Author: editor desk

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या खूनप्रकरणात यावल पोलिसांनी अटक केलेल्या चौथ्या संशयितास गुरुवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्यासह आधी अटकेत असलेल्या महिलेसह तिघांना २९ ऑगस्ट रोजी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. उसनवारीचे ४ लाख रूपये मागितल्याच्या कारणावरून चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (वय ३८) या तरुणाची २१ ऑगस्टच्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यात पसार असलेला जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) याला यावल पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यास गुरुवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले. तेथे त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात कल्पना शशिकांत पाटील (रा.चितोडा),…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी माहेरून ५० हजार रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात धनश्री दीपक शिंदे (रा. आमोदा ता.यावल, ह.मु. ओझर ता.चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ एप्रिल २०१९ पासून ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत पती दीपक देविदास शिंदे याने माहेरून ५० हजार रुपये आणावे म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. तर सासरे देविदास जालम शिंदे आणि सासू शोभाबाई देविदास शिंदे (सर्व रा.आमोदे ता.यावल) यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन फिर्यदिचा गांजपाठ केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. किशोर पाटील हे करीत आहेत.

Read More

यावल : प्रतिनिधी वीज बिल थकीत झाल्यानंतर कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप संजय चौधरी (वय २६, रा. मोरेवाडा डांगपुरा यावल) असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या संदर्भात महेद्र सीताराम कुरकुरे (वय ३०, धंदा : महावितरण कार्यालय यावल रा.न्हावी ता.यावल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, विजबिल बाकी असल्याने प्रदीप चौधरी हे राहत असलेल्या भाड्याच्या घराचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. याचाच राग येऊन दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रदिप चौधरी याने महावितरण कार्यालयात येऊन वरीष्टांनी दिलेल्या विजबीलाची वसुली करण्याचे तसेच थकीत विज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॅलेंज कॅरम स्पर्धा-2022’ या स्पर्धेला सुरूवात झाली. कांताई सभागृह येथे कॕरम स्पर्धेचे कॕरम खेळून उद्घाटन झाले. उद्घाटनाप्रसंगी जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे विजय मोहरील, अनिल जोशी, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयेशा खान, माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे यांच्यासह सर्व सहभागी शाळांचे क्रीडाशिक्षकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पंधरा शालेय संघातील एकूण 75 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात मुलींमध्ये विद्या इंग्लिश स्कूलचे, मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूलचे वर्चस्व राहिले. आज दि. 26 होणाऱ्या मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामान्यात दुर्गेश्वरी धोंगडे विरूध्द…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी धुतलेले कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर टाकणाऱ्या महिलेला वीज वितरण कंपनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भवानीनगर परिसरात घडली. सविस्तर वृत्त असे की, शहरातील भवानी नगरमध्ये रामदास काशिनाथ भोई, मीराबाई रामदास भोई, सुरेश रामदास भोई हे मुलांसह राहतात. सकाळी पती रामदास भोई, मुलगा सुरेश भोई व सून हे सर्व कामावर निघून गेले. तर मीराबाई या देखील बोंबील, झिंगे विक्रीचे काम करतात. घरातील सर्वजण कामावर निघून गेल्यामुळे आंघोळ करून मीराबाई या धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेल्या. त्यांच्या गच्चीवरून वीज वितरण कंपनीचे तार गेलेले आहेत. या तारांना स्पर्श झाल्याने मीराबाई भोई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी आणि एन.एस.एस. युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर टी ओ कार्यालय आणि जळगाव वाहतूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जागृती अभियानासंदर्भात कार्यक्रम सफल झाला. या वेळी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ए.ए. शेख, डेप्युटी आर.टी.ओ. श्याम लोही आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक लीलाधर कानडे यांची व्याख्याने झालीत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसोर एस.एन. भारंबे हे अध्यक्ष स्थानी होते. श्याम लोही यांनी रस्ता अपघाताची करणे आणि उपाय स्पष्ट केलीत तर न्यायाधीश श्री शेख यांनी कायद्याच्या वाहतूक, रस्ता सुरक्षे बाबत सखोल बाबी छात्र सैनिकांना सांगितल्यात. तसेच त्यानी स्वयंसेवक आणि छात्र सैनिक यांच्या…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी  अप्पर पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार वरणगाव पोलिसांनी टहाकळी शिवारात छापा टाकला. त्यात १९ जुगारींवर कारवाई करत त्यांचेकडून १ लाख ५६ हजाराची रक्कम जप्त केली. गणेशोत्सवासाठी आयोजित शांतता समितीच्या बैठकीला मुक्ताईनगर कडून वरणगाव येथे आलेले अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना टहाकळी-चिंचोल मार्गावरील हॉटेल स्वप्नपूर्णाचे मागे जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरणगाव येथील बैठक आटोपताच एपीआय आशिष अडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वरणगाव पोलिसांनी वरील ठिकाणी सायंकाळी ६ वाजता छापा टाकला. त्यात १९ जुगारी आढळले. दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी १७ जुगारींकडून १ लाख ५६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था खरी शिवसेना कोणती? या शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 29 ऑगस्टरोजी या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी येत्या 29 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीव्ही 9 च्या दिल्लीतील सूत्रांनी ही शक्यता वर्तवली आहे. आज 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या (Shivsena) याचिकेवर सुनावणीची तारीख मागील वेळी कोर्टाने दिली होती. मात्र दुपारपर्यंत ही याचिका कोर्टाच्या पटलावर लीस्टच करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचिका पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. 23 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या…

Read More

पालघर : वृत्तसंस्था मनोर विक्रमगड रस्त्यावर झालेल्या बस आणि टेंपो अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास पालघरहून अमळनेरकडे जाणाऱ्या बसला टेम्पोने समोरा समोर धडक दिली. ही धडक इतकी भाषण होती की बसचा पुढचा भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींवर मनोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही बस नाशिक, धुळे मार्गे अमळनेर येणार होती. दरम्यान, जुलै महिन्यात इंदोरकडून अमळनेरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीत कोसळली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अमळनेरला येणाऱ्या बसचा अपघात…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 11 वाजता आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, आपचे काही आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आम आदमी पक्षाला भाजप आपले आमदार फोडेल की काय अशी शंका होती. त्यामुळे काल संध्याकाळी आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू या बैठकीच्या आधीच आपचे काही आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे एकूण 62 आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार होती. दरम्यान, भाजपने आमच्या…

Read More