धरणगाव : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव यांच्यातर्फे, दिवाळीनिमित्त धरणगाव शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांत, एक हजार गोरगरिब कुटुंबांना व अनाथांना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला. तसेच बोरगाव मतिमंद मुलांच्या वस्तीगृहात ९० हून अधिक अनाथ मुलांना फराळ वाटण्यात आला. तसेच वनकुटे येथील सहवास मतिमंद प्रौढ निवासी शाळेला ७० हून अधिक दिवाळी फराळाची पाकिटे देण्यात आली. संस्थेने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव केंद्राला आभार पत्र दिले. धरणगाव शहरातील जिनिंग व्यवसायात काम करणारे कामगारांना फराळाचे या कालावधीत नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाने वाटप करण्यात आले. या उपक्रमाला तालुका वेले (ता. चोपड़ा) येथे…
Author: editor desk
यंदाची दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे, तर भाऊबीज सणाला हि लहान बहिण मोठ्या भावाला हक्काने भेट वस्तू मागत आहे तुम्हाला नक्की विचार पडला असेल कि आज बहिणीला काय भेट देणार आम्ही तुम्हाला काही सुचवू शकतो ज्याने बहिण अगदी खुश होवून जाईल. सौंदर्य प्रसाधने – सौंदर्य प्रसाधने महिलांना अत्यंत प्रिय असतात. त्वचेला उजळ करण्यासाठी किंवा अन्य उत्सव किंवा कार्यक्रमाप्रसंगी महिला आवर्जून मेकअप करतात. तुम्ही त्यांना मेकअप किट गिफ्ट करून आणखी त्यांच्या सौंदर्यप्रसाधनांत आणि आनंदातही भर पाडाल. हॅंडबॅग- तुमची बहिण जॉब करत असेल किंवा शिकत असेल तर तिच्यासाठी ही भेटवस्तू उत्तम ठरेल. या हँडबॅगमध्ये ती तिच्या उपयोगात येणाऱ्या लहानसहान वस्तू ठेवू…
धरणगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे शुल्लक कारणातून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, दि २४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्वप्नील गोरख पाटील(वय २३) यांचे वडील यांना त्यांच्याच प्लॉटमध्ये जाण्यास रस्ता न दिल्याने त्यांनी याची विचारणा केली. याचा राग आल्याने त्यांना वसंत जयराम पाटील, समाधान वसंत पाटील, राहुल वसंत पाटील, बेबाबाई वसंत पाटील यांनी काठीने मारहाण केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मोती पवार हे करीत आहेत.
कजगाव, ता. भडगाव : प्रतिनिधी दिवाळीच्या दिवशी उगवलेला सूर्य अनेकांसाठी आनंददायी ठरला असला तरी, वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथे याच दिवशी एकाच घरातील दोघांचा अस्त झाला. येथील पिता पुत्राचा नदीत बुडून मृत्यू कृष्णा पवार व लालसिंग पवार झाल्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली होते. वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथील शेतीच आपले विश्व मानणारे लालसिंग पंडित पवार (४२) त्यांचा आठवीत शिकणारा एकुलता एक मुलगा कृष्णा लालसिंग पवार(१३) हे पिता पुत्र दिघी कपाशी वेचून घरी परतत असताना कृष्ण याचा नदी किनाऱ्यावरून पाय घसरल्याने तो नदीत जाऊन पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचे वडील लालसिंग यांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकली.मात्र, त्यांना देखील पोहता…
अमळनेर : प्रतिनिधी येथील गलवाडे रोडवर एकास भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गलवाडे गावाकडून दि २३ रोजी सायंकाळी तीन दुचाकीस्वार भरधाव वेगाने येत होते. यावेळेस मुख्य रस्त्यावर असलेले गंगा अक्वा प्लांट जवळ अब्दुल गुलाब पिंजारी हे उभे असतांना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यास गभीर दुखापत होवून ते मृत पावले, यावेळेस तो दुचाकीस्वार घ्तानास्थाळाहून पळ काढला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात फिर्यादी हमीद गुलाब पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार प्रवीण बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुनील हटकर…
यंदाचे या वर्षातील सर्वात शेवटचे सूर्यग्रहण हे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी मंगळवारी आज होत आहे. सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण असो, दोन्हीचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. ज्योतिषांच्या मते, या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जो व्यक्ती या काळात सांगितलेली खबरदारी घेत नाही, त्याला ग्रहणाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग आज जाणून घेऊया या सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. असे म्हटले जाते की ग्रहणाचा गर्भवती महिलांवर अधिक परिणाम होतो. यादरम्यान काय काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये-…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीत सर्वत्र फटाक्याच्या आतीशबाजीने प्रदूषित होत असतेच. पण जगातल्या प्रदूषणाची राजधानी हि दिल्ली ठरली असून दिल्लीतील प्रदुषणाची पातळी आधीच वाढलेली आहे. दिवाळीनिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्विस संस्थेच्या IQAir नुसार सोमवारी ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. यानंतर पाकिस्तानचे लाहोर दुसऱ्या स्थानावर होते. दिवाळीत दिल्लीचा AQI 312 वर होता. शहराने 2018 मध्ये 281 AQI नोंदवले होते. गतवर्षीच्या तुलनेत किंचित सुधारणा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत दिल्लीत कमी प्रदूषण होते ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिवाळीत दिल्लीचा AQI 382 होता. तर 2016 मध्ये AQI 431 होता. नॅशनल इन्स्टिट्यूट…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील जिरायतपाडा येथील एका २५ वर्षीय विवाहितेचा दारूच्या नशेत असणाऱ्या एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह घरात असतांना दि २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा हा दारूच्या नशेत लाकडी दांडका घेवून घरातील मागच्या दाराने येत महिलेच्या पतीच्या अंगावर धावून येत असतांना पती घराबाहेर गेला असता, संशयित आरोपीने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील फत्तेपूर येथे ऐन दीपावलीच्या दिवशीच विजेचा धक्का लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा सोमवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. गणेश प्रकाश नेमाडे (४५, रा. कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (४०, रा. टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मयत वायरमनची नावे आहेत. गणेश हे अनुकंपाखाली नोकरीला लागले होते तर सुनील हे झिरो वायरमन होते.जनतेला दिवाळीच्या दिवशी उजेडात राहण्यासाठी ते वीज वितरणचे कर्तव्य निभावीत असतांना त्यांनी कुठलाही विचार न करता आपले काम चोखपणे बजावीत होते, मात्र त्यांच्याच घरात आज अंधार निर्माण झाला आहे. फत्तेपूर येथील पेट्रोल पंपासमोरील कापसाच्या शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप आल्याने गणेश आणि सुनील…
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सुर्यग्रहण होत आहे. काहीसाठी हे सूर्यग्रहण धोकेदायक तर काहीसाठी फायद्याचे असल्याचे समजते. पण धोकेदायक कुणासाठी व फाद्याचे कुणासाठी हे मात्र कुणीही सांगू शकत नसले तरी पंचागानुसार आज दुपारी 02.29 हे ग्रहण लागणार असून संध्याकाळी 06.32 वाजता हे समाप्त होणार. भारतात मात्र संध्याकाळी 04:22 ग्रहणाला सुरुवात होणार आहे. सुर्य ग्रहणाचा अनेकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सुर्य ग्रहणादरम्यान सुतक वैगरे पाळली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की या सुर्य ग्रहणाचा मात्र काही राशींना चांगला फायदा होणार आहे. त्या राशी कोणत्या? सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना सूर्यग्रहण लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. नोकरीच्या…

