हिंगणघाट : वृत्तसंस्था राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट येथील सभेत ‘लाडकी बहिण’ योजनेवर महत्त्वपूर्ण विधान केले. “जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन देत त्यांनी या योजनेबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवरही पडदा टाकला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “काही जणांनी अफवा पसरवल्या की योजना बंद होणार. पण ही योजना बंद होणे तर दूरच, आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीला ‘लखपती दीदी’ बनवणार आहोत.” त्यांच्या या वक्तव्याने सभेला उपस्थित महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मुळजी जेठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अक्कलकुवा परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुभराम कैलास बारेला (वय २०, रा. सावखेडा, ता. यावल) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभराम बारेला हा आपल्या आई-वडिलांसोबत सावखेडा सीम येथे राहत होता आणि जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. ७ नोव्हेंबर रोजी तो गावातील मित्र संदीप बारेला व मनिष बारेला यांच्यासह दुचाकीने नंदुरबार जिल्ह्यातील देव मोगराई देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाला होता. अक्कलकुवा जवळून जात असताना पुढे असलेल्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा चौक परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डंपरवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात आणत दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामासह त्यांची चार वर्षीय भाची गंभीररित्या जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पवन शांताराम सुर्यवंशी (वय ३३, रा. गजानन पार्क, कुसुंबा) हे त्यांची भाची वैष्णवी वानखेडे (वय ४) हिला दुचाकीवर बसवून कुसुंबा येथुन शहरात येत होते. अजिंठा चौकातून दुचाकी जात असताना डंपर (एमएच १९ सीवाय ९३२५) वरील चालकाने भरधाव वेगात ताब्यातील वाहन आणत दुचाकीच्या उजव्या बाजुला जोराने धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी यांच्या दोन्ही पायांना तसेच कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यांची भाची वैष्णवी हिच्या दोन्ही पायांना दुखापत…
अमळनेर : प्रतिनिधी शेडनेट मंजुरीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या नावावर सात लाखांचे कर्ज घेऊन त्याची आर्थिक फसवणूक करण्यात आली. २०२० मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पंडित शेलार व त्याचा सहकारी उद्धव कुवर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पारोळा तालुक्यातील नेरपाट येथील शेतकरी मधुकर गरबड पाटील यांची अमळनेर तालुक्यातील सडावण येथे शेती आहे. वर्ष २०२० मध्ये त्यांनी पोखरा योजनेत अमळनेर तालुका कृषी विभागात अर्ज केला होता. त्याचवेळी त्यांना एजंट समाधान शेलार हा भेटला आणि त्याने शेडनेट आणि त्यासोबत कर्जही मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर ते युनियन बँकेत गेले, जिथे काही कागदपत्रांवर मधुकर…
आजचे राशिभविष्य दि. २९ नोव्हेंबर २०२५ मेष राशी नोकरी करणाऱ्यांना त्यांना नेमून दिलेली कामे आजच पूर्ण करावी लागतील, नाहीतर अडचण वाढेल. आज वरिष्ठांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. व्यवसाय वाढविण्यासाठी व्यावसायिक नवीन योजना राबवतील. आर्थिक फायदा होईल. वृषभ राशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी पैसे कसे वाचवायचे ते शिकाल. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील सोपवल्या जातील. मिथुन राशी आज, मित्रांच्या मदतीने, तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल आणि तुम्ही आयुष्य पूर्णतः जगाल. विद्यार्थ्यांना आज मोठं यश मिळेल. कर्क राशी हवामानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यात…
मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या धमकीवजा वक्तव्याने नवे वादळ उठवले आहे. “मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापून काढू,” असे शब्द देशमुख यांनी सार्वजनिक व्यासपीठावर उच्चारले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत देशमुखांच्या भाषेचा तीव्र निषेध केला. “ही भाषा नक्षलवाद्यांची नव्हे, तर सत्ताधारी भाजप आमदारांची आहे. विरोधकांना कापून टाकण्याची मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी टीका त्यांनी केली. रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट सवाल उपस्थित केला.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दीड महिन्यापासून माध्यमांपासून दूर असलेले प्रकृतीच्या कारणांमुळे शिवसेनेचे खासदार आणि पक्षाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत पुढील आठवड्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत. येत्या सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढारी न्यूजचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी दिली. संजय राऊत हे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे महत्त्वाचे चेहरे असून, २०१९ मधील महाविकास आघाडी सरकारपासून त्यांनी दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून ते आरोग्य कारणास्तव या दिनचर्येपासून दूर होते. त्यांच्या उपचारांचा कालावधी आता संपत आल्याची माहिती मिळत आहे. राऊत यांनी या काळात माध्यमांशी प्रत्यक्ष संवाद साधला नसला तरी ‘सामना’च्या माध्यमातून ते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ५० टक्के आरक्षणाच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या ४० नगरपरिषदा आणि १७ नगर पंचायतींचा अशा एकूण ५७ संस्था अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल, अशी माहिती कोर्टाने दिली आहे. या निवडणुकांबाबतचे प्रकरण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रथम तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्याचे…
सोलापूर : वृत्तसंस्था कुर्डूवाडी येथील नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष एकत्र लढत असून, या एकीमुळे भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची सुरूवात होऊ शकते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी केले. गांधी चौकातील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व दोन्ही पक्षांचे उमेदवार उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नंतर जिल्ह्यात मोठे नेतृत्व निर्माण झालेले नाही. काही जण जिल्ह्यातील नेतृत्वालाही घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. कुर्डूवाडीच्या विकासाच्या प्रश्नांना आपण नेहमीच प्राधान्य दिले असून, शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे…
जळगाव : प्रतिनिधी हॉटेल विक्रीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा गंभीर परिणाम म्हणून के पी. प्राईड हॉटेलचे मालक खुबचंद प्रेमचंद साहित्या (६०, रा. मोहाडी रोड) यांना चार अनोळखी इसमांनी रुममध्ये घुसून बेदम मारहाण केली. बेल्टने तसेच लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाकिटातील २० ते २५ हजारांची रोकड जबरीने काढून आरोपी पसार झाले. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलच्या रुम क्रमांक २०७ मध्ये घडली. शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुबचंद साहित्या यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलगा नितीन साहित्या यांनी काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांनी…

