अमळनेर : प्रतिनिधी विवाह हा कोणत्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाची वेळ असते, त्या आधी होणाऱ्या साखरपुडा हा देखील शुभ मानला जातो परतू अशा आनंदाची वेळेवर अचानक समोर आलेले दुख पाहून कुणालाही मोठा धक्का बसेलच अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे घडली आहे, हि घटना एकून धक्का बसेल. अमळनेर शहरातील देशमुख नगर भागात २८ वर्षीय तरुण आपल्या कुटुंबीयासोबत वास्तव्यास होता. त्याचा दि १३ रोजी साखरपुडा ठरलेला असून तो आज नेहमी प्रमाणे सकाळी उठून साखरपुद्याची तयारी म्हणून सलूनमध्ये जावून येतो असे सांगून गेला पण घरी आलेला निरोप परिवाराने एकून धक्काच बसला. २८ वर्षीय तरुण तेजस मनोहर मगर याने सलून जावून येतो सांगून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातून गेल्या काही महिन्यापासून दोन प्रकल्प बाहेर गेले आहेत तर आजही एक प्रकल्प बाहेर गेल्याची बातमी समोर आली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात मध्य प्रदेश सरकारने बाजी मारली आहे. मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाला तसे पत्रही केंद्र सरकारने पाठवल्याचे समजते. वेदांता – फॉक्सकॉन, टाटा – एअरबस, बल्क ड्रग पार्क हे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा प्रकल्प गेल्याने पुन्हा एकदा राज्यात आरोप – प्रत्यारोपाला धार येणार आहे. केंद्रातल्या भाजप सरकारने फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यात पाच वर्षांसाठी या झोनला तब्बल 400 कोटी रुपये…
नेहमीच प्रियकर व प्रेयसी बाहेरील हॉटेल मध्ये जाण्यास खूप घाबरत असतात, कारण तसे आहे पण कि त्याठीकाणी कुणी बघून घेईल किवा पोलिसांचा धाक असतोय म्हणून प्रेमीयुगुल जाणे टाळतात पण तुम्हाला माहितीये का? की, हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रूम घेऊन बिनधास्त राहू शकतात. अशाप्रकारे राहणे हा गुन्हाही मानला जात नाही. माहितीच्या अभावामुळे अनेकजण अशाप्रकारे राहणे गुन्हा असल्याचे मानतात. आज आम्ही तुम्हाला गर्लफ्रेंडसोत हॉटेलमध्ये राहण्याचा नेमका कायदा काय आहे याबद्दल सांगणार आहोत. एखाद्या जोडप्याचे लग्न झाले नसले तरी, ते हॉटेलमध्ये राहू शकतात. कायद्याने त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजेच, असे लोक या नियमाचा संदर्भ देऊन, स्वतःला लिव्ह-इन पार्टनर असल्याचा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून राज्यभर राष्ट्रवादीने आंदोलन केले होते त्याचे हाणामारीत ठाणे येथे रुपांतर झाल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली आहे. आव्हाडांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. आज सकाळी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मॉलप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता त्यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव शहरातील होणा-या मंदीराचे साहीत्य चोरीच्या घटना वाढल्याने चोरी करणारे आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त माहितीनुसार की जिल्हापेठ पोस्टे सीसीटीएनएस गुरंन ६०८ / २०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता. सदर गुन्हयात गजानन नगर जळगाव येथिल जागृत महादेव मंदीराचे साहीत्य चोरी झालेले असुन ती चोरी जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश बबनराव केवारे वय ६५ मुळ रा. खामगांव बुलढाणा ह.मु जळगांव रेल्वे स्टेशन मागे जळगांव येथे राहणारा याने केली आहे अशी गुप्त बातमीदारा…
जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात जळगाव जिल्हा हा केद्र बिन्दुस्थानी येत असतांना दिसत आहे. तर जिल्ह्यात सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून एकनाथ खडसे व आ.चव्हाण यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगलेले दिसत आहे. मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतोय, असा टोला खडसे यांनी लगावला होता. तर अजिंठा विश्रामगृहात भाजप आमदार मंगेश चव्हाण पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी उत्तर देताना खडसेंवर ही टीका केली. मुक्ताईनगर १९ पैकी ११ उमेदवार हे जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र एकनाथ खडसे असा आखाडा रंगवतात की माझ्यासमोर कुस्ती खेळायला कोणी तयारच नाही? त्या ठिकाणी कोणतीही पात्र संस्था तुम्ही शिल्लक ठेवली…
धरणगाव : प्रतिनिधी सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा आईला घर कामात मदत करत अभ्यासात रमतगमत असणाऱ्या परेश सुरुवातीपासून अभ्यासात आपली चांगलीच चुणूक दाखवली असे सिनियर पी.आय आंबादास मोरे यांनी मनोगत व्यत करताना सांगतिले. 10 वीत 92.20% 12 वीत देखील 93.17% मिळवत जळगांव शहरातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मध्ये देखील घवघवीत यश संपादन केले आहे. तेला 622 गुण मिळाले आहेत. परेशचे आई सो चित्रा तुकाराम महाजन आणि वडील श्री टी.एस महाजन सर जळगांव शिक्षक असल्यामुळे आधीपासूनच घरात शिक्षणाबद्दल महत्व होते…त्याचाच परिणाम म्हणून परेश अभ्यासात सातत्य ठेऊ शकला मुलाचा या यशामुळे सगळे कुटुंबीय आनंदित झाले असून आपल्या मेहनतीला फळ आल्याचे…
मुंबई : वृत्तसंस्था गुजरात निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपने ऑगस्टमध्येच आपल्या संसदीय मंडळात बदल केले होते. पक्षाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा या मंडळातून नितीन गडकरी यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर पक्षाकडून नितीन गडकरींना साईडलाईन केले जात आहे, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता पुन्हा नितीन गडकरींचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. गेल्या 27 वर्षांपासून या राज्यात भाजप सत्तेवर आहे. गेल्या विधानसभा…
तुम्हाला नेहमी आपली घरातील वरिष्ठ मंडळी सांगत असतील कि आपल्या आहारात लसणाचे प्रमाण जास्त असावे कारण लसणाच्या वापरामुळे जेवणाची छान चव येते. पण लसणाचे याशिवायही अनेक फायदे आहेत. लसूण केस, त्वचा यांच्यासह अनेक रोगांवरही उपायोगी आहे. लसणाचा उपयोग अनेक गंभीर आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो. लसणात अॅलिसिन नावाचं एक संयुग आढळतं, जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलवर प्रभावी आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लसणामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. याशिवाय लसणाचे इतरही अनेक फायदे आहेत. 1. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांमध्ये विविध प्रकारच्या समस्या जाणवतात. वाईट जीवनशैलीमुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. या आजारांमध्ये लठ्ठपणा (…
गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका का येतो आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. नुकतेच सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धांतचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचाही जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका का येतो ते जाणून घेऊया. हृदयविकाराचा झटका रक्ताभिसरण विकार आहे. हृदयाचा पुरवठा करणार्या प्रणालीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. काहीवेळा हृदयाच्या स्नायूंच्या एका भागामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्ताचा…

