Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यायमूर्ती उदय उमेश ललित आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश झालेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. दरम्यान, नवीन न्यायमूर्ती ललित यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा असेल. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, कायदा मंत्री किरेन रिजिजू, माजी सरन्यायाधीश एनव्ही रमना, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधीश आणि न्यायमूर्ती ललित यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तत्पूर्वी काल शुक्रवारी मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना निरोप देण्यात आला. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे रमणा यांनी आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये सांगितले. साधे वकील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेत मुलींच्या गटात विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने कुणालाही एकही गुण न मिळू देता एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरीत अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलच्या पुर्वी भावसार हिचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. तसेच मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलचा पियुष भुईकर याने रायसोनी पब्लिक स्कूलच्या ऋतिक अग्रवालचा पराभव करून विजेते पद प्राप्त केले. मुलींमध्ये् विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या श्रावणी मोरे आणि पुर्वा भुतळा यांनी तसेच मुलांमध्ये अॅंग्लो उर्दू हायस्कूलचा माज पठाण आणि रायसोनी पब्लिक…

Read More

जळगाव  : प्रतिनीधी संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक… पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा… हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर… ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद… ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या फुगडीसह… विदेशी नागरीक डॅनियल हदाद (इस्त्राईल) यासह मान्यवरांनी, अनुभूती स्कूलचे विद्यार्थ्यांनी, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्यांवर नृत्यांसह ठेका धरत आनंद द्विगणीत केला. जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. जैन…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अभोणे गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दि. 26 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अभोणे गावात बैल पोळा सण उत्साह साजरा केला असताना दुसरीकडे अवघ्या तालुक्याला हादरवणारी घटना घडली. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (३८) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (३२) हे घरी बैल पूजनासाठी आले. लहान भाऊ शिवाजी पाटील याने दारूच्या नशेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, लहानभाऊ…

Read More

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील लोणवाडी येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पोळ्याच्या दिवशीच तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद वसंत चौधरी (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पिंपळगाव देवी रस्त्याजवळील बोरलोन या ठिकाणी असलेल्या तलावात, ते बैल धुण्यासाठी गेले होते. बैलांना अंघोळ घालत असताना अचानक बैल बिथरले. तसेच बैल तलावातील खोल पाण्यात शिरले. यावेळी शेतकरी विनोद चौधरी यांनी बैलांचा दोर धरून ठेवलेला होता. त्यामुळे ते देखील बैलांसोबत पाण्यात ओढले गेले. तलावातील गाळामधे फसत असल्याचे लक्षात, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी विनोद चौधरी यांना तलावाबाहेर काढले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील कराडी येथे शेतमजूर सालदारचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील बैताकवाडी येथील रुख्माबाई कमल चव्हाण (वय ३२, ता. पानसमेल, जि. बडवानी) यांनी या संदर्भात पारोळा पोलिसांत फिर्याद दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, कमल चव्हाण हे दोन वर्षांपासून तालुक्यातील कराडी येथे बबलू पाटील यांच्या शेतात सालदारकीचे काम करत हाेते. बबलू पाटील यांनी या कमल चव्हाण यांना घर बांधून दिले असून ते परिवारासह तेथे राहत होते. १७ मे रोजी शेतात मिरची लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रुख्माबाई घरी पाणी पिण्यास आली असता बबलू पाटील…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यात आज बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना बैलपोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण टाकणारी घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे. सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात काका पंढरीनाथ कचरू काळे (वय – ३३) आणि रितेश अजिनाथ काळे (वय-१८) अशी मृताची नावे आहेत. हे दोघेही पोळ्याच्या सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाझर तलावाच्या काठावर घेऊन गेले होते. मात्र, बैलाने धक्का दिल्याने काका पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला पुतण्या देखील पाण्यात बुडाला. फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे ही दुर्दैवी घटना घडली. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप सोबत युती करून आपली सत्ता स्थापन केली होती तर शिवसेनेकडे मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याशिवाय फायरब्रंड नेता म्हणून कुणीही शिल्लक नसल्याने संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आल्याची काम करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना असेल की संभाजी ब्रिगेड सोबत घरोबा करून पुढील रणनीती ठरवतील याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रादेशिक संपूण टाकण्याचं कट कारस्थान सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एकलव्य संघटनेच्या वतीने तसेच एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या आदेशानुसार आज जळगांव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जळगाव तहसीलदार, जळगांव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना जळगाव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष राहूल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जळगांव जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाज मोठ्या संख्येने स्वतंत्रपूर्वी काळापासून वास्तव्य करत असून आजही हा समाजात घरकुल, रेशनकार्ड, पासून वंचित आहे केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर गोरगरीब कुटूंबांना घर देण्याचे ठरवले असून आजही मोठ्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज हा ह्या योजना पासून दूर आहे तसेच प्रत्येक…

Read More

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आझाद यांनी राजीनामा दिल्याबरोबर पक्षाचे सदस्यत्वही सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद अस्वस्थ होते. ही अस्वस्थता पक्षाच्या बैठकीतून, त्यांच्या विधानांवरुन आणि कृतीतूनही दिसून येत होती. ते कधीही मोठा निर्णय़ घेतील, अशी चर्चा सुरू होतीच. या आधीच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे…

Read More