Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी गावाजवळ रात्री वैजापुरच्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण ठार तर ६ जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमी आणि मयत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी ता. वर्ला जि. बडवाणी येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास अपघात झालाय. वैजापूर येथील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीय. परंतू घटनास्थळावर दोन तरुण जागीच ठार झालेत. तर दोन गंभीर जखमी तरुणांना जळगाव जिल्हा रुगणालयात हलविण्यात…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी रेल्वे गैंगमन, टिसी, तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई अशा ठिकाणी नौकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणांना तब्बल २८ लाखांत गंडवल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण शरद पाटील (रा. खाजोळा ता. पाचोरा), असे संशयित आरोपीचे नाव आहे. पाचोरा पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. पहिली फिर्याद कैलास अशोक पाटील (वय ४१, धंदा : शेती व पानटपरी रा. तारखेडा ता.पाचोरा) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भुषण पाटील याने रेल्वे गैंगमन, टिसी, तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये देऊन सरकारी नोकरीचे काम करुन देतो. त्यानुसार कैलास पाटील…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झालेला तुमचा आमदार, जो पवार साहेबाना झाला नाही, स्वतःला बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणवणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना झाला नाही… तो आता बंडखोर शिंदे गटात सामील झाला आहे, हा आमदार थोड्याच दिवसात भाजपात गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच १६ बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई होऊन राज्यातील असंविधानिक सरकार कोसळेल.पन्नास खोके एकदम ओक्के” यात काय दडलंय हे सारी जनता जाणून आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता गद्दारांना माफी करणारच नाही.” या मतदार संघातही आमदार चंदू पाटीलको करारा जबाब मिलेगा….. असे सांगून ५० खोके घेऊन ते जनतेचं प्रेम…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी गेल्या विधानसभा निवडूणुकीत ज्या 90हजार मतदारांनी विश्वास ठेऊन मतदान केले त्यांचेसह मतदार संघातील जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या आ.खडसे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील, आज तालुक्यात जे जे विकास कामे दिसत आहेत, ती सर्व विकास कामे नाथाभाऊनीच केलेली आहे. त्या कामात बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय तालुकावासीयांसाठी फार मोठी उपलब्धी आहे.तालुका निर्मिती मुळे बोदवड शहरात तहसील कार्यालय आलं, पंचायत समिती आली, कोर्ट आलं… आणि त्यामुळं नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचू लागल्याने शासकीय कामे सहज होऊ लागली. याशिवाय गावागावाना जोडणारे रस्ते, शाळांखोल्या, समाजमंदिरे, प्रशस्त हॉल आदी अनेक विकास कामे गेल्या ३० वर्षात भाऊंनी उभी केलीत. नाथाभाऊ आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यासह सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देखील आयोजित केले जात आहे. जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून विविध आकाराचे गणराया साकारले. विशेष म्हणजे या मूर्ती तयार करताना त्यात वृक्षबीज टाकण्यात आले असून मूर्तीचे दिव्यांग मुलांना मोफत वितरण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामाध्यमातून असून जिल्हाभर विविध उपक्रम साजरे केले जातात. उडानच्या संस्थापिका हर्षाली चौधरी यांनी कल्याण येथील डॉ.जयश्री कळसकर यांच्या माध्यमातून संस्थेतील कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी, शिक्षकांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणचे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राज्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात चांगलेच राजकिय चर्चेला उधान आले होत. मनसेची भाजपशी जवळीक वाढत चालली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याची तपशील अद्याप समोर येऊ शकली नाही. फडणवीस उपमुख्यमंत्री…

Read More

जळगाव(प्रतिनिधी) : २८ ऑगस्ट रोजी रिद्धी जानवी फाउंडेशन व आर जे न्यूज चैनलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डायनामिक पद्धतीने मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला उपस्थित महापौर सौ जयश्रीताई महाजन यांनी आपल्या भाषणात त्यांच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले व प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे उपस्थितांना आवाहनही केले.आमदार राजू मामा भोळे यांनी त्यांच्या या कार्याला समाजात एक नवी संकल्पना म्हणून प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.जयेश वाल्हे हे होते.त्यांनी या मोफत नेत्र तपासणीत सुमारे 200 रुग्णाची तपासणी केली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रिद्धी जानवी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपणी यांच्या वाढदिवसानिमित्त हा…

Read More

देशाच्या परकीय चलन बाजाराच्या आकडेवारीनुसार बाजार उघडताच रुपयाने घसरण दाखवण्यास सुरुवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया खालच्या स्तरावर घसरला आहे. ऐतिहासिक घसरणीसह रुपया 80 रुपये पार करून 80.11 पैशांवर घसरला आहे शुक्रवारी डॉलरचा भाव 79.87 पैसे होता. आज बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 80.11 रुपयांवर पोहचला आहे. शुक्रवारच्या तुलनेत 21 पैशांची घसरण नोंदवली गेली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत कमालीची घरसण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सर्वात नीचांकी स्तरावर गेला आहे. रुपयाच्या सततच्या घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलरचे वर्चस्व आणि भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे रुपयावर दबाव वाढत आहे. 2022 मध्येच डॉलरच्या तुलनेत रुपया 7…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथील तब्बल ७ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद असणार्‍या पाणी पुरवठा योजनेचे आज ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपुजन करण्यात आले. जलजीवन मिशनच्या अंतर्गत या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून या माध्यमातून साकेगावला ही योजना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच याप्रसंगी दोन्ही मंत्र्यांनी साकेगावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी साकेगाव येथे जलजीवन मिशनच्या अंतर्गत ७ कोटी ३५ लक्ष रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर केंद्रीय मंत्री गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणार नाहीत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत बोलत असतांना त्यांनी विहिरीत उडी मारीन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे म्हटले आहे. गडकरींनी सांगितलं की, जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की, मी श्रीकांतला सांगितलं की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही. नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगून सध्याच्या…

Read More