भुसावळ : प्रतिनिधी शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसरच्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की,, मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, २६ रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता मात्र डी – २ डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली मात्र संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले व गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेमळदा गावातील एका २७ वर्षीय विवाहितेला सासरचे मंडळी छळ करीत असल्यामुळे रावेर पोलिसात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शेमळदे येथील २७ वर्षीय विवाहिता भाग्यश्री गौरव पाटील यांचा विवाह पुणे येथे विवाह झाला असून येथील सासरचे मंडळी विवाहितेला माहेरून २० लाख रुपये आणावे, तर विवाहितेच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबध असल्यावर देखील मुलाच्या वडिलांनी त्याचा विवाह २७ वर्षीय तरुणीसोबत करून दिला, तर पुणे येथे विवाहिता संसार करण्यासाठी गेली असता तिला शिवीगाळ मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित आरोपी पती गौरव सोपान पाटील, सोपान भिका पाटील, प्रतिभा…
जळगाव : प्रतिनिधी शिंदे गटाचा एक मंत्री आणि एक आमदार यांच्यात दोन दिवसापासून चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मानापमान नाट्यावरून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. तरीही हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. एकाच जिल्ह्यातील या नेत्यांमधील वादामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. वाद सुरू असलेल्या एक मंत्री म्हणजे गुलाबराव पाटील आणि आमदार म्हणजे चिमणराव पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. चिमणराव पाटील यांनी टीका केल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे. एकमेकांबरोबर नारळ फोडल्याने…
मुंबई : वृत्तसंस्था ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने आज मोठी कार्यवाही करण्यात आली असून यात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. २०२०मध्ये भारती सिंग हिच्या घरामध्ये एनसीबीने छापा टाकला हातो. यामध्ये ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात त्यांना अटकदेखील करण्यात आलेली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याच प्रकरणी २०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे. एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्याने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील श्रीराम चौक येथील एका परिसरातून जबरी घरफोडी करीत सोने व रोकड रक्कम लांबविल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील श्रीराम चौकातील निसर्ग कॉलनीतील रहिवासी दिपाली सतीश सोनवणे(वय ३३) हे वास्तव्यास आहे. दि २७ ते २८ रोजीच्या दरम्यान अनोळखीनी राहत्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागीने व रोकड रक्कम तब्बल एकूण १ लाख २० हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर फिर्यादी दिपाली सतीश सोनवणे यांनी शनीपेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.फौ.किरण पाठक हे करीत आहेत.
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील लासगाव येथे उभ्या ट्रकला चारचाकी कार धडक दिल्याने कार मधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना दि. २८ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर जखमींवर जळगांव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील लासगाव गावा नजीक रस्त्याच्या कडेला जळगांवच्या दिशेने विरुध्द बाजुला अवजड ट्रक (क्रं. एम. एच. २६ एच ५२६५) हा चालकाने उभा केला होता. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास जळगांवहुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या क्रेटा (क्रं. एम. एच. ०४ एच. एफ. ८२८३) ही चारचाकी कारने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख इस्माईल…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वालझिरी येथील नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला ही घटना गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली. मयताचे नाव राहुल सुरेश चौधरी (17, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, पाचोरा) असे आहे. राहुल हा भाऊबीज सणासाठी बहिणीकडे गावी आला होता. गुरुवार, २७ रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात आल्यानंतर नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मुलांनी व परीवारातील सदस्यांनी तत्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातून बाहेर काढत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित करताच कुटूंबियांनी टाहो फोडला. मयत राहुल चौधरी या तरुणाच्या पश्चात आई, बहिण, मेहुणे…
रत्नागिरी : वृत्तसंस्था देशभरात चलनी नोटांवर कुणाचा फोटो लावायचा यावरून राजकीय नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगली आहे. अनेकांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली आहे. काहींनी देवदेवतांची नावे सूचवली आहेत. तर काहींनी विद्यमान राजकीय नेत्यांचीही नावे सूचवली आहे. राज्यातूनही अनेक पक्षांनी नोटांवर कुणाचा फोटो असावा याची नावे सूचवलेली आहे. राजकीय नेत्यांची ही स्पर्धा सुरू असतानाच सोशल मीडियातून काही लोकांमध्ये खोडसाळपणा सुरू आहे. कुणी तरी नाण्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा फोटो छापावा असं म्हटलं आहे. तसेच राणेंचा फोटो असलेला चलनी नाण्याचा फोटोही व्हायरल केला आहे. या खोडसाळपणावर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे. सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीने…
अमरावती : वृत्तसंस्था रवी राणा विरुद्ध टीका करताना बच्चू कडू यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा कडून बच्चू कडूवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, तर राजापेठ पोलिसांनी विरुद्ध बच्चू कडू विरुद्ध महिलांची बदनामी केल्याप्रकरणी 501 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. रवी राणा यांनी १ नोव्हेंबर आत पुरावे सादर करावे. अन्यथा हिजडा घोषित करेल अशी भाषा वापरली आहे. त्यामुळे महिला अमरावतीत आक्रमक झाल्यात. महिलांविषयी अपशब्द वापरणे योग्य नसल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील पोलीस व्यवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची सूचना केली आहे. त्यानुसार ‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’ ही व्यवस्था आणण्याबाबत राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांना त्यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पोलीस हा राज्यसूची अतंर्गत असणारा प्रश्न आहे. त्यामुळं प्रत्येक राज्यानं आपापल्या पोलिसांसाठी वेगवेगळा गणवेश डिझाईन केलेला आहे. मात्र, ‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’ या संकल्पनेवर चर्चा सुरु व्हावी, असं आवाहन PM मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, या व्यवस्थेचे फायदे देखील पंतप्रधानांनी सांगितले आहेत. ते म्हणाले, एकतर गणवेशासाठी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी…

