जळगाव : प्रतिनिधी ‘लाईव्ह महाराष्ट्र’ न्यूजचा ३ रा वर्धापन जळगावातील रेल्वे स्थानक परिसरातील देव हाईटस येथे दि २२ रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला, यावेळी राज्याचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर हे होते. मान्यवरांच्या हस्ते ‘लाईव्ह महाराष्ट्र’ वर्धापन दिनाचा विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळेस एकाच व्यासपीठावर एकाच मतदार संघातील दिग्गज नेते आल्याने फटाकेबाजी तर होणारच. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, ‘लाईव्ह महाराष्ट्र’ न्यूजची वाटचाल मी स्वतः बघितली आहे, विशेष म्हणजे आम्ही दोन्ही गुलाबराव हे एकमेकाच्या विरोधात होतो पण विजयची पत्रकारिता हि आमच्या विरोधातहि बातम्या आल्या कि…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील वरगव्हाण येथील एका शेतकरी संदीप पाटील यांच्या गुराच्या गोठ्याला दिवाळीच्या दिवशी रात्री अचानक आग लागली आहे. मिळालेली माहिती अशी कि, वरगव्हाण येथील शेतकरी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. संदीप पाटील यांच्या मालकीचा गुरांचा गोटा असुन त्यात एक बैलगाडी व शेती अवजारे होते. प्रथम दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गुरांना खाण्यासाठी मक्का व ज्वारीची कुट्टी साठवली होती, दि.२४ सोमवारी रोजी रात्री अचानक रात्री ११ वाजच्या सुमारास भिषण आग लागली गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली. त्या आगीत त्यांचे शेतीसाठी लागणारे साहित्य त्यात दोन लाकडी वक्खार, 2 लोखंडी नांगर, गोठ्यासाठी जे पत्री शेड होते त्यांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील फत्तेपूर येथे ऐन दीपावलीच्या दिवशीच विजेचा धक्का लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा सोमवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. गणेश प्रकाश नेमाडे (४५, रा. कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (४०, रा. टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मयत वायरमनची नावे आहेत. गणेश हे अनुकंपाखाली नोकरीला लागले होते तर सुनील हे झिरो वायरमन होते.जनतेला दिवाळीच्या दिवशी उजेडात राहण्यासाठी ते वीज वितरणचे कर्तव्य निभावीत असतांना त्यांनी कुठलाही विचार न करता आपले काम चोखपणे बजावीत होते, मात्र त्यांच्याच घरात आज अंधार निर्माण झाला आहे. फत्तेपूर येथील पेट्रोल पंपासमोरील कापसाच्या शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप आल्याने गणेश आणि सुनील…
मुंबई : वृत्तसंस्था आकाशात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. तर आज आकाशात सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार आहे. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे, पण काही मोजक्या जिल्ह्याला संपूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. औरंगाबाद येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल या विषयी बोलताना श्रीनिवास औंधकर म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरून येणाऱ्या सुसाट मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना दि. २३ रोजी रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या या अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वार एफडीलक्स मोटारसायकल (एमएच ३०, बीएन ४४६२)ने येत होता. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच सुसाट येणाऱ्या मालवाहू वाहने दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहनांच्या प्रचंड वेगाने दुचाकीस्वार फेकला जाऊन अवजड वाहनाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिस शेख, गोविंदा पाटील, शुद्धोधन ढवळे, समाधान टहाकळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळ गाठले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल…
