मुंबई : वृत्तसंस्था सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. तर काही पक्षी तुम्ही जर शिकविले तर ते बोलू हि शकतात व पोपट तर नक्कल काढण्यात एक्स्पर्ट असतात, असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातले बरेच व्हिडीओ हे फनी असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय तो पाहून आतापर्यंत भरायचं कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि मोठ्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक BOIने घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी दिलेय. बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँक ऑफ इंडियाकडून स्टार होम लोन वार्षिक 8.30 टक्के दराने मिळू शकते. त्याचा सर्वात स्वस्त EMI असणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ऑफ इंडियाने (BOI) आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बँकेने BOI स्टार होम लोन योजनेसाठी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्यात आता आदर्श स्पर्धात्मक व्याजदर वार्षिक 8.30 टक्के आणि सर्वात कमी EMI सह सुरु झाले आहेत. सध्या अनेक बँकांनी आपल्या होम लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे.…
मुंबईः वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसा आधी आ.कडू व रवी राणा यांचा मोठा वाद सुरु होता तो वाद जरी कमी झाला असला तरी आ.कडू यांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मजूर केल्याचा एका मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. देशपातळीवर हा मोठा निर्णय असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. दिव्यांगांसंदर्भात कालच मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.…
मुंबई : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर ‘कॉफी विथ करण’ मध्ये आला होता तेव्हा म्हणालेला की,”सध्या मी लग्नाचा विचार करत नाही. मी माझं आणि मलायकाचं नात खूप विचार करून लोकांसमोर आणलं कारण मला माहित होतं यावर सगळे कसे रिअॅक्ट होतील. मी खूप स्पष्ट विचारांचा माणूस आहे. मी काहीच लपवणार नाही. पण मला अजून आयुष्यात स्थिर व्हायचं आहे. जर मी खूश असेन तर मी माझ्या पार्टनरला खूश ठेवू शकेन”. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर ‘कॉफी विथ करण’ मध्ये आला होता तेव्हा म्हणालेला की,”सध्या मी लग्नाचा विचार करत नाही. मी माझं आणि मलायकाचं नात खूप विचार करून लोकांसमोर आणलं कारण मला माहित होतं…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकताच आलेला चित्रपट ‘हर हर महादेव’ प्रदर्शित करू नये यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली होती तर त्याला अभिनेते शरद पोंक्षे यांनी पलटवार करीत उत्तर दिले आहे. अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच तो वादाच्या भोव-यात सापडला. सध्या या चित्रपटावरुन राजकारण पेटले आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या चित्रपटाला विरोध होत आहे. ‘हर हर महादेव’ सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचा आरोप होतोय. दरम्यान आता या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूना सिनेट निवडणुकीमधील चुकीच्या नियुक्त्या थांबवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.जिल्हाअध्यक्ष कुणाल बी पवार यांनी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या विद्यापीठात काय प्रकार सुरू आहे तो आम्हाला कायदा मानणाऱ्या व्यक्तींना समजण्याच्या पलीकडे दिसत आहे. कारण निवडणूक जाहीर झाल्यापासून ह्यात वेगवेगळे बदल सतत होताना दिसत आहे त्यामागे नेमका कोणाचा दबाव आपल्यावर आहे हे आपण जाहीर कराल का? त्यामुळे आम्हास काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे आपण आम्हाला न देता पत्रकार बंधू जे लोकशाहीचे चौथे स्तंभ मानले जातात त्यांच्या मार्फत दिली तर फार अज्ञान दूर होण्यास सर्वांना मदत होईल .तरी आपण पुढील…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दि ८ रोजी अनोळखी व्यक्तीने काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भडगाव पोलिसात धाव घेत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि.चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था आता सोने व चांदीचे दर स्थिर राहतील कि वाढतील हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे. या दरम्यान ग्राहकांची बाजारात खरेदीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, ग्राहकांसाठी आजचा दिवस सोने-चांदी खरेदी करण्यासाठी चांगला नाही. याचं कारण जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोने-चांदी खरेदी करणं किंचित फरकाने महाग पडू शकतं. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,720 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,630 रुपये आहे. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : मुंबईतील सोन्याचे दर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति…
लोक उपवास धार्मिक म्हणून तर काही लोक उपवास म्हणजे वजन कमी करण्यासाठी करतात, पण यामध्ये थोड्या काळासाठी उपवास केल्याने लोकांना कमी कॅलरीज खाण्यास मदत होते आणि वजन कमी होऊ लागते. हा एक नियमित आणि अल्पकालीन उपवासाचा एक नमुना आहे. अनेक अभ्यासांतून दिसून आले आहे की, अधूनमधून उपवास केल्याने ८ आठवड्यात सरासरी ३ ते ७% वजन कमी होऊ शकते. अधूनमधून उपवासाच्या पद्धती जाणून घ्या १६/८ पद्धत : १६ तास उपवास, ८ तासांत खा १६/८ उपवास पद्धतीनुसार वजन कमी करण्यासाठी दिवसाचे १६ तास उपवास करणे आवश्यक आहे. त्याच वेळी उर्वरित ८ तासांच्या आत अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जेवणासाठी दिवसाचे कोणतेही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर राजकीय नेते मंडळी पंतप्रधान मोदी यांच्यासह प्रमुख नेत्याच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहे. तर प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा ही देखील निवडणुकीच्या रिंगणार उतरली आहे. नुकतीच, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान, जडेजाची पत्नी रीवाबा हिचे तिकीट पक्के केले आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिला जामनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. https://twitter.com/ANI/status/1590576829131526145?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1590576829131526145%7Ctwgr%5E47d629f6b18dff4c7def9291f030d62a30823b9a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fgujarat-assembly-election-2022-cricketer-ravindra-jadejas-wife-fielded-from-jamnagar-north-by-bjp-dro95 रिवाबाने 2019 साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी तिने जामनगर उत्तरमधून तिकीट मागितल्याची चर्चा होती. सध्या इथून भाजपाचेच धर्मेंद्रसिंह जाडेजा आमदार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून इथे भाजपाची सत्ता आहे. भाजपा यावेळी सुद्धा आपला…

