मुंबई : वृत्तसंस्था आज दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी वडिलांकडून प्लॉट व रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी करून विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या १० जणांविरुद्ध पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात नूरजहा जाबीर देशपांडे (वय २६, रा. एस.पी. बेकरी जवळ धरणगाव) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ मी २०२१ रोजी खोटे आरोप लावून रात्रभर मारहान केली. तसेच मुलीसोबत घरा बाहेर काढले. त्यावेळेस धमकावून सांगितले की, तू तुझ्या वडिलांकडुन प्लॉट व रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख घेवून ये, असे सांगून मला ‘हम भिकारी की पोर कर के फस गये है’. आम्ही दुस-या ठिकाणी लग्न केले असते तर आम्हाला चांगला हुंडा मिळाला असता,…
जळगाव : प्रतिनिधी सरकारी नोकरीचे आमिष देऊन फसविल्याची घटना जिल्हापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. आरोग्य विभाग, रेल्वेत नोकरी लावून देण्याची थाप एका ठगबाजानं मारली. त्यासाठी वेळोवेळी ४ लाख ४० हजार लाख रुपये उकळले. भूषण शरद पाटील (रा.खाजोळा ता.पाचोरा) असं त्या ठगबाजाचं नाव आहे. या संदर्भात अधिक असे की, प्रदीप चीतामन ससाणे (वय ५५) यांना भूषण पाटील याने त्यांचा मुलगा आणि भाच्याला आरोग्य विभागात आरोग्य सेवक, रेल्वे , म्हाडा, वाहन चालक, रेल्वे ग्रुप डी, अशा विभागमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. भूषण पाटील याने प्रदीप ससाणे यांच्याकडून डिसेंबर २०१९ ते जुलै २०२२ पर्यंत रोख रक्कम १,३,०००/- तसेच त्यांचे महाराष्ट्र…
नांदेड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील बारड इथे ५० हजाराची सुपारी देत आईनेच केला पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट रोजी बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुशील नामक युवकाचा खून झाला होता. या प्रकरणी बारड पोलिसांनी छडा लावत या खूनामागे मयताची आईच असल्याचे समोर आलं आहे. सुशिल श्रीमंगले असं खुन झालेल्याचे नाव आहे. शोभा श्रीमंगले, राजेश पाटील, विशाल भगत असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. नांदेडच्या गिता नगर भागात राहणाऱ्या सुशिल श्रीमंगले याचा मृतदेह मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात सापडला होता. पोलिस तपासात सुशिलचा गळा आवळून खून झाल्याची बाब पुढे आली होती. सुशिल हा आई आणि वडील यांना…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. याची माहिती खुद्द सिसोदिया यांनीच ट्वीट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी सीबीआय आली असून, त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक असून, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. मात्र,आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नसल्याची टीका केली आहे. सत्यंद्र सिंह यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरात आज सीबीआय पोहोचली आहे. हे प्रकरण दिल्लीतील एक्साईज पॉलिसी…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात बँकेच्या कामानिमित्त आलेल्या पिलखोड येथील ८० वर्षीय वृद्धेचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी बसस्थानकात घडली हाेती. याप्रकरणी गुरुवारी बस चालकाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील पिलखोड येथील पार्वताबाई लक्ष्मण पाटील (वय ८०) ह्या बुधवारी दुपारी बँकेच्या कामानिमित्त चाळीसगाव येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी सायंकाळी येथील बस स्थानकावर आल्या. त्यावेळी औरंगाबाद-धुळे या धुळे आगाराच्या बसने (एमएच १४ बीटी २३५२) त्यांना जोरदार धडक दिली तसेच त्यांच्या डाेक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला हाेता. सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने रोहिणी खडसे या मुक्ताईनगर वरून बोदवड तालुक्यात जात असताना त्यांना कालिंका माता मंदिर गेट माळेगाव फाटा येथे मध्यप्रदेशातील प्रवासी असलेल्या एका चारचाकी गाडीचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले चारचाकी वाहनहे रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे पंधरा फुट नालीत पलटी होऊन कोसळले होते पाच प्रवासी हे गंभीर जखमी होऊन वाहनात अडकून पडलेले होते ही बाब रोहिणी खडसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील जनसंवाद यात्रेसाठी रवाना झाल्या. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी बोदवड तालुक्यातील…
धरणगाव : प्रतिनिधी येथील एकशे आठ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा तथा कार्यक्रमात उत्तम कामगिरी केल्याबद्दल स्मृती चिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी पी.आर.हायस्कूल सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित ७५ फुट लांबीच्या तिरंगा राष्ट्रध्वज रॅली आणि ‘नमन करो इस मिट्टी को’ या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला म्हणून शाळेचा डाॅ. अरूण कुलकर्णी व डॉ.मिलिंद डहाळे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक डॉ.…
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आलेली ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यावेळी दहशतवादी सागरी मार्गानेच मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे राज्याला जास्त धोका हा समुद्रमार्गी असल्याने कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येत आहे. तसेच राज्यात आज सकाळी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. काही तासांपूर्वीच ही बोट…
जळगाव : प्रतीनिधी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हॉटेलवर गुरुवारी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला. येथील हॉटेलमधून पोलिसांनी डझनभर जोडप्यांना पकडले असून चौकशी कामी त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेला कुंटनखाना, अयोध्या नगर परिसरात सुरू असलेला कुंटनखाना पोलिसांनी उध्वस्त केल्यानंतर आज पुन्हा दोन हॉटेलवर पथकाने छापा टाकला आहे. औरंगाबाद महामार्गावर आर.एल.चौफुली ते जळगाव काटा दरम्यान असलेल्या एका हॉटेलवर आणि भुसावळ महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळ एका हॉटेलवर पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणाहून पथकाने १८ पेक्षा जास्त तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांची…

