चोपडा : प्रतिनिधी चोपडा शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १७ रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करतांना चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याजवळून ६ गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन व फोर्ड कंपनीचे चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १७ रोजी रात्री ९.३० वा. सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ 1) गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे (वय 25 रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा ), मोहसीन हनिफ मुजावर (वय 30 रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा ) रिजवान…
Author: editor desk
हरिहरेश्वर : वृत्तसंस्था देशात १५ ऑगस्टच्या दिवशी दिल्ली उडवायची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आज रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. पण ही बोट नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. यांपैकी एका बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पण हे लोक नेमके कोण आहेत हे समजू शकलेलं नाही. खासदार सुनील तटकरे म्हणाले, हरिहरेश्वरच्या परिसरात घातक शस्त्रे असल्याची बोट सापडली आहे. काही…
जळगाव : प्रतिनिधी येथील अवघ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंबरी गावच्या तरुणाशी बळजबरीने लावून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या मुलीने अतिशय धाडसाने या लग्नाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून पळ काढला आणि थेट अंबड पोलीस ठाणं गाठलं. यानंतर तिने आपली आपबिती पोलिसांना सांगितली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मृत्यूपूर्वी तिचा विवाह बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावच्या एका तरुणाशी ठरवला होता. वडील गेल्यानंतर मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई आणि मामा यांनी त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आला. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी ‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’ असं म्हणत त्यांना चांगलेच सुनावले. शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. “गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना…
मुंबई : वृत्तसंस्था पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्य सरकारमधील मंत्री आमने-सामने आले. यावेळी अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना तानाजी सावंत यांनी वापरलेल्या ‘फेमस’ या शब्दामुळेही सभागृहात चांगलाच गदारोळ उडाला. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. मात्र यानंतर अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या…
धरणगाव : प्रतिनिधी येथील सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय खत्री समाजातर्फे धानपंचमी उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात अालेल्या मिरणुकीत महिलांसह तरुणींची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती. यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री मच्छोदरी मंदिरात महाआरती करुन त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. अॅड. गिरीश छोटूलाल कट्यारे यांनी महाप्रसादाचे अायाेजन केले हाेते. सायंकाळी ५ वाजता लेझीम पथक, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात अाली. सुवासींनीनी डोक्यावर धानाच्या टोपल्या ठेवून त्यानंतर विधिवत विसर्जन केले. या वेळी भावी काळात भरपूर धान्य मिळू दे, सर्वांना सुखाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. या मिरवणुकीत अबाल वृद्ध, तरुण, तरुणींनी सहभाग…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली असून, गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचं हे चिन्ह असल्याचे म्हटलं आहे. क्लाईड क्रास्टो यांचं ट्वीट – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट केलं असून, नितीन गडकरी यांचा भाजपाच्या संसदीय मंडळात समावेश न होणं एक चतुर राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा खूप वाढला असल्याचं दर्शवत असल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? यावेळी त्यांनी…
धरणगाव (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १७ रोजी धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 75 फुटी तिरंगा ध्वजा जवळ सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आयोजन करण्यात आलेले होते. शासन निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषद मार्फत करण्यात आलेले होते.त्यानुसार शहरातील सर्व शाळा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या. १०.५८ मिनिटांनी नगरपरिषदेने सायरन वाजवून ठीक ११.०० वाजता सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी धरणगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार,सर्व शासकीय विभागांचे अधिकारी शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विध्यार्थी – विद्यार्थिनी, पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी – व्यावसायिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या…
जळगांव (जिमाका वृत्तसेवा) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत आज सकाळी ११ वाजता ‘समूह राष्ट्रगीत गायन’ जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे तसेच तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे, महेंद्र माळी, प्रशांत कुलकर्णी तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
जळगाव : प्रतिनिधी यंदाही युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे शुक्रवार दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सायं 6 वाजेपासून तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. सदर आयोजनाचे हे 14 वे वर्ष असून यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजनाची तयारी सुरू आहे. डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठान चे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांब चे थरारक प्रात्यक्षीक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक रित्या युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे एकमेव तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. दहीहंडी सारख्या उत्सवात महिलांना मुख्य प्रवाहात आणून उत्सवाचा आनंद…

