सुसंवादी होतील…
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून तब्बल ८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडे आहे. सविस्तर वृत्त असे की , १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विलास मधुकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ८४१/२०२५, भा.न.सं. कलम ३०९(४) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हा उलगडण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली…
पुणे : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापत असताना महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार टीका केली. “लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला मतदान करतील, हा भ्रम चुकीचा आहे. जनतेत जाऊन मतांचा जोगवा मागावाच लागतो,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांना सज्जड सुनावले. फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेते प्रचारात का नाहीत, याची मला कल्पना नाही. निवडणुकांत लोकांमध्ये जाणे हेच लोकशाहीचे खरे स्वरूप आहे. ज्याला मतदारांमध्ये जायचे आहे तो जातो, ज्याला वाटत नाही तो जात नाही. मला त्याबाबत काही म्हणायचे नाही.” त्यांच्या वक्तव्यामुळे मविआच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळाचे मत…
नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिजोरीच्या चाव्यावरून राजकारण तापले असताना आता यासंदर्भात सुरुवातीला एका जाहीर सभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होती. अशातच आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेतून अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमधील सभेत संबोधित करताना शिवसेनेचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. अजित पवारांनी मला विचारले विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूरला जाऊ का? मी सांगितले जा आणि पाणीपुरवठा योजनेचे घोषणा…