धरणगाव : प्रतिनिधी मुन्नादेवी मंगलादेवी फाउंडेशन संचलित ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार तर्फे दिवाळीच्या मंगल मुहूर्तावर, फराळ, मिठाई, कपडे आणि दिवे वाटपाचा कार्यक्रम धरणगाव येथे दिनांक २३ ऑक्टोबर, २०२२ रोजी संपन्न झाला. शहरातील प्रमुख व्यापारी आणि समाजसेवक जीवनसिंह बयस तसेच मुकेशसिंह बयस यांच्या अथक प्रयासाने मुन्नादेवी and मंगलादेवी फाउंडेशन हि संस्था अनेक खडतर अडचणींचा सामना करून धरणगाव परिसरात भरीव समाजकार्य करत असते. एरव्ही अवघ्या तीस रुपयात परिपूर्ण जेवणाचे ताट उपलब्ध करून देणाऱ्या आणि गावातील गरजू लोकांना दररोज खिचडी वाटप करणारी हि संस्था, आपल्या अन्य उपक्रमांमार्फत आदिवासी, अनुसूचित जाती जमाती तसेच समाजातील अभावग्रस्त लोकांसाठी संपूर्ण उर्जेने काम करत असते. शालेय साहित्यवाटप, वृक्षारोपण, गरजू…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अहिरे खु येथील एका शेतकरयाची दिवाळीच्या दिवशी जर्शी गाय लम्पी आजाराने मृत झाल्याची घटना घडली आहे. अहिरे खु येथील शेतकरी छगन दगडू पाटील यांच्या मालकीची जर्शी गाय हिला लम्पी आजाराने मृत झाल्याने या शेतकऱ्याचे दिवाळीच्या तोंडावर ५० हजारापर्यंतचे नुकसान झाले आहे. हा आजार संपूर्ण राज्यात गायीना होत असल्याने जिल्ह्यातील प्रशासनाने यावर उपाय योजना करून देखील गायीचा बळी हा आजार घेत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील नवीन बी. जे. मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून नऊ हजार रुपये आणि दीड लाखांचे स्पेअर पार्ट लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा आहेत. प्रदीप नानकराम रामचंदानी (वय ४०, रा. कंवरनगर, जळगाव) यांच्या मालकीचे गुरुनानक ट्रेडर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी नऊ हजार रुपये रोख व दीड लाखांचे सबमर्सिबल पार्टस लांबवले आहेत. प्रदीप रामचंदानी यांनी अहमदाबाद, राजकोट, भडगाव व खेडी येथून आणलेले कॉपरसह गन मेटल बुश आदी साहित्य आणले होते. दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ही चोरी झाली आहे. ९ हजार रुपये रोखसह १ लाख ५४ हजारांच्या वस्तू चोरी…
हिंदू पंचागानुसार, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक अमावस्या तिथीला साजरा केला जातो. दिवाळीत अमावस्या तिथीला रात्री गणेश, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. या वर्षी, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. दिवाळी पूजेसाठी योग्य वेळ कोणती? 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.53 ते 08.16 पर्यंत असेल. लक्ष्मी पूजनाचा एकूण कालावधी 01 तास 23 मिनिटे आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित पूजा साहित्य घेणे आवश्यक आहे. या दिवशी श्रीयंत्र, कुबेर यंत्राचे पूजन लाभदायक आणि प्रगती…
दोन दिवसापासून दिवाळीचा सण देशभरात मोठ्या धामधूममध्ये साजरा केला जात आहे. पण लक्ष्मी पूजन हे दिवाळीच्या दिवशी सकाळी पूजेसाठी मुहूर्त नाही. 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून लक्ष्मीपूजन करता येईल. कारण अमावस्या संध्याकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहील. मात्र 25 तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त फक्त संध्याकाळ आणि रात्रीच राहणार आहे. 2000 वर्षांनंतर दिवाळीला बुध, गुरू, शुक्र आणि शनि आपापल्या राशीत राहतील. तसेच लक्ष्मीपूजनाच्या वेळी पाच राजयोग असतील. हे ग्रहयोग सुख, समृद्धी आणि लाभाचे संकेत देत आहेत. त्यामुळे यावेळी दिवाळी खूप शुभ असेल. स्कंद, पद्म आणि भविष्य पुराणात दिवाळीविषयी वेगवेगळ्या मान्यता आहेत. एका पौराणिक…

