Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना एक मोठी बातमी समोर आली. राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अशातच आता मंगळवेढा नगरपरिषद, धाराशिव नगरपालिका आणि यवतमाळ नगपरिषद याबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवेढा नगरपरिषद : मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नगरपरिषदेची निवडणूक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांमुळे अडकलेली होती. अखेर यावर निर्णय झाला असून आता 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या असून, राज्य निवडणूक आयोगाने…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजच्या काळात अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण अनेकदा पैशांची कमतरतेमुळे अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. यापैकीच एक आहे उद्योगिनी योजना. ही काही नवीन योजना नाही, तर केंद्र आणि अनेक राज्य सरकारे बऱ्याच काळापासून ही योजना चालवत आहेत. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना कोणत्याही गॅरंटीशिवाय सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. उद्योगिनी योजना काय आहे? उद्योगिनी योजनेची सुरुवात सर्वात आधी कर्नाटक सरकारने केली होती, पण आज ती अनेक राज्यांच्या आणि केंद्राच्या मदतीने देशभरातील महिलांना लाभ देत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १ लाख ते…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी कन्नडहून मित्राला भेटण्यासाठी चाळीसगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार व त्याचा साथीदार अशा दोघांना रिक्षातून आलेल्या तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून खिशातील रोकडसह मोबाईल असा १६ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून पळ काढल्याची घटना २८ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास धुळे ते सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटाखालील अभिनंदन हॉटेलसमोर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील हतनूर येथील मंगेश बंडू आल्हाट हा २८ रोजी रात्री निवृत्ती भडंग व विशाल केवट या दोन्ही मित्रांसोबत दुचाकीने चाळीसगाव येथील मित्राला भेटण्यासाठी कन्नड येथून येत होता. दरम्यान, कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतरून चाळीसगावकडे जात असताना महामार्गाला लागून असलेल्या हॉटेल अभिनंदनसमोरून जात असताना लघुशंकेसाठी त्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील तीन सुवर्ण पेढ्यांमधून चार लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) हिला शनिपेठ पोलिसांनी बरेली येथून अटक केली. इंटरनेटवर विविध व्हिडीओ बघून चोरीची पद्धत तिने पाहिली. तसेच चोरीसाठी ती गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जावून तेथे अंगठी बघताना हातचालाखी करीत आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून चार लाख ७० हजार रुपयांच्या अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी जिल्हापेठ व शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी करताना एक महिला सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांकडून…

Read More

आजचे राशिभविष्य दि.३० नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साही असणार आहे. वकील जुन्या क्लायंटद्वारे नवीन क्लायंटशी संपर्क साधतील. मेकॅनिकल इंजिनिअर्सना आजचा दिवस खूप चांगला जाईल. वृषभ राशी हवामानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक महागडी भेट द्याल. ऑफिसमधील कामावर लक्ष केंद्रित करा, नाहीतर संधीसाधू लोकं गैरफायदा घेतील. मिथुन राशी मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. तुम्हाला तंदुरुस्त वाटेल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल आणि तुमच्या कुटुंबात आनंद येईल. कर्क राशी ऑफिसमध्ये तुमचे बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन योजना यशस्वी होतील. विद्यार्थी अभ्यासातल्या जुन्या चुका सुधारतील. आज तुम्हाला…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक परंपरेवर भाष्य करताना सांगितले की, “भांडणात पडणे हा भारताचा स्वभाव नाही. आपल्या परंपरेने नेहमीच बंधुत्व, सद्भाव आणि सामूहिक सलोखा यावर भर दिला आहे.” ते नागपूरमधील नॅशनल बुक फेस्टिव्हलमध्ये बोलत होते. भागवत म्हणाले की, भारताची राष्ट्रवादाबद्दलची कल्पना पाश्चात्त्य व्याख्येपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. “आमचा कोणाशीही वाद नाही. आम्ही संघर्ष टाळतो. जगातील अनेक भाग संघर्षातून घडले, पण भारताचा आत्मा सह-अस्तित्वातून घडला,” असे त्यांनी सांगितले. भागवत यांनी सांगितले की पाश्चात्त्य देशांना भारताच्या राष्ट्रत्वाची संकल्पना समजत नसल्याने त्यांनी याला ‘नेशनलिझम’ म्हणायला सुरुवात केली. “भारत हे प्राचीन काळापासून एक राष्ट्र…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था  तेलंगणा राज्यातून लग्न सोहळ्यासाठी जळगावकडे निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याचा अखेरचा मोबाईल लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर गावाजवळ आढळल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त करत कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गावात भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत आहेत. पद्मसिंह पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कारने पाचोरा (जळगाव) येथे लग्न सोहळ्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी निघाले होते.  मात्र, ते ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाहीत आणि घरीही परतले नाहीत. अनेक तास…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित 1800 वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. साधूग्राम उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या या वृक्षतोडीतून ‘साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी घालण्याचा सरकारचा संधिसाधूपणा’ असल्याचा आरोप त्यांनी केला. 2027 च्या कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून तपोवनातील झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचे आश्वासन दिले असले तरी विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. या वादात आता राज ठाकरेही उतरले आहेत. त्यांनी शनिवारी एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. राज ठाकरे म्हणाले, “नाशिकमध्ये कुंभमेळा हे काही पहिल्यांदाच होत नाही. मनसेच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या खटल्यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक केली नाही, तोपर्यंत चार्जफ्रेमही होणार नाही, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. जरांगे म्हणाले की, “संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपीची आठवण धनंजय मुंडेंना भर सभेत कशी येते? याचा अर्थ आरोपी आणि मुंडे एकच आहेत. फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना सहआरोपी केले पाहिजे. मुंडेंना अटक केली तरच देशमुख यांना न्याय मिळेल; अन्यथा फडणवीस आरोपींना…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात तपोवनातील वृक्षतोडीवरून मोठा वाद चिघळला आहे. साधूग्राम प्रकल्पासाठी तब्बल 1800 झाडे तोडण्याची तयारी महापालिकेने सुरू केल्याची माहिती समोर आल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शुक्रवारी (दि. 28) महत्वाचे स्पष्टीकरण देताना, “तपोवनातील एकही झाड तोडले जाणार नाही. फक्त गेल्या 5 ते 7 वर्षांत वाढलेली झुडपे हटवली जाणार आहेत. काही जण मुद्दाम दिशाभूल करत आहेत,” असे सांगितले. दरम्यान, प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनाला भेट देत वृक्षतोड रोखण्यासाठी जोरदार भूमिका मांडली. ते म्हणाले,“तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये. झाडं गेली…

Read More