जळगाव : प्रतिनिधी शहरातील महाबळ परिसरानजीक असलेल्या संभाजी नगरातील रहिवासी ५४ वर्षीय महिलेचा बंद घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, संभाजी नगरातील रहिवासी लिलाबाई यादव इंगळे (वय-५४) या भुसावळ येथे नोकरीला होत्या. अविवाहित असल्याने त्या संभाजी नगरात घरी एकट्याच राहत होत्या. मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरात लिलाबाई इंगळे याचा मृतदेह मयतस्थितीत आढळून आला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांना दुर्गंधी आल्याचे हा प्रकार उघडकीला आला. याबाबत रामानंदनगर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान, दोन ते…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा समाजाचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यापाल कोट्यातून विधानपरिषदेवर घ्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर नुकताच भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचं निधन झालं. तीन दिवसांपूर्वी रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षासाठी मोठा लढा उभा केला होता. मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला विधानपरिषदेवर संधी मिळावी, असं अंकुश…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करत परिवारातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना दि. १५ रोजी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहित आपल्या राहत्या घरात दि. १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे काम करत होती. यावेळी रवींद्र रणजित चव्हाण याने दारूच्या नशेत पिडीत विवाहितेच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर पिडीतेने तु घरात कशासाठी आला?, असे विचारताच रवींद्र चव्हाण याने पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच चापटाबुक्यांनी मारहाण…
मुबई : वृत्तसंस्था एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 21 ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता यावर सरकारने तोडगा काढला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून तीन दिवस आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड गावात जुन्या भांडणातून दोट गटात तुफान हाणामारी झाली. या दोन्ही गटांकडून एकमेकांवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही गटांतील तब्बल १९ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वराड गावातील तुषार भगवान पाटील व सोमनाथ भरत पाटील यांच्या गटात अनेक दिवसांपासून वाद आहेत. याच वादाची ठीणगी १३ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पडली. किरकोळ कारणावरुन दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले. यावेळी तुषार पाटील यांच्यावर टीकाराम पाटील, मुयर पाटील, राजु पाटील, सोमनाथ पाटील, सागर पाटील, प्रशांत पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, सागर अशोक पाटील, नागराज पाटील, देविदास पाटील व मोरेश्वर पाटील यांनी हल्ला चढवला. प्रत्युत्तरात सोमनाथ पाटील…
धरणगाव : प्रतिनिधी येथील मरिमाता मंदिर यात्रेमध्ये एका महिलेची सोन्याची पोत अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरात दि १६ रोजी मरीमाता मंदिर येथे यात्रोस्तवाचा कार्यक्रम असल्याने रोजी दिवसभर शहरात यात्रेनिमित्त भाविक भक्तांनी गर्दी केलेली होती. त्याचवेळेस धरणगावातील मातोश्री नगरातील रहिवासी निवृत्त शिक्षिका रजनी हरिशचंद्र सूर्यवंशी(वय ६४) हे सुद्धा यात्रेत सहभागी झाले होते. यावेळेस कुणी तरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपये किमतीची २५ ग्राम सोन्याची मोहळ माळ लांबवली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात रजनी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
मुंबईः वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कॅबिनेटमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. 50 खोके, एकदम ओक्के सरकारचा धिक्कार असो. गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची तसेच भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. विधान भवनात पोहोचलेल्या गिरीश महाजनांनी यावर प्रतिक्रिया दिली. आंदोलन आणि घोषणाबाजी करणारे सगळे सध्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारे घोषणाबाजी करत असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय गिरीश महाजन काय म्हणाले?…
गोंदिया : वृत्तसंस्था गोंदिया येथे मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेन यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. ही ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूरहून राजस्थानमधील जोधपूरला जात होती. गाढ झोपेत होते प्रवासी अपघात झाला तेव्हा ट्रेनमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. धडक होताच एकच खळबळ उडाली आणि प्रवासी ट्रेनमधून उतरले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, भगत की कोठी स्थानकावरून सिग्नल न मिळाल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. तीन तासांनंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू अपघातानंतर पहाटे 4.30 वाजता…
बीड : वृत्तसंस्था शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचं १४ रोजी पहाटे अपघाती निधन झालं. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर खुद्द विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमधून तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणानंतर ज्योती मेटे यांनी स्वतः…
जळगाव : प्रतिनिधी युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा काही दिवसाआधी जळगाव जिल्हा दौरा तब्येत खराब झाल्याने स्थगित करण्यात आला होता. पण आता पुन्हा २० ऑगस्ट रोजी जिल्हात येणार असून त्यांच्या दौर्याचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आला आहे. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्यावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आदल्या दिवशी अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता. यानंतर आता त्यांचा दौरा नव्याने जाहीर झाला असून ते शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. अधिकृत दौर्यानुसार आदित्य ठाकरे यांचे सकाळी १०.४० वाजता विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर…

