भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ३० रोजी व २ रोजी शाळेच्या रस्त्यावर व तिच्या घराजवळ संशयित आरोपी सचिन राजू मोरे(वय ३०) रा.०७ चौकीच्या मागे, भुसावळ याने अल्पवयीन मुलीस वाईट उद्देशाने मुलीचा पाठलाग करून हातवारे करीत विनयभंग केला आहे तर अल्पवयीन मुलीच्या भावास शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नी.दिलीप चौधरी हे करीत आहेत.
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशासह महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सणाला घरोघरी गोडधोड आणि फराळ करण्याची पद्धत आहे. हा सण गोरगरीबांनाही साजरा करता यावा यासाठी सरकारनं हा पॅकेजचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७ कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे. दिवाळी सणात गोरगरिबांसाठी दिलासा देण्यासाठी शिंदे सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल दिवाळीच्या सणासाठी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1577219644582252544?s=20&t=3stGgAccdm9iqH1W55v05g उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,”आज आमच्या कॅबिनेटने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड…
तुम्ही जर Telegram App वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामने भारतातील प्रीमियम यूजर्सला दसरा गिफ्ट दिलं आहे. दसराच्या मुहूर्तावर सब्सक्रिप्शन फीसमध्ये कपात केली आहे. आता यूजर्सला दर महिना 469 रुपयांपैकी फक्त 179 रुपये द्यावे लागणार आहेत. देशातील वापरकर्त्यांना पाठवलेल्या संदेशात, प्लॅटफॉर्मने सदस्यता शुल्क माफ करण्याची घोषणा केली. ज्या देशात WhatsApp चे जवळपास 500 मिलियन यूजर्स आहेत अशा देशात आक्रमकपणे वाढ करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलं आहे. जागतिक स्तरावर 700 मिलियन मासिक सक्रिय वापरकर्त्यांसह भारत हे टेलीग्रामसाठी प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. भारतात 120 मिलियन टेलीग्राम यूजर्स थर्ड-पार्टी डेटानुसार, टेलीग्रामचे भारतात (India) 120 मिलियन यूजर्स आहेत आणि…
मुंबई : प्रतिनिधी 100 कोटी खंडणी प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 11 महिन्यांपासून अनिल देशमुख कोठडीत आहेत. ईडीने अनिल देशमुखांना 100 कोटींच्या मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अटक केली होती. अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. या कारवाईला 60 दिवस होऊन गेल्यामुळे नैसर्गिक हक्कानुसार जामीन मिळावा असा अर्ज अनिल देशमुख यांनी आधी देखील कोर्टात जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. ईडीने अनिल देशमुखांविरोधात 29 डिसेंबर 2021…
पुणे : वृत्तसंस्था मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरल्यात. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले होते की अशी कुठलीही टोळी सक्रीय नाही परंतु काही ठिकाणी अनोळखी व्यक्तींना पाहून नागरिकांनी चांगलेच बदडले आहे. तशा घटना नाशिक, सांगली, जळगाव येथून समोरही आल्या होत्या. दरम्यान, आता पुण्यातही एका व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही व्यक्ती मुलीच्या वेशात फिरत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी या व्यक्तीला जाब विचारला. पण नीट उत्तरं न देता आल्यानं अखेर या व्यक्तीला तरुणांनी जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला एक व्यक्ती…
धरणगांव : प्रतिनिधी राज्य शासनाच्या कार्य कृषि विभागा अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतक-यांच्या कोरडवाहू क्षेत्रातील शेती बाबत आत्मविश्वास वाढवणे हा या योजनेक उद्देश आहे योजनेतंर्गत धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द व मोद बुद्रुक या गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये दुग्धोत्पादन पशुधन आधारित शेती पद्धती, मुरघास युनिट, व कांदाचाळ काढणी पश्चात साठवण तंत्रज्ञान था घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेत जास्तीत – जास्त शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि विभागाच्या वतीने या आले आहे. याबाबत मा. श्री किरण. एच देसले, सालुका कृषि अधिकारी, धरणगाव व श्री पदमाकर बसन पायल, कृषी सहायक यांनी प्रत्यक्ष…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कधीकाळी महाराष्ट्र भाजपाचे आधारवड आ. एकनाथराव खडसे यांच्या बद्दल काही दिवसांपासून नको त्या वावटळ्या उठवण्याचे काम भाजपाकडून सातत्याने होत आहे काहीही आधार नसलेल्या बातम्या समाजात पेरून खुद्द आ.खडसेंना बदनाम करण्याचे,त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू आहे जेणेकरून जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दमदार कामगिरीला कुठेतरी लगाम लागेल. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये होईलत्यांच्या मध्ये संभ्रम तयार करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला पोषक वातावरण तयार होऊन फायदा होईल मात्र कितीही काही झाले तरी ज्या भाजपाने नाथाभाऊंची गेल्या ४० वर्षाची अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द कूटनीतीने संपवण्याचा घाट रचला,त्या…
महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ठरवित असतात. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी झाले आहेत. तरीही तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये कमी केली नाही. नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या, आजचे दर काय आहेत. देशात जवळपास 136 दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत. महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून इंधन दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील इंधन दर स्थिर आहेत. देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय? – मुंबई : पेट्रोलचा दर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : विजय पाटील येत्या काही दिवसात नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होत आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक मतदार संघातील अनेकांनी आतापासून गुघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. तर अनेक पक्षाचे दिग्गज उमेदवारांना पराभू करण्यासाठी नवीन चेहऱ्याना संधी मिळण्यासाठी काही नवखे आपले भवितव्य उजळू पाहत आहे. त्यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातील जळगाव- धुळे-नंदुरबार या जिल्ह्यातील पदवीधर मतदार संघाच्या नव मतदार नोदणीवर भर देत आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी दिवसरात्र करून नोदणी करण्यासाठी सज्ज आहे. तरी नाशिक मतदार संघातील मतदारांनी लवकर नोदणी करून घेण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ हा सद्या कॉंग्रेसचे आ.सुधीर…
मुंबई : वृत्तसंस्था दसरा मेळाव्यासाठी अवघ्या दोन दिवस राहिलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिंदे हे खरोखरीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात 700 दवाखाने सुरू करण्यात येणार असून, ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या नावाने हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दसरा मेळाव्यापूर्वीच शिंदे यांनी ही घोषणा केल्याने त्याला अधिक महत्त्व आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय…

