जळगाव : प्रतिनिधी खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी, प्राणघातक हल्ला या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले भूषण उर्फ भासा विजय माळी (वय २२) व सचिन उर्फ टीचकुल कैलास चौधरी (वय २२, दोन्ही रा.तुकारामवाडी) या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. विशेष म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात जामीन झाल्यावर कारागृहातून बाहेर पडताच आज (मंगळवार) पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी हे आदेश काढले आहेत. भूषण माळी, सचिन चौधरी व त्याच्या सहकाऱ्यांनी १८ मार्च रोजी शासकीय रुग्णालयाच्या आवारात सूरज विजय ओतारी याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात दोघं जण कारागृहात होते. दोन दिवसापूर्वी सचिन याला न्यायालयाने जामीन…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शाहीनाबी महेमूद शेख (वय ३०, धंदा – गृहिणी रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव) या पिडीत विवाहीने चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती – शेख महेमूद शेख नूरा, जेठ – कलीम शेख नूरा, शेख शकील नुरा, जेठानी – मुमताज शेख शफी, शेख जवराहारून, सासू खैरुनिसा शेख नुरा (सर्व रा.शेदुर्णी, ता. जामनेर) यांनी माहेरुन ५ लाख रुपये प्लॉट घेण्यासाठी मागणी केली. तसेच शिवीगाळ करुन मारहाण करून अंगावरुन सोन्याचे दागिने काढून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल…
जळगाव (प्रतिनिधी) बदनामी कारक तथा लज्जा उत्पन्न होईल असे व्हिडीओ एका तरुणीला पाठवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात जामनेरच्या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मो.आकीब शे.मोहमद रफिक (रा.जुना बोदवड रोड जामनेर), असे संशयित आरोपीचे नाव आहे. तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की, मो.आकीब शे.मोहमद रफिक याने १४ ऑगस्ट ते १५ ऑगस्टच्या दरम्यान, पिडीतेच्या मोबाईलवर तिच्या नावाने बदनामी कारक व लज्जा उत्पन्न होईल असे स्टेटस व व्हिडीओ व्हॉटसअपवर पाठवले. याप्रकरणी मो.आकीब शे.मोहमद रफिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. महेंद्र उदेसिंग पाटील हे करीत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आवाहन केलं आहे. परंतू राष्ट्रवादीमध्ये यायचं की नाही? हा निर्णय सर्वस्वी पंकजा मुंडे यांचा आहे, असं एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का? याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे स्पष्ट विधान केलं आहे. याबाबत विचारलं असता खडसे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होत आहे, अशी भावना सातत्याने जनतेमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या बातम्याही येतात. त्यामुळे स्वाभाविकपणे अमोल मिटकरी…
जळगाव : प्रतिनिधी वेश्याव्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलीची विक्री तसेच बळजबरी विवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील येथील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत आरोपी महिलेने पिडीत अल्पवयीन मुलीला तिच्या दिर व दिराणी तसेच दिराचा शालक अशा तिघांना वेश्याव्यवसायासाठी विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपी असलेल्या महिलेच्या दिराच्या शालकासोबत बळजबरी बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिडितेने फिर्यादीत केला आहे. 23 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडलेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस…
धरणगाव : प्रतिनिधी येथील श्री जिनिंग मध्ये आज गणेश चतुर्थीच्या मुहर्तवर कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मुहर्तचा भाव ११ हजार १५३ रुपये श्री जिनिंग मध्ये प्रति क्विंटल भाव देण्यात आला. दरवर्षी प्रमाणे धरणगाव तालुक्यातील जीनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहार्तवर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी खरेदीचा शुभारंभ काटा पूजन करून करण्यात आला. श्री. जिनिंग मध्ये काटा पूजन नयन शेठ गुजराथी, जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, सागर कर्वा, प्रवेश गुजराथी, निखिल बयस, नीलेश चौधरी या संचलकाच्या हस्ते करण्यात आले. मुहूर्तावर पहिल्याच दिवशी साधारण क्विंटल कापूसची आवक साधारण २ हजार क्विंटल श्री जिनिंगमध्ये होती. स्थानिकपेक्षा आंध्रप्रदेशमधील आवक सर्वाधिक होती. कापूस खरेदीच्य या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गणेशोत्सवानिमित धामधूम आहे. घराघरात गणपती बाप्पांचं भक्तीभावाने आगमन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं. “राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज्यातील गणेश भक्तांना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं. https://twitter.com/mieknathshinde/status/1564802383799955457?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1564802383799955457%7Ctwgr%5Ebb0f4b1acfe9c7b270125cebff913b5ceebbfe86%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmumbai%2Fganeshotsav-2022-at-varsha-by-cm-eknath-shinde-and-family-in-mumbai-pbs-91-3103286%2F “यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत” एकनाथ शिंदे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन…
बांभोरी. ता.धरणगाव : प्रतिनिधी येथील मुक्ताई महिला भजनी मंडळातर्फे गावातील गरजू महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते महिलांना साडीवाटप करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. देवकर म्हणाले की, मुक्ताई महिला भजनी मंडळाने आपल्या गरजू भगिनींसाठी आज स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांची गरज असून, त्यासाठी दात्यांनी पुढाकार घेतला पाहिजे व अशा मंडळातील महिलांचा आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री देवकर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मंडळाच्या संस्थापक सुरेखाताई विजय माळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी धनराज माळी, मोहन पाटील, रवींद्र पाटील, देवरे आबा, दिलीप अण्णा, धर्मा पाटील, हितेंद्र…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा विभागात असलेले जावखेडा गावात महावितरणतर्फे आज वीज चोरी रोखण्यासाठी पथक गेले असताना या पथकावर एकाने हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे. या जखमी कर्मचाऱ्यास तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळकोठा विभागात जावखेडा गावात आज दि ३० रोजी सकाळी महावितरणचे अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन, पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीज चोरी रोखण्यासाठी गेले असता. याठिकाणी मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकोडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाकडी दांडक्याने पथकातील काही सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत अक्षय…
मुंबई : वृत्तसंस्था सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) ने व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार recruitmentfci.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. या भरतीद्वारे एकूण ११३ पदे भरली जातील. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२२ आहे. रिक्त जागांचा तपशील एकूण पदे – ११३ महत्त्वाची तारीख ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २७ ऑगस्ट २०२२ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ सप्टेंबर २०२२ वय मर्यादा व्यवस्थापक पदांसाठी अर्ज…

