नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग सुनावणी घेण्याची भीती उद्धव ठाकरेंना असल्यानं त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सुनावणीवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या या भीतीवर सुप्रीम कोर्ट निरिक्षण नोंदवणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे गटासाठी हा दिलासा मानला जात आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाच्या भीतीवर निरिक्षण नोंदवणार असलं तरी यापूर्वीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगानं यासंदर्भत कोणताही निर्णय घेऊ नये, असं म्हटलं होतं. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून असा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही, असं ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. त्यामुळं शिवसेनेला वाटत असलेली भीती ही अनाठायी असल्याचं त्यांचं मत आहे.…
Author: editor desk
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी जनसंवाद यात्रेच्या रूपाने फार मोठे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा फायदा आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भर पावसात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जमलेली मोठी गर्दी हाच माझ्यासाठी फार मोठा सत्कार आणि सन्मान आहे, असे प्रतिपादन करुन आ. अनिल पाटील यांनी केले. ज्यांच्या शब्दाने निवडून आले अशा पवार साहेबांना जो झाला नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जो झाला नाही तो सामान्य कार्यकर्त्यांना काय होणार?असे सांगून, “पलटी मारणारा माणूस” आ.चंद्रकांत पाटील असल्याची टीका देखील यावेळी आमदार पाटील यांनी केली. स्वातंत्र्यदिन १५…
श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. या बसमध्ये 39 जवान होते. दुर्घटनेत अनेक जवानांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, 39 कर्मचारी (ITBP मधील 37 आणि JKP मधील 2) घेऊन जाणारी सिव्हिल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात कोसळली. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हे जवान चंदनवारीहून पहलगामकडे निघाले होते. प्रकरणात घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. आयटीबीपीच्या वाहनाच्या अपघातात सहा जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचे बचाव पथकाच्या पथकांनी सांगितले आहे. मृत…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील झूरखडे येथे अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करत तब्बल 2 लाख 16 हजारांचा अवस्था लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, नारायण चौधरी (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने झुरखेडा गावातील बंद घराच्या दरवाजाचा कोंडा तोंडुन घरात प्रवेश केला.त्यानंतर घरातील २ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने व रोख रुपये लंपास केला आहे. तसेच गावशेजारील निमखेडा बस स्टॅड जवळील भगवान ज्ञानेश्वर पाटील यांचे मनिष…
वरणगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या केंद्रशासित युद्ध साहित्य व सामुग्री निर्माण करणाऱ्या कारखान्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारी झाली. मात्र एकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्यात व हातावर टेबलावरील पेपरवेटने जीवघेणा हल्ला केल्याने जखमी अधिकाऱ्याने वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, संशयितास पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, वरणगाव आयुध निर्माणीत येथील केंद्र सरकारच्या युद्ध साहित्य व सामग्री निर्माण कारखान्यात रविवारी (ता. १४) सकाळी अकरादरम्यान फिर्यादी आयुध निर्माणी वरणगावचे जॉइंट जीएम शैलेश रामचंद्र पाटील (वय ५१, रा. रेणुकानगर, वरणगाव) हे आयुध निर्माणीत कर्तव्यावर असताना संशयित अमृत पाल (एजीएम, आयुध निर्माणी वरणगाव) (रा. रेल्वे ऑफिसर कॉलनी, भुसावळ) हे…
अमळनेर : प्रतिनिधी चोपडाहुन नाशिककडे जाणाऱ्या बसला दुचाकीस्वारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपड्याहून नाशिककडे निघालेल्या बस क्र.MH-40 , Y-5977 सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर १५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पातोंडा रोडवर समोरून येणाऱ्या बसला चोपड्याकडे जात असलेला तरुण मनोज पाटील हा जागीच ठार झाला आहे. पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी मनोज युवराज पाटील हा तरुण मोटारसायकलने चोपडाच्या दिशेने जात होता. तरुण जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन तीचे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी पडून मोटारसायकल क्षणार्धात जळून खाक झाली होती. बसमधील…
जळगाव : प्रतिनिधी देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे दि.१२ ते १७ जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जात आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रभात फेरी, जनजागृती रॅली, तिरंगा वितरण, पथनाट्य सादरीकरण केले जात आहे. जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम राबविले जात आहे. दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता नेहरू युवा केंद्र जळगावच्या कार्यालयात ध्वजारोहण पार पडले.…
धरणगाव : प्रतिनिधी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व मराठा आरक्षण व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे माजी आ. विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानिमित्त सकल मराठा समाज धरणगावतर्फे १५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ संध्याकाळी ७ वाजेला शोकसभा संपन्न झाली. यावेळी गुलाबरावजी वाघ, डि.जी. पाटील, प्रताप पाटील, पी.एम.पाटील, डि.आर.पाटिल, सुरेश चौधरी, जिवनआप्पा बयस, ज्ञानेश्वर महाजन, दिपक वाघमारे, निलेश चौधरी, कैलास माळी, ललित येवले, विजू महाजन, मोहन पाटील, भानुदास विसावे, शिरीष बयस, प्रताप पाटील, पप्पू भावे, राजू महाजन, जिजाबराव पाटील, विलास महाजन अॅड वसंतराव भोलाणे रतिलाल चौधरी नितीन चौधरी, संजय चौधरी, अॅड शरद माळी, दिपक चौधरी, सुनिल चौधरी, धिरेन पुरभे,…
धरणगाव : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहे या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे चेअरमन आनंदराव पवार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये शाळेचे चेअरमन आनंदराव पवार सर, व्हा. चेअरमन मालती पवार, मुख्याध्यापिका वैशाली पवार, सुधर्मा पाटील , गणेश कोंडे, सुनील शाह सर, संकेत भंडारी सर व सर्व पालकवृद उपस्थित होते. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते परेडच्या सर्व कॅप्टन ला इन्वेंचरी सेरेमनी देण्यात आली. त्यानंतर परेड झाली. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण,…
जळगाव : प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण प्रदर्शन पाहिल्यानंतर होते. स्वातंत्र्याचा इतिहास चित्रस्वरूपात रोचकपध्दतीने मांडण्यात आला असून त्यात संविधान निर्मिती, संस्थाने विलगिकरणसह अन्य महत्त्वाच्या बाबी युवा पिढीला प्रेरक आहे. असे सांगत स्वातंत्र्याची गाथा समजून घेण्यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही…

