Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी पावसामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने व जास्त पावसामुळे बोंडावर कोंब आल्याने शेतकरी खुपच अडचणीत सापडला आहे परंतु संघटीत नसल्याने शासन, प्रशासन त्याच्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत त्यामुळे शेतकरी गावा-गावात संघटीत झाला पाहिजे आणि महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे हेच काम आहे असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले ते अहिरे खुर्दे येथे शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव पाटील यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची अहिरे खुर्दे गावात शाखा स्थापन करण्यात आली. शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून गिरीष गोकुळ चव्हाण,कार्याध्यक्ष म्हणून वाल्मिक सुधाकर पाटील, उपाध्यक्ष म्हणून प्रदिप एकनाथ चव्हाण,सचिव म्हणून…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते. पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत होती. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबर रोजी एनआयए तसंच ईडी अशा काही तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. यामुळं शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोग आता मोकळं झालं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जात आहे. सुप्रीम कोर्टात आज सकाळपासून शिवसेनेबाबतच्या विविध याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत शेवटी कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करणार नसल्याचं म्हटलं आहे. कोर्टाच्या या निकालाबाबत अॅड. सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळं हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा असून उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेसाठी झटका आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगासमोर…

Read More

नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून ठिकठिकाणी आपल्याला आनंदोत्सव साजरा होताना दिसतोय. मात्र या उत्साहात तुमच्याकडून काही चुका होता कामा नये याचीही तुम्ही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही महत्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तुमच्या घरात जर चार महत्वाच्या गोष्टी असतील तर तुम्हाला भरपूर प्रमाणात धनलाभ होऊ शकतो. पीतळेचा हत्ती : वास्तु शास्त्रानुसार, तुमच्या घरात पितळेचा हत्ती असेल तर तुमच्या घरात सकारात्मकतेचा वास होतो. पितळेचा हत्ती फक्त नकारात्मकताच दूर करत नाही तर तुमच्यासाठी यशाचे दरवाजेही उघडे करतो. हत्तीची प्रतिमा : घराच्या लिविंग एरियामध्ये जर हत्तीची प्रतिमा असेल तर धनलाभ होतो. प्रतिमेसाठी मूर्तीमध्ये हत्तीची सोंड वरच्या बाजूला असावी. यामुळे घरात सुख…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशयावरून महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होणार अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेच्या पुढाकारानं मविआ सरकारनं सुरु केलेली शिवभोजन थाळी यापुढेही सुरु राहणार आहे. आज पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही थाळी बंद होणार अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही थाळी सुरू राहिल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी भुजबळांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा घेणार आढावा घेतील असा निर्णय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल येथे करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातून १५ मुलांचे तर मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वा. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व महापौर जयश्री महाजन, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपूरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर, कुलभूषण पाटील, विस्तारक चैतन्य बनसोडे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कॉंग्रेसचे युवानेते चंदन पाटील यांनी आज अखेर ठरल्या प्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात आपल्या अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. जी.एम. फाऊंडेशनच्या कार्यालयात आज दुपारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटील यांचा प्रवेश सोहळा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ हे उपस्थित होते. तर आज चंदन पाटील यांच्यासोबत शहरासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, भवरखेडा येथील विकास सोसायटीचे संचालक निलेश पाटील, अमोल माळी, भागवत मराठे, ज्ञानेश्वर पाटील, सागर पाटील, भाऊसाहेब पाटील, भूषण पाटील, अशोक पाटील, रमण धनगर, परेश…

Read More

जळगाव :प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिरसोली, वडली आणि पात्री येथे देवी भक्तांनी सप्तशृंगी गडावरून आणलेल्या ज्योतीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्यात सुख समृद्धी नांदू दे, बळीराजाला मुबलक धनधान्य पिकू दे, नागरिकांना चांगले आरोग्य लागू दे, असे साकडे यावेळी देवकर यांनी दुर्गा मातेला घातले. पाथरी येथे ज्योतीच्या दर्शनाप्रसंगी देवकर यांच्यासह दिलीप धनगर, राजेश कोलते, पाचोरा येथील प्रकाश पाटील व ग्रामस्थ निलेश पाटील, भीमराव पाटील, अरुण पाटील, संतोष नेटके, सुकलाल नावे, प्रताप पाटील, नाना हरी, मोहम्मद पठाण, डॉ अरुण पाटील, शांताराम पाटील, वसंत माळी, एकनाथ माळी, संभाजी पाटील, कैलास जाधव, मोठाभाऊ सोनवणे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत जळगाव तालुक्यातील रिधुर येथील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पॉलिसीचे वितरण मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील (मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी पिक विम्याचे कवच घेणे अतिशय आवश्यक असून बदलत्या हवामानामुळे व उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपण आपल्या शेतात लागवड करीत असलेल्या पिकाचा विमा उतरवणे गरजेचे असून नुकसान झाल्यास निदान लागवड केलेल्या पिकाचा प्राथमिक खर्च मिळण्यास तरी मदत होईल असे प्रतिपादन मा.गुलाबरावजी पाटील यांनी केले. शासनाने “फसल बिमा पाठशालेचे” आयोजन केलेले असून त्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत जनजागृती व शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या काढलेल्या विमा पॉलिसी घरपोच देण्याचे नियोजन करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुना खेडी भागातील सदाशिव नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड, असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण गरबड चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० ऑगस्ट ते २४ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे मेन दरवाज्याचे कडी कोयंडा तोडला. तसेच त्यामागील लाकडी दरवाजाचे सेंटर लॉक तोडून घरात घुसले. यानंतर घरातील सोन्याचे ७ हजार २० रुपयांचे दागिने, रोख रुपये व घरातील इतर सामान एकुण ६७ हजार ५०० रुपयांचा किमंतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून स.फो. रघुनाथ महाजन…

Read More